मंगळवार, जुलै 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सत्ताधाऱ्यांनी नाशिककरांना अनाथ केले; मनसेचा गंभीर आरोप

by Gautam Sancheti
सप्टेंबर 11, 2020 | 9:41 am
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – थोर वारसा लाभलेल्या नाशिक महानगरातील  रहिवाश्यांच्या समस्यांकडे राज्य शासन व महानगरपालिका सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले असून सत्ताधाऱ्यांनी नाशिककरांना अनाथ केले आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस निखील सरपोतदार यांनी केला आहे.

नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव भयजनक पातळीवर वाढत आहे. आजघडीला देशात सर्वात अधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्र राज्यात आहे. राज्यात ठाणे, पुणे, मुंबई नंतर आता नाशिकचा नंबर लागत असून कोरोना संक्रमण रोखण्यात जिल्हा व मनपा प्रशासनाला पूर्णपणे अपयश आलेले असून राज्याची धुरा ज्यांच्या हातात आहे असे राज्यकर्ते मात्र करमणूक क्षेत्रात रमलेले आहेत, मग ते सुशांत सिंघ राजपूत असो की कंगना रानौत असो. राज्यातील गरीब कष्टकरी जनता आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी जीवावर उदार होऊन संघर्ष करीत आहे तेव्हा राज्यकर्ते आपल्या अहंकाराच्या पोषणासाठी लुटु-पुटुच्या लढाईत व्यस्त आहेत, असे सरपोतदार यांनी म्हटले आहे.

जागतिक कोरोना महामारी विरोधात सुरु असलेली लढाई कोरोना प्रतिबंधक औषधे, इंजेक्शन, ऑक्सिजन सिलिंडर व वेन्टीलेटर यांच्या तुटवडा व काळाबाजारामुळे जनतेला मृत्युच्या दाढेत घेऊन चाललेली असतांना मनपातील सत्ताधारी मात्र पेस्ट कंट्रोलचा ठेका, सफाई कामगार भरतीतील भ्रष्टाचार, मनपातील विविध कामांचे ठेके मिळवणे  आदींमध्ये गुंतलेले आहेत. रस्त्यांना पडलेले खड्डे, जागोजागी घाणीचे साम्राज्य, पावसाच्या पाण्याचा भराव, बकाल झोपडपट्ट्या, आरोग्य सेवांचा वाजलेला बोजवारा सारख्या समस्यांनी नाशिककर भांबावलेले असतांना  मनपातील सत्ताधारी मात्र देशात स्वच्छता परीक्षणात नाशिकच्या आलेल्या चमत्कारिक ११ व्या स्थानाचे ढोल बडवीण्यात मशगुल आहेत, असा आरोप सरपोतदार यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नाशिकला दत्तक घेण्याच्या घोषणेला भुलून नाशिककरांनी त्यांच्या पक्षाचे तीन तीन आमदार निवडून दिले मात्र नाशिककरांच्या भल्याचे कुठले काम ह्या आमदारांनी केले असा प्रश्न आज जनतेला पडला आहे. आपल्या सत्ताकाळात आदरणीय राजसाहेबांच्या स्वप्नातील शहर विकासाच्या रुपरेखेनुसार अनेक पथदर्शक विकासकामे करून देखील नाशिकच्या  जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विकासाच्या राजकारणाला नाकारले होते. दुर्भाग्याने आज त्याच जनतेला आपल्या या निर्णयाचे कटू परिणाम भोगावे लागत आहे असे सांगून “सत्ताधाऱ्यांनी नाशिककरांना अनाथ केले आहे” अशी टीका सरपोतदार यांनी केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डिप्लोमा प्रवेशास अत्यल्प प्रतिसाद; तिसऱ्यांदा मुदतवाढ

Next Post

भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीने काय साधले?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
FB IMG 1599813957602

भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीने काय साधले?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मदतीसाठी संकोच करू नये, जाणून घ्या, बुधवार, २३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
Novha Merrytime

सागरी शिक्षण क्षेत्रात मुक्त विद्यापीठाचा प्रवेश…या अकादमी सोबत सामंजस्य करार

जुलै 22, 2025
kanda onion

केंद्राच्या कांदा खरेदीला या तारखे पर्यंत मुदतवाढ मिळावी….मुख्यमंत्र्यांना किसान मोर्चाचे पत्र

जुलै 22, 2025
cbi

परीक्षा पेपरफुटी प्रकरण…आठ माजी रेल्वे कर्मचाऱ्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जुलै 22, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

५ वर्षांसाठी २५ हजार कोटींची तरतूद…अशी आहे कृषीसमृद्ध योजना

जुलै 22, 2025
amit shah11

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह या तारखेला राष्ट्रीय सहकार धोरण करणार जाहीर…

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011