गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विवेकानंदांनी थेट राजालाच समजावले होते मूर्तीपूजेचे महत्व…

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 4, 2021 | 1:08 am
in संमिश्र वार्ता
0

मुंबई – आपण मूर्तीपूजा का करतो, त्याने काय साध्य होते, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, त्याचे योग्य उत्तर मिळत नाही. स्वामी विवेकानंदांनी मात्र त्याचे योग्य उत्तर दिले आहे. मूर्तीपूजेशी निगडीत अलवर शहराचाही संबंध आहे, त्यामुळे आज आपण तेही जाणून घेणार आहोत.

अलवरचा इतिहास

मत्स्यनगर अर्थात मत्स्यपुरी. महाभरत काळात अलवर शहराची हीच ओळख होती. महाभारताच्याही पूर्वी राजा विराटचे पिता वेणू यांनी मत्स्यपुरीला राजधानी केले होते. अरावली नदीच्या काठावर वसलेल्या अलवरची ओळख किल्ले, हवेली, पुतातत्व वास्तू, सरिस्का अभयारण्यातील वाघ यांच्यामुळे जगभर झाली आहे. पांडवांनी सरिस्कामध्येच अज्ञातवास घालवला होता, अशीही मान्यता आहे. येथील बाला किल्ला, जयसमंद आणि सिलीसेढ झरा, अजबगढ, राजौरगढ, सिटी पॅलेस, फतेहगंज घुमट व भानगड पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र अलवरची ओळख याच्याही पुढे आहे. येथील मातीत स्वामी विवेकानंदांच्या अनेक स्मृतींचा गंध आहे.

स्वामीजींची आठवण

स्वामी विवेकानंदांनी आपल्या प्रभावी शैलीत अलवरचे पाचवे राजा मंगलसंह यांना मूर्तीपुजेचे महत्त्व पटवून दिले होते. स्वामी विवेकानंदांचा उल्लेख होताच अलवर येथील ७४ वर्षीय अॅड. हरिशंकर गोयल उत्स्फूर्तपणे बोलू लागले. त्यांनी स्वामीजींच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. मत्स्यनगरचे लाला गोविंद सहाय यांचे चिरंजीव राजाराम विजयवर्गिय यांच्याजवळ आजही शिकागोवरून स्वामीजींनी पाठविलेली पांती अस्तित्वात आहे. जगभरात स्वामीजींचे शिकागोतील भाषण चर्चेत आले, मात्र अलवर येथे स्वामीजींनी पाठविलेली पांती मोठा संदेश देऊन गेली. अलवर येथे भव्य पाषाण व छोटी कांस्य प्रतिमा तसेच स्मारक याची सातत्याने प्रचिती देतात.

अशी झाली राजाची भेट

अजरमेरच्या सुप्रसिद्ध मेयो कॉलेजचे पहिले विद्यार्थी राहिलेले राजा मंगल सिंह अलवर पाचवे राजा होता. संन्यास घेतल्यानंतर ७ फेब्रुवारी १८९१ मध्ये स्वामीजी पहिल्यांदा अलवरला आले होते. त्यांनी ३१ मार्च १८९१ पर्यंत इथेच वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. सध्या ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद चौक आहे, तिथे पूर्वी एक डोंगर होता. या डोंगरावर बसून स्वामीजी प्रवचन करायचे. महाराजांचे दिवाण कर्नल रामचंद्रदेखील इथे प्रवचन ऐकायला यायचे. त्यांच्याच माध्यमातून स्वामीजींची महती महाराजांपर्यंत पोहोचली. एक दिवस राजाने स्वामीजींनी महालात आमंत्रित केले. तिथे त्यांनी मूर्तीपूजेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्यावर वडिलांचे निधन झाल्यावरही त्यांच्या मूर्तीची पुजा का करता, असा प्रतिप्रश्न स्वामीजींनी राजाला विचारला. त्यानंतर स्वामीजींनी मूर्तीपुजेचे महत्त्व पटवून दिले.

अलवरला पोहोचले होते ९ पत्र

१८९१ ते १८९७ या कालावधीत स्वामी विवेकानंदांनी येथील वेगवेगळ्या लोकांना एकूण ९ पत्रे लिहीली. काही पत्र कर्नल रामचंद्रांच्या वंशजांकडे, तर काही पत्र लाला गोविंद सहाय यांना पाठविली होती. लाला गोविंद सहाय यांना आलेली पत्र राजाराम हन गुप्ता यांच्याकडे आजही जतन केलेली आहेत.

तीनवेळा अलवरला आले स्वामीजी

स्वामी विवेकानंद अलवरला किती वेळा आले, याबाबत वेगवेगळी मते आहेत. मात्र सर्वसाधारणपणे ते तीनवेळा आले असे मानले जाते. पहिल्यांदा १८९१ मध्ये, त्यानंतर खेतडीला जाताना अलवरला मुक्काम केला. तर शिकागोवरून परतल्यानंतरही स्वामीजी आले होते, असे सांगितले जाते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय सांगता? या तलावातील पाण्याला स्पर्श केला तर बनते थेट दगड!!

Next Post

कृषी कायद्यावरून अमित शहा यांचे मोठे विधान

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै…भारत – पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन

सप्टेंबर 11, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्स फाउंडेशन, वनतारा, रिलायन्स रिटेल आणि जिओकडून मदतीचा हात

सप्टेंबर 11, 2025
VIRENDRA DHURI
संमिश्र वार्ता

‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

सप्टेंबर 11, 2025
sushila kargi
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की? अंतरिम सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु

सप्टेंबर 11, 2025
G0e W1lXkAAWJGD
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रव्यापी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक…झाले हे निर्णय

सप्टेंबर 11, 2025
G0f9gZ0aYAAJPQC e1757556321796
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये भारताची सलामी…पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने यूएईच्या संघाचा ९ विकेट्सने केला पराभव

सप्टेंबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Next Post
amit shah

कृषी कायद्यावरून अमित शहा यांचे मोठे विधान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011