नवी दिल्ली – अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी देशभरातून जवळपास १० कोटी घरांमधून अडीच हजार कोटींहून अधिक समर्पण निधी जमा झाला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, एप्रिलमध्ये मंदिर बांधण्यासाठी पायाभरणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. सध्या निर्माण स्थळी पाया बांधण्यासाठी खोदण्याचे काम आणि मातीचा ढिगारा हटवण्याचं ६० टक्के काम झाले आहे.
समर्पण निधी अभियान पूर्ण झालं असलं तरी जे भाविक समर्पण निधी देण्यापासून वंचित राहिले असतील ते श्रीराम जन्मभूमी क्षेत्र न्यासाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून समर्पण निधी जमा करू शकतात, अंस चंपत राय म्हणाले.
मंदिरासाठी समाजातील प्रत्येक क्षेत्रातून समर्पण निधी मिळाला आहे. ४ मार्चपर्यंत समर्पण निधी २५०० कोटीहून अधिक जमा झाला आहे. शेवटचे आकडे येणं बाकी आहेत. ईशान्येकडील राज्यातूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे, असं त्यांनी सांगतिलं.










