शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला व आंदोलनाला हिंसक वळण लागले- भुजबळ

जानेवारी 26, 2021 | 1:16 pm
in संमिश्र वार्ता
0
bhujwal

नाशिक – तीन महिन्यांहून अधिक काळ शेतकऱ्यांनी त्यांच्या राज्यात आंदोलन करून देखील सरकार प्रश्न सोडावीत नसल्याने अखेर आंदोलक शेतकरी दिल्लीत आले. एकीकडे कोरोनाचा कहर, थंडी, पाऊस या सारख्या कठीण परिस्थितीत दोन महिन्यातून अधिक काळापासून शेतकरी संयमाने आंदोलन करत आहे. या परिस्थितीत जवळपास ८० हुन अधिक शेतकरी मृत्युमुखी पडले. त्यानंतर आज शेतकऱ्यांचा संयमाचा बांध अखेर फुटला असून या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. ही परिस्थिती शेतकरी आणि देशहितासाठी योग्य नाही. त्यामुळे देशाच्या प्रमुखांनी तातडीने शेतकऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढावा अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी आज मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. त्यांनी दाखविलेल्या हा संयम अतिशय कौतुकास्पद असून हे देशातील अभूतपूर्व असे आंदोलन आहे. या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने अखेर आज या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या हिंसेचे कोणीही समर्थन करणार नाही. मात्र अशी परिस्थीती निर्माण होण्याअगोदर यावर तोडगा काढणे अपेक्षित होते. अशा परिस्थितीत मात्र युपीच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला जात होता. तर एकीकडे बैठकांवर बैठका घेतल्या जात होत्या. यासर्व प्रकारानंतर आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीमध्ये मोर्चे काढणे, सत्याग्रह करणे हेच हक्काचे मार्ग आहे मात्र त्यातूनही निर्णय होत नसतील तर हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, देशातील शेतकरी इतक्या दिवासांपासून आंदोलन करत असतांना त्यावर केंद्र शासनाकडून निर्णय होत नाही ही भूमिका योग्य नाही. ही हट्टीवादी भूमिका शासनाने सोडण्याची आवश्यकता आहे. या हट्टीवादी भुमिकेमुळे कोणाचाही फायदा होणार नाही. तर हा प्रश्न असाच प्रलंबित राहील. त्यामुळे केंद्रातील निर्णय घेणाऱ्या नेत्यांनी म्हणजेच देशाच्या पंतप्रधानांनी यात स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांसोबत बसून त्यांच्या वेदना त्यांचे दु:ख समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच हा मार्ग निकाली निघेल असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, राज्यातही तीच परिस्थिती बघावयास मिळत आहे. जे राजभवनावर होत आहे तेच राजपथावर होतांना दिसत आहे. काल राज्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी राजभवनावर आले असतांना राज्यपालांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ देऊन त्यांचे निवदेन स्विकारण्याची आवश्यकता होती. राज्यपालांना या आंदोलनाबाबत संपूर्ण माहिती असतांना त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जाने पसंत केले. ही बाब योग्य नाही. दौरे नियोजित असतांना काही वेळी जनहिताच्या महत्वाच्या प्रश्नांवर त्यात थोडाफार बदल करण्याची देखील आवश्यकता असते ते राज्यपालांनी करणे अपेक्षित होते असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्लू बाबत जिल्हा प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना 
एकीकडे कोरोनाचे संकट दूर होत असतांना जिल्ह्यात आता बर्ड फ्लूने आपले डोके वर काढले. बर्ड फ्ल्यू बाबत जिल्हा प्रशासन अगोदरपासूनच सतर्क असून त्याबाबत काळजी घेतली जात होती. मात्र आज दुर्दैवाने जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या केसेस आढळून आल्या आहे. याबाबत जिल्हा प्रशासनासोबत फोनद्वारे संपर्क करून योग्य त्याना आवश्यक त्या उपयायोजना करण्याच्या सूचना दिलेल्या असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडला जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण

Next Post

ग्रामपंचायतीचे एसटी प्रवर्गातील निवडणुकांपूर्वीचे आरक्षण कायम राहण्याचा मार्ग मोकळा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

ग्रामपंचायतीचे एसटी प्रवर्गातील निवडणुकांपूर्वीचे आरक्षण कायम राहण्याचा मार्ग मोकळा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011