मंगळवार, नोव्हेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विशेष लेख – प्रतिभासंपन्न कवियित्री शांता शेळके यांचा जन्मदिन

ऑक्टोबर 11, 2020 | 7:55 am
in इतर
2
shanta shelke

विशेष लेख – कवियित्री शांता शेळके यांचा जन्मदिन १२ ऑक्टोबर  (काटा रुते कुणाला हे शांता शेळके यांचे गीत शेवटी श्रुती जोशी यांच्या आवाजात )

….

ऋतु हिरवा, ऋतु बरवा

 

 विशाखा देशमुख, जळगाव

………

सारी सृष्टी हिरवाईने नटलेली असताना शांता शेळके यांचे ऋतु हिरवा, ऋतु बरवा हे गाणे ओठावर येते. तर गणपती उत्सवात गणराज रंगी नाचतो, गजानना श्री गणराया या शांताबाईंच्या गाण्यांनी परिसर दुमदुमून जातो. याच प्रमाणे जय शारदे वागेश्वरी, शूर आम्ही सरदार, जीवन गाणे गातच रहावे, पाऊस आला वारा आला अशा कितीतरी गीतांमधून शांताबाईंनी आपल्याला समृध्द केले आहे…..        

बहुमोल शब्दलेणं देणाऱ्या शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला. त्या त्यांच्या आईला अंबिका वहिनी तर वडिलांना दादा म्हणत. त्यांचे वडील रेंज ऑफिसर होते. नोकरी निमित्ताने त्यांच्या सतत बदल्या होत. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना पुण्यात यावे लागले. शालेय शिक्षण सेवासदन व हुजूरपागा येथे गेल्याने सुसंस्कृत, अभिजात अशा शाळेतील वातावरणाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले. घरात वाचनाचे वेड सगळ्यांनाच होते. जे पुस्तक हाती येईल ते त्या वाचत. शाळेत बक्षीस म्हणून मिळालेली पुस्तके ही त्यांच्यासाठी पर्वणी असायची. १९३८ मधे त्या मॅट्रिक झाल्या. आपणही कविता लेख लिहावे असे त्यांना वाटे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात बीए करत असतांना मेघदूत, हॅम्लेट अशी पुस्तके त्यांनी वाचली होती. कॉलेजच्या नियतकालिकांसाठी त्यांनी लेख लिहिला. त्या लेखनाबद्दल प्रा.माटे यांच्या अभिप्रायाने त्यांना अजून हुरूप आला. शिक्षण घेत असताना अवांतर वाचनाची गोडी वाढीस लागली. लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपारिक गीते, ओव्या, श्लोक त्यांच्या कानावर पडत. त्यामुळे कवितेची आवड संस्कारक्षम वयातच रुजत गेली. साहजिकच त्यांच्या साहित्यात ग्रामीण व नागरी दोन्हीचा प्रभाव जाणवतो.

लेखिका - विशाखा देशमुख
लेखिका – विशाखा देशमुख

बीए झाल्यावर संस्कृत विषय घेऊन पुणे विद्याीठातून त्या एमए ची परीक्षा सुवर्णपदकाच्या सन्मानासह उत्तीर्ण झाल्या. एमए झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नवयुग या साप्ताहिकात लेखनिका म्हणून काम केले. त्यावेळेस आचार्य अत्रेसुध्दा शांताबाईंच्या विद्वत्तेने प्रभावित झाले. मग त्यांनी संपादनाचे काम पाहिलं. इथे पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरल्यामुळे साहित्याच्या दृष्टीने ललित गद्य लेखनासाठी माझी मराठी भाषा साधी सोपी व सुबक झाली हे अत्र्यांचं माझ्यावर मोठं ऋण आहे, असं शांताबाई म्हणत असत. असं लेखन संपादन केल्यामुळे साहित्यविषयक गोष्टी व अनुभवाची शिदोरी त्यांना मिळाली होती. महाविद्यालयांमध्ये असतांनाच त्या गो.म जोशी यांच्या कडून उत्तररामचरित्र आणि ऋग्वेदातले उतारे शिकल्या होत्या. संस्कृत भाषेचा हा अभ्यास आणि अभिजात काव्याचे हे संस्कार त्यांच्या कवितेची शब्दकळा घडवण्यात सहायभूत ठरले. शांताबाई यांची पहिली कविता बीएच्या पहिल्या वर्षी शाळा पत्रकात तर पहिला काव्यसंग्रह वर्षा हा १९४७ साली प्रकाशित झाला.

कवयित्री, गीतकार म्हणून जरी त्यांची खरी प्रतिमा समाजासमोर आली असली त्या उत्तम अध्यापकही होत्या. त्याच बरोबर अनुवादक, समीक्षक, ललित व सदर लेखन, कथा, कादंबरी, संपादन, चरित्र लेखिका बाल साहित्यिका असा चौफेर प्रवास आपल्याला दिसतो. श्रावण शिरवा या शांताबाईंच्या पुस्तकात ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे आपल्या प्रस्तावनेत लिहितात.. काव्यलेखन हा शांताबाईंच्या प्रतिभेतला सर्वात रुजलेला वाड्मय प्रकार एखाद्या घटना प्रसंगातून सुचलेला विषय असो त्यांना विनासायास त्याला काव्यरुप देता येत असे. नवनव्या कल्पना आपल्या स्मरण भांडारातून त्या मदतीला घेत. प्रचंड वाचन, आणि अदभुत स्मरणशक्ती त्यांच्या ठिकाणी होती. बालगीते, चित्रपटगीते, द्वंद्वगीते, भावगीते, कोळीगीते, भूपाळी, भक्तिगीते, असे त्यांचा लेखणीतून उतरलेले गीत प्रकार ख्यातनाम गायक गायिकांनी गायलेत. तर प्रतिभावंत संगीतकारांनी संगीतबद्ध करून अजरामर केलेत. गीत लेखन करु लागल्याच्या कितीतरी आधीपासून त्या काव्य रचना करीत असत. प्रथम त्या चांगल्या कवयित्री होत्या म्हणूनच नंतर उत्तम गीतकार होऊन अनेक गीते लिहिली. सुरुवातीला वसंत अवसरे नावानेही त्यांनी लेखन केले.

किलबिल किलबिल पक्षी बोलती, अशा बालगीतासोबतच जिवलगा राहिले रे, जाईन विचारीत रानफुला, दिसते मजला सुख चित्र नवे, मराठी पाऊल पडते पुढे अशा एकाहून एक रचना तसेच वल्लव रे नाखवा हो, राजा सारंगा. राजा सारंगा, वादळ वार सुटलं ग अशी अत्यंत लोकप्रिय कोळीगीते त्यांनी लिहिली आहेत. कुठलाच गीत प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. मराठमोळी लावणी रेशमाच्या रेघांनी, पदरा वरती जरतारीचा मोर नाचरा हवा लिहून रसिकांच्या मनात स्थान मिळवलं.

नाट्यगीते लिहूनही त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे. हे बंध रेशमाचे या नाटकातील गाण्याबद्दल शांताबाई एक किस्सा सांगत.. लेखक रणजित देसाई व पं. जितेंद्र अभिषेकी यांना त्यांचं गीत पसंत नव्हतं. त्या नाटकात एक नायक उदास असतो. त्याला जे साध्य करायचं आहे ते होत नाही. शेवटी आपल्या हाती काहीच आल नाही अशी त्याच्या मनाची अवस्था असते. असा तो प्रसंग असतो. पण शांताबाईंनी लिहिलेले गीत त्यांना न आवडल्याने त्यांनी एक शेर ऐकवला. मग तो ऐकून त्यांच्या लेखणीतून काटा रुते कुणाला हे सर्वपरिचित गीत साकारले. शांताबाई यांचं एक विलक्षण लोकप्रिय गीत म्हणजे तोच चंद्रमा नभात हे गीत. यशस्वी चंद्र गीतांमध्ये मनाच्या स्वरलिपीत कोरले गेलेले हे गीत ऐकणाऱ्यला आनंदाचं वेड लावत तर गाणाऱ्याला ओढ लावत. शांता शेळके व सुधीर फडके यांच्या रचनेतील हे अवीट गोडीच गीत शीला भट्टारिका नावाच्या कवयित्रीने रचलेल्या संस्कृत श्लोकावरून घेतल्याचे त्या सांगत असत. त्यांना निसर्ग फार आवडे. डोक्यावर पदर आणि मोठे कुंकू त्याच्या व्यक्तिमत्त्वावर घालत होते. आपला साधेपणा त्यांनी सतत जपला. आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्याच असेन मी नसेन मी, तरी असेल गीत हे या गीता प्रमाणे असणार आहे.

https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2020/10/VID-20201011-WA0004-1.mp4

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरबीआयच्या निर्णयामुळे मोठ्या गृह कर्जाच्या दरात घट…

Next Post

कोरोनामुळे यंदा जपानचा फ्लॉवर फेस्टिव्हल रद्द …

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या ११ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 10, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

दारू पाजून तरुणीवर बलात्कार… अश्लील फोटो व्हायरल करण्याचीही धमकी… मित्रासमवेत शरीरसंबंधांची बळजबरी…

नोव्हेंबर 10, 2025
crime1 1
महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणावर थेट तलवारीने सपासप वार… नाशकातील घटना…

नोव्हेंबर 10, 2025
Audi Q3 Signature Line
महत्त्वाच्या बातम्या

भारतात लॉन्च झाल्या ऑडीच्या या लक्झुरीअस कार…

नोव्हेंबर 10, 2025
thandi
मुख्य बातमी

थंडीच्या लाटेबाबत असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 10, 2025
bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
Next Post
japan e1602403624379

कोरोनामुळे यंदा जपानचा फ्लॉवर फेस्टिव्हल रद्द ...

Comments 2

  1. शुभांगी इनामदार says:
    5 वर्षे ago

    विशाखाताई खूप छान लिहिलेत.
    श्रुतीचे गाणे पण ????

    उत्तर
  2. Varsha nawale says:
    5 वर्षे ago

    Khupch chaan lihiles tai. Ashich chaan chaan lihit raha.

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011