शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ३ दिवस सुट्टी?

by Gautam Sancheti
मार्च 25, 2021 | 5:55 am
in महत्त्वाच्या बातम्या
0

नवी दिल्ली – सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांशी संबंधित एका प्रश्नावर संसदेत पुन्हा एकदा आठवड्यातून दिवस सुटीचा मुद्दा छेडला गेला आहे. आठवड्यातून चार दिवस किंवा आठवड्यातून ४० तास कामाची व्यवस्था सरकारी कार्यालयांमध्ये निर्माण करण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारकडे नसल्याचे संसदेत स्पष्ट करण्यात आले असले तरीही गेल्या काही महिन्यांपासून देशात हा विषय सातत्याने चर्चेला येत आहे, हे टाळता येणार नाही.
केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत असा कुठलाच प्रस्ताव सरकारकडे आलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर आठवड्यातून पाच दिवस आणि भारत सरकारच्या नागरी प्रशासकीय कार्यालयात दररोज साडेआठ तास काम केले जाते. सातव्या वेतन आयोगानेही हीच शिफारस कायम ठेवली आहे.’
यापूर्वी अश्या बातम्या आल्या होत्या की नव्या कामगार कायद्यानुसार येत्या काळात आठवड्यातून तीन दिवस सुट्यांची तरतूद शक्य आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आठवड्यात चार कार्यालयीन दिवस आणि त्यासोबत तीन दिवस सुटी देण्याच्या पर्यायाचा विचार करीत आहे. 
असाही अंदाज लावण्यात येत आहे की, लेबर कोडच्या नियमांमध्येही हा पर्याय दिला जाईल, ज्यात कर्मचारी आणि कंपनी आपसात सहमती करून निर्णय घेऊ शकतील. नव्या नियमांमध्ये सरकारने कामाचे तास वाढवून १२ करण्याचाही प्रस्ताव सामील केला आहे. आठवड्यात ४८ तास कामाचीच मर्यादा आहे. अश्यात १२ तासापर्यंत कामाची मर्यादा वाढवली तर आठवड्यातून चारच दिवस कार्यालयीन कामकाज होईल, अशीही शक्यता आहे.
ईपीएफचे नवे नियम
ईपीएफवर कर लावण्याच्या संदर्भात अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेवर माहिती देताना कामगार सचिव म्हणाले की, ‘यात अडिच लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी कर केवळ कर्मचाऱ्याच्या योगदानावर लागेल. कंपनीच्या वतीने होणारे अंशदान याच्या अख्त्यारित येणार नाही.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – वेदांत घुगेने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविले सिल्वर मेडल 

Next Post

इकडे लक्ष द्या! तुमचा ८० टक्के डाटा विकताय या कंपन्या

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक फोटो

इकडे लक्ष द्या! तुमचा ८० टक्के डाटा विकताय या कंपन्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011