सरकार, शेतकरी, ट्विटर आणि ‘कू’
राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांचे आंदोलन अजून संपलेले नाही. कधी लाल किल्ला, कधी चक्काजाम, तर आता ‘रेल्वे रोको’ची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा संसदेतील भाषणात शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले आणि शेतकऱ्यांनी चर्चेची वेळही मागितली. सरकार आणि शेतकरी यांच्यात बऱ्याच वेळा चर्चा होऊनही यावर तोडगा निघालेला नाही आणि एवढ्यात निघेल असे वाटत नाही. कारण त्यांनी दोन ऑक्टोबरपर्यंत थांबायची तयारी केली आहे. तूर्तास तरी सारा फोकस वेगळ्याच कारणाकडे वळला आहे. तो म्हणजे ट्विटर या समाजमाध्यमाचा वापर. सरकारने घेतलेला आक्षेप, काही खाती बंद करण्यास ट्विटरने दिलेला नकार, त्यावरून ट्विटर पदाधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची शक्यता असल्याची बातमी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ट्विटरला प्रतिस्पर्धी म्हणून निघालेले ‘कू’ नावा चे ॲप, याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हे प्रकरण वाटते तितके सरळ नाही आणि कोणती बाजू मर्यादा ओलांडून जात आहे हे स्पष्ट सांगणे ही कठीण आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
ashok.panvalkar@gmail.com