नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर आजपासून वाहनांची ये-जा अधिकृतरित्या सुरू झाली आहे. दिल्ली ते मेरठ हे अंतर ६०.४ किलोमीटरचे असून या एक्स्प्रेस-वे वरून ते अवघ्या ४५ मिनीटांमध्ये पूर्ण होईल. अर्थात बुधवारपासूनच हा मार्ग वापरायला लोकांनी सुरुवात केली आहे. सध्या दर निश्चित नसल्यामुळे कालपासून विना टोल वाहनांची येजा सुरू आहे.
दिवसभरात ५० हजार वाहने या मार्गावरून जातील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. भविष्यात एक लाखापर्यंत ही संख्या जाईल, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. टोल वसुलीसाठी आटोमॅटिक नंबर प्लेट रिडर सिस्टीम (एएनपीआर)चा वापर होणार आहे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. एकूण ८ हजार ३४६ कोटी रुपयांमध्ये हा महामार्ग तयार झाल आहे, हे विशेष. तर त्याची लांबी ८२ किलोमीटर आहे.









