बुधवार, नोव्हेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लोकरंगभूमी – पारंपारिक कलांचा मानबिंदू

ऑक्टोबर 1, 2020 | 7:26 am
in इतर
3
राजू देसले
(लेखक कवी आहेत)

राजू देसले (लेखक कवी आहेत)


IMG 20201001 WA0022
राजू देसले, नाशिक
……
नव्या आणि सहजपणे उपलब्ध होणार्‍या करमणुकीच्या जगात आज पारंपारिक लोककलांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अल्प उत्पन्नगटातील कलाप्रकार म्हणजे लोककला आणि त्याच अनुषंगाने लोकरंगभूमीच्या अस्तित्वाचा विचार करणे आजच्या नवनव्या चॅनेल्सच्या माध्यमांच्या जमान्यात महत्त्वाचे आहे.
आजही खेड्यापाड्यात गावच्या जत्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धा व तमाशा सादरीकरणासाठी अर्धी अर्धी रक्कम खर्च केली जाते. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर दोन वेळा हास्य फुलते ते ‘सुगीच्या दिवसात व तमाशा बघताना’ असे म्हटले जाते. गण, गवळण, बतावणी, वगनाट्य असा मनोरंजनाचा बाज असलेल्या तमाशा लोकरंगभूमीचा पारंपारिक कलेचा मानबिंदू आहे. काळू-बाळू, चंद्रकांत ढवळपुरीकर, विठाबाई नारायणगावकर, कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर, रघुवीर खेडकर अशा अनेक लोकनाट्य पथकांनी महाराष्ट्राला अभिरुचीची अस्सल मनोरंजनाची भेट दिली व समाजाचे प्रबोधनही केले आहे आणि ते महाराष्ट्राच्या लोककलेचे संचित रसिकांनी जपून ठेवले आहे.
छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी काही वर्षापूर्वी ‘तमाशा’ ह्या विषयावर छायाचित्रे काढली. महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या कलाप्रकारात काय बदल झाले ? लोकांची तमाशा कलावंतांकडे उपेक्षेने बघण्याची वृत्ती सार्वत्रिक आहे का ? याचा वेध छायाचित्रणातून घेतला. यासाठी संदेश पुणे जिल्ह्यातील छोट्या खेड्यापासून ते सातारा, सांगली, कर्‍हाड, मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, जालना ते थेट विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जवळपास सत्तर ते ऐंशी गावात फिरला. त्यापैकी निम्याहून अधिक गावात मातीचे रस्ते, केबल नेटवर्क नव्हते, दूरध्वनीचीही सुविधा नव्हती पण तमाशाची परंपरा होती. संदेशने तमाशातील सोंगाड्या, मावशी, सरदार अशा अनेक पात्रांशी संवाद साधला आणि ते अनुभव शब्दबद्धही केले. बंगलोरच्या ‘इंडिया फाऊंडेशन फॉर दी आर्टस्’ या संस्थेने या कामासाठी त्याला शिष्यवृत्ती दिली होती.
सर्वसामान्यांचे रोजच्या जगण्याचे, आस्थेचे प्रश्‍न घेऊन ते बोलीभाषेत सादर करणे हा समान धागा लोककलाकार व तमाशा बघणार्‍यांमध्ये असतो. त्यातूनच हे सारे आपले आहे आणि कलाकारांची अदाकारी याचा सुरेख मेळ सादरीकरणात असतो त्यामुळे तमाशासारखी कला अजूनही जिवंत आहे. ‘जांभूळ आ‘यान’ सार‘या आ‘यानाचा फॉर्म असलेले कथननाट्य. कुंती आणि द्रौपदीच्या ‘मन पाकुळलं’ या एका मनोवस्थेचे चित्रण रंगमंचावर किती प्रभावीपणे सादर होते हे अनेकांनी अनुभवले आहे. मौखिक परंपरेतून आलेल्या कथा सादरीकरणात किती जिवंतपणा लोककलाकार आणू शकतो याचा अनुभव रंगभूमीवर लक्षणीय ठरला आहे.
प्रा.रवींद्र कदम यांनी दिग्दर्शित कलेल्या ‘खंडोबाचं लगीन’ या नाटकाने लोकरंगभूमीवर असाच इतिहास घडवला आहे. सुरेश चिखले यांनी लिहिलेल्या या नाटकाची कथा तशी साधी सोपी. जेजुरी खंडेरायाच्या दुसर्‍या लग्नाची ही कथा. वाघ्या-मुरळी सूत्रधारांकडून जागरात खंडेरायाच्या लग्नाची कथा सांगितली जाते. जागरण विधीनाट्याचा फॉर्म असलेली ही कथा. कथनशैलीतून उलगडत जाते. कलावंतांचा सहजसुंदर अभिनय, नेपथ्य यामुळे या नाटकाने सादरीकरणाचा अनोखा अनुभव दिला. ग्रामीण ढंगातील संवाद आणि गीते, लय, अभिनयातील अस्सलपणाने नाशिकच्या रंगभूमीवर हे नाटक मैलाचा दगड ठरले. महाराष्ट्राबाहेर या नाटकाचे जोरदार कौतुक झाले.
याच शैलीचा वापर करून लोकरंगभूमीवर ‘कथा तुळशीच्या लग्नाची’ हे नाटक रवींद्र कदम यांनी दिग्दर्शित केले होते. यात कीर्तनाचा फॉर्म वापरला. तुळशीच्या लग्नाचे आ‘यान कीर्तनकार सांगतो आणि त्यातून जगण्याची, लोकजीवनाची रहस्ये उलगडत जातात अशी ही कथा. त्यातही बोलीभाषा आणि रसाळपूर्ण निरुपण यांचा प्रभावी वापर केला. डॉ.रामदास बरकले यांनीही लोकरंगभूमीसाठी प्रयोगशील जाणीवेतून दिग्दर्शन केले. त्यात ‘क्रांतीचक्र‘, आतून कीर्तन वरून तमाशा, गाढवाचं लग्न’, शेक्सपिअरच्या ‘मिडसमर नाईट’वर आधारीत नाट्यविष्कारातून लोकनाट्याचा अनोखा अविष्कार त्यांनी दिला. लोककलांच्या अंगानेही नाटकांचा विचार व्हावा हा डॉ.बरकले यांचा आग्रह असायचा त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. तसेच प्रभाकर कदम यांनीही ‘कलासंगम’ या ग्रुपमार्फत अनेक नाटके दिग्दर्शित केली. त्यात पु.ल.देशपांडे यांच्या ‘पुढारी पाहिजे’ या लोकनाट्याचा अग‘क‘माने समावेश करावा लागेल.
लोकरंगभूमीवरील घडणारे नाट्य हे अविष्काराच्या विविध पद्धतींचा शोध घेणारे असते. त्यात कलावंतांच्या सादरीकरणालाही कॅनव्हास मिळतो आणि कलावंताजवळ फक्त पारंपारिक सादरीकरणाचा संस्कार हीच त्याची शिदोरी असते.
अजूनही महाराष्ट्रात विविध भागात, खेड्यापाड्यात लोककलांचे गावपातळीवर सादरीकरण केले जाते. अनेक अष्टपैलू कलावंत लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत आहेत. त्यांना हक्काचे व व्यापक व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. त्यातूनच ही कला जिवंत राहील व त्यातून समाजाची सांस्कृतिक स्पंदने वेगाने सुरू राहतील.

IMG 20201001 WA0021
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अक्षर कविता – मालेगावचे नाना महाजन यांच्या ‘झेलाबाई माय’ या कवितेचे अक्षरचित्र

Next Post

नाशिकला आले हे पोलीस अधिकारी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
police...

नाशिकला आले हे पोलीस अधिकारी

Comments 3

  1. लक्ष्मण महाडिक 9422757523 says:
    5 वर्षे ago

    राजू देसले यांचा लोकरंगभूमी संदर्भातील लेख वाचला.
    लोकरंगभूमीची नाशिकची परंपरा ,खंडोबाचे लग्न , आमचे गुरुवर्य प्रा.रामदास बरकले यांचे दिगदर्शन तो सर्व काळपट डोळ्यासमोर उभा राहिला. नाशिकचे साहित्यिक राजू देसले हे एक संयमित व्यक्तिमत्व असल्याने अत्यन्त सुंदर लोकरंगभूमीची धांडोळा सुंदर रितीने घेतला.

    उत्तर
  2. DR SWAPNIL TORNE says:
    5 वर्षे ago

    राजू देसले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. धन्यवाद.

    उत्तर
  3. Laxman Barhate says:
    5 वर्षे ago

    प्रिय मित्र राजू देसले ,यांच्या अभ्यासपूर्ण चिंतनातुन शब्दबद्ध झालेले लेख वाचले.हा चिंतनातुन आलेला आजीबाईचा बटवा आहे.वाचकाला अनेक नवे संदर्भ यातून मिळतात.त्यांच्या या निर्मळ प्रवाहाने आपली तहान ंनक्किच तृप्त होईल .

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011