शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेतीतील नवदुर्गा : भारती अरुण कुशारे (सावरगाव, ता. निफाड)

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 22, 2020 | 9:02 am
in इतर
0
410

सरत्या काळाने, केले जरी डंख
मिटू नको आता, फुटलेले पंख…
तिला कधीही वाटलं नव्हतं की आयुष्यातील एका वळणावर शेती व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यांवर येईल…अशा आजच्या आपल्या नवदुर्गेचा प्रवास जाणून घेऊया : भारती अरुण कुशारे
– रुचिका ढिकले (जनसंपर्क विभाग, सह्याद्री फार्म्स)
     लहानपणापासूनच शेतीच्या कामातील आवड असणाऱ्या भारती ताईंनी कला शाखेत आपले शिक्षण घेतले. पुढे सावरगाव, नाशिक येथील अरुण कुशारे यांच्याशी ताईंचा विवाह झाला. शेतीच्या कामात पती अरुण यांचे मार्गदर्शन मिळत गेले. काही प्रमाणात शेतीतली जबाबदारी भारती ताई बघत होत्या. सह्याद्रीच्या उभारणीच्या काळापासूनच हे कुटुंब सह्याद्रीच्या प्रवासात जोडले गेलेले होते. घरची एकूण १५ एकर जमीन असून यामध्ये द्राक्ष पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून सह्याद्रीच्या मार्फत ती निर्यात केली जात होती. असा हा प्रवास सुरु असतानाच भारती ताईंच्या लग्नाला ११ वर्षे झालेली असताना पती अरुण कुशारे यांचे अपघाती निधन झाले. हि घटना भारती ताईंच्या आयुष्याला खूप मोठे वळण देणारी होती कारण घरच्या सर्व शेतीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी हि मुख्यतः अरुण कुशारे यांच्यावरच होती.
     या घटनेनंतर कुटुंबाचा मुख्य आर्थिक स्रोत असणाऱ्या शेतीचे पुढे काय? हा मोठा प्रश्न होता. कारण ५०-६० लाखांचा कर्जाचा डोंगर हा समोर उभा होता यासोबतच एक लहान मुलगा व मुलगी यांची जबाबदारी होती. द्राक्षाचा सिझन सुरु झालेला होता. मग घरातील इतर सदस्यांनी ज्यामध्ये भारती ताईंचे दीर व भाऊ हे जमेल तसे शेतीत लक्ष ठेवत होते. भारती ताई खचून गेलेल्या होत्या. साधारण ४ ते ५ महिन्याचा काळ लोटला आणि मग हळूहळू सावरत असताना पुढे ताईंनी घराचा मुख्य आधार असणाऱ्या या शेतीला एक नवी दिशा देऊन घरावरची हि आर्थिक परिस्थिती बदलविण्याचा निर्धार केला.
     पूर्वीपासून शेतीतल्या कामांची सवय हि भारती ताईंना होतीच पण एवढ्या मोठ्या शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन स्वतः बघणे हे मात्र मोठे आव्हान होते. या काळात अनेक चढ-उत्तर आले पण ताईंचा निश्चय ठाम होता. घरातील इतर सदस्य ज्यामध्ये सासू, दीर महेश कुशारे व त्यांची पत्नी यांना शेतीतला तितकासा अनुभव नसला तरी भारती ताईंच्या पाठीशी हे सर्व खंबीरपणे उभे होते. भाऊ संदीप भोसले यांचा शेतीत लागणाऱ्या खतं-औषधांचा व्यवसाय असल्याने आणि एकूणच शेतीतील चांगला अनुभव असल्याने त्यांचा आधार खूप महत्वाचा होता. आपल्यावर असणाऱ्या कर्जाची रक्कम हि खूप मोठी आहे ती मिटवण्यासाठी शेती हाच मुख्य आधार आहे, त्यामुळे या शेतीत आधुनिक बदलांसोबत जाणे आवश्यक आहे हे ताईंनी ओळखले होते.
पुढे या १५ एकर क्षेत्रात द्राक्षातील शरद, सोनाका या व्हरायटींची लागवड करत द्राक्षासोबत डाळिंब आणि टोमॅटो पिकाची लागवड केली. यात खतं औषधांच्या नियोजनात भाऊ संदीप यांची मदत झाली. शेतीतील प्रक्रिया आणि द्राक्ष निर्यातीत सह्याद्रीचे मार्गदर्शन घेत शेतीत चांगले उत्पन्न काढण्यास सुरुवात झाली होती. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर हा मुख्यतः कर्जफेडणी आणि शेतीत भांडवल म्हणून करण्यात आला. याच जिद्दीने काम करत काही वर्षांतच संपूर्ण कर्जाची परतफेडणी शेतीच्या माध्यमातून करून शेतीला नवनवीन दिशा देण्याचा प्रवास सुरु होता.
पुढे अती पाऊस, हवामानातले बदल व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीत अनेक आव्हाने समोर येत होती. यादरम्यान शाश्वत निर्यातक्षम द्राक्ष वाण भारतात आणून ‘सह्याद्री फार्म्स’ने एका वर्षात दुबार काढणीचा यशस्वी प्रयोग करत आरा-१५ हि द्राक्षाची व्हरायटी उपलब्ध केली.  ताईंनी  यापुढे संपूर्ण क्षेत्रात द्राक्ष पिकाची लागवड करण्याचे नियोजन करत आरा-१५ या वाणाचीदेखील लागवड आपल्या शेतीत केली आहे. काही वर्षांपूर्वी आपल्यावर असलेल्या अनेक आव्हानांना कुटुंबाच्या साहाय्याने तोंड देत आजही ताई हिंमतीने उभ्या आहेत. त्यामुळे परिस्थितीने खचून न जाता आपल्या आधुनिक दृष्टिकोन व उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर जिद्दीने वाटचाल करणाऱ्या सह्याद्रीच्या ह्या नवदुर्गेस सलाम!
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इकडे लक्ष द्या; नाशकात गुरुवारी या भागात पाणीपुरवठा नाही

Next Post

हो, कोरोना असूनही ते टाकत आहेत मद्यतस्करांवर धाडी!

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201019 WA0025

हो, कोरोना असूनही ते टाकत आहेत मद्यतस्करांवर धाडी!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011