सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच सडतो आहे,  शेतक-यांमध्ये प्रचंड नाराजी…

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 26, 2020 | 12:12 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201026 WA0008

डांगसौंदाणे –  उन्हाळ कांद्याला सुगीचे दिवस येण्यास सुरुवात होताच केंद्र सरकारने एकापाठोपाठ घेतलेल्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांबरोबर व्यापा-यांच्याही अडचणीत वाढ केल्याने केंद्र सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याच्या भावना शेतकरी वर्गाकडून व्यक्त होताना दिसत आहेत. केंद्राच्या या धोरणामुळे आठ महीने मोठ्या हिमतीने चाळीमध्ये कांदा साठवला. पण, आता कांदा चाळीतच सडायला लागला आहे. त्यामुळे कांदा आता उकिरड्यावर फेकण्याची वेळ कांदा उत्पादक शेतक-यांवर आली आहे.
       देशात सर्वदूर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे खरीपाचे कांदा पिक पूर्णपणे खराब झाल्याने उन्हाळ कांद्यावर खऱ्या अर्थाने ग्राहकांची मागणी पूर्ण होत आहे. कुठेही कांद्याच्या नावाने ग्रहाकांकडून ओरड होत नसतांना सुरुवातीला निर्यातबंदी करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा मोठा तोटा केला आहे. अनेक अडचणीवर मात करीत शेतकरी बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीसाठी नेत असतांना आता केंद्राने व्यापाऱ्यांवर ही निर्बंध आणल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. मुळातच उन्हाळ कांद्याचा साठा हा आता मोजक्याच प्रमाणावर राहिला असून अनेक शेतकऱ्यांकडे १० ते ५० क्विंटल कांदा शिल्लक असताना केंद्राने व्यापाऱ्यांवर साठेबाजीचे निर्बंध घालत शेतकऱ्यांचे एकंदरीत मोठे आर्थिक नुकसान करण्याच विडाच उचलला असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने ही करण्यात येत आहेत. एकीकडे देशाच्या कांद्याला विरोध करीत बाहेरील देशातील कांद्याला पायघड्या घालत देशातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या भावना ही व्यक्त होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा दरात घसरण करून शेतकऱ्यांच्या हाता तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत शासनाने तात्काळ साठेबाजी वरील निर्बंध उठवत बाहेरील देशातील कांदा आयात न करता देशांतर्गत कांद्याला प्राधान्य द्यावे अन्यथा आगामी काळात केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही अनेक शेतकरी नेत्यांकडून दिला जात आहे. कांदा ही कुठली जीवनावश्यक वस्तू नसल्याने तिचा सार्वजनिक जीवनावर कुठलाही परिणाम होत नसल्याने कांदा प्रश्नी केंद्र सरकारने इतके गांभीर्य न घेता शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे कसे पडतील याचाही सारासार विचार करण्याच्या अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहेत.
बाजार समित्या सुरळीत चालू द्याव्यात
कांदा हा जीवनावश्यक वस्तू म्हणून कधी पाहिला गेलेला नाही कांदा खाणे आणि न खाणे यांनी कुठलेही मोठे गणित बिघडत नाही. कुठल्याही कुटुंबाला महिन्याला दोनशे रुपयेच्या वरती कांदा लागत नाही. शेतकऱ्याला जर दोन पैसे मिळत असतील तर केंद्राने बाहेरील देशातील कांदा आयात न करता देशांतर्गत कांद्याला बाजारपेठेत चांगला दर मिळू द्यावा व व्यापाऱ्यांवर जे निर्बंध आणले आहेत ते तात्काळ ऊठवावेत व बाजार समित्या सुरळीत चालू द्याव्यात
पंकज ठाकरे , प्रगतशील शेतकरी तथा संचालक, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती
….
८० टक्के कांदा हा खराब झाला
कांद्याला भाव वाढेल या अपेक्षेने गेली सात ते आठ महिने कांदाचाळी मध्ये भरून ठेवला .आज रोजी ८० टक्के कांदा हा खराब झाला आहे २० टक्के कांदयाला दोन पैसे मिळण्याच्या अपेक्षा असतांना केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राहिलेला कांदा ही उकिरड्यावर फेकावा लागतो की काय अशीच शंका आता आमच्या मनात येऊ लागली आहे.
प्रवीण बैरागी, शेतकरी
IMG 20201026 WA0009 1
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुडन्यूज. साल्हेर परिसरात सापडली विश्वातील नाविन्यपूर्ण वनस्पती

Next Post

भाडेकरूंच्या माहितीबाबत नाशिक पोलिस होणार अधिक सतर्क…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
andolan 1
राज्य

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते करणार विदर्भ दौरा…आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराशी साधणार संवाद

सप्टेंबर 8, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये निषेध मोर्चात १८ जणांचा मृत्यू, २५० हून अधिक लोक जखमी

सप्टेंबर 8, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

सप्टेंबर 8, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार….

सप्टेंबर 8, 2025
NMC Nashik 1
संमिश्र वार्ता

नाशिक महानगरपालिकेत प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सुचना अर्जावर या तारखेला होणार सुनावणी

सप्टेंबर 8, 2025
Untitled 3
मुख्य बातमी

मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक…विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 8, 2025
Next Post
नाशिक पोलिस आयुक्तालयाचे संग्रहित छायाचित्र

भाडेकरूंच्या माहितीबाबत नाशिक पोलिस होणार अधिक सतर्क...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011