गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

समाज कल्याण विभागात आयुक्त व कर्मचाऱ्यांमधील संघर्ष पेटला!

by Gautam Sancheti
जानेवारी 13, 2021 | 1:05 pm
in संमिश्र वार्ता
0
logo print

पुणे – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे प्रकरण ताजे असतांनाच आता राज्याच्या समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे व कर्मचारी यांच्या मधील संघर्ष पुढे आला आहे. विभागातील ५० टक्के पदे रिक्त असतांनाही कर्मचाऱ्यांकडून अवास्तव प्रशासकीय सुधारणांची अपेक्षा करत आयुक्तांनी काही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. शासनमान्यता गट-क कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांच्या निवेदनाला आयुक्तांनी केराची टोपली दाखविली आहे. कालच पुणे आयुक्तालयातील शिपायाने आयुक्तांच्या कॅबिनसमोरच अंगावर रॉकेल टाकून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. यासर्व प्रकारामुळे समाज कल्याण विभागाचे कर्मचारी संतप्त झाले असून नारनवरे व समाज कल्याण कमर्चारी संघटनेमधील संघर्ष इरेला पेटला आहे. २७ जानेवारी पासून राज्यातील समाज कल्याण विभागातील कर्मचारी लेखणीबंद आंदोलन करणार आहेत.
समाज कल्याण विभागाचे आयुक्त म्हणून डॉ.प्रशांत नारनवरे यांनी १० सप्टेंबर २०२० रोजी कार्यभार घेतला. या तीन महिन्यात आयुक्तांनी आहे त्याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून समाज कल्याण विभागात “झिरो पेन्डन्सी ॲण्ड डेली डिस्पोजल” या कार्यालयीन कार्यपध्दतीची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली. आयुक्तांच्या या उपक्रमांत कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केले. यामुळेच समाज कल्याण विभागातील या सुधारणांचा राज्यस्तरावर ‘नारनवरे पॅटर्न’ म्हणून नावलौकिक ही झाला.  ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर आयुक्तांचा सर्वत्र नावलौकिक झाला. त्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र आयुक्तांनी मात्र साफ दुर्लक्ष केले. कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी व त्यांचे म्हणणे जाणून न घेता काही कर्मचाऱ्यांवर एकतर्फी निलंबना कार्यवाही केली आहे. असे समाज कल्याण कर्मचारी संघटना (गट-क), महाराष्ट्र राज्य, पुणे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे सदर निवेदन सोशल मिडियावर सर्वत्र फिरत आहे. निलंबन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवरील कार्यवाही मागे घेण्यात यावी, रिक्त पदांची भरती करण्यात यावी, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग व अपंग कल्याण विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमावा, कंत्राटी गृहपाल पदे भरण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, अनुसूचित जाती-उपयोजनेसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमावा, शासकीय निवाशी शाळेतील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू कराव्यात, अभिलेखापाल या पदाची निर्मिती करण्यात यावी, रखडलेल्या पदोन्नती देण्याची कार्यवाही करावी, वरिष्ठ लिपिकांना मागील ४ वर्षापासून वेतनवाढ देण्यात आलेली नाही सदर वेतनवाढ त्वरीत देण्यात यावी, गेल्या १५ वर्षापासून सामाजिक न्याय विभागात कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेले संगणक चालक, जनसंपर्क अधिकारी व विधी अधिकारी यांना कायम करण्यात यावे, ३३४२ लेखाशिर्षावर कार्यरत वसतिगृह कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन करण्यात यावे या प्रमुख मागण्या कर्मचारी संघटनेच्या आहेत.
कर्मचारी संघटनेने आपल्या या मागण्यांचे निवेदन वेळोवेळी आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांना दिले होते. या निवेदनाची साधी दखल ही आयुक्तांनी घेतलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांना दिले आहे. या निवेदनावर दखल घेतली गेली नाहीतर प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्यात येईल. असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अॅमेझॉनकडून २६ जानेवारीच्या मेगा सेलची घोषणा

Next Post

धनंजय मुंडे यांची आमदारकी राहणार की जाणार? बघा तज्ज्ञ काय सांगताय (व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
Min Dhananjay Munde Press Conf 1 1140x570 1

धनंजय मुंडे यांची आमदारकी राहणार की जाणार? बघा तज्ज्ञ काय सांगताय (व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011