नवी दिल्ली – लठ्ठ लोकांसाठी कोरोनाचा संसर्ग प्राणघातक ठरण्याची शक्यता अधिक आहे. दिल्लीतील कोविड रुग्णालयात आतापर्यंत झालेल्या मृत्यूंमध्ये असे लठ्ठ रुग्ण मोठ्या संख्येने असल्याचे निदर्शनास आले आहेत.
येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे की, संसर्ग झालेल्या कोरोना रूग्णांपैकी, ज्यांना व्हेंटिलेटर आवश्यक होते, त्यापैकी 30 टक्के लोक हे लठ्ठपणामुळे ग्रस्त होते. दिल्लीतील सर्वात मोठे कोविड रुग्णालय एलएनजेपीमध्ये दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी काही लठ्ठ होते. या रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश कुमार म्हणाले की, लठ्ठपणा ही एक मोठी समस्या आहे.
जर अशी व्यक्ती कोरोनाग्रस्त बनली तर धोकादायक ठरते. अशा रूग्णांवर उपचार करण्यात देखील अडचण आहे, कारण हे लोक आधीच अनेक आजारांना बळी पडतात. एखाद्या व्यक्तीमध्ये लठ्ठपणा जितका जास्त वाढतो, रोग होण्याचा धोका देखील वाढतो. रुग्णालयाचे डॉक्टर त्यांच्या उपचाराकडे विशेष लक्ष देत असले तरी, लठ्ठ लोकांमध्ये जास्त धोका आहे. आतापर्यंत, संक्रमणामुळे मृत्यू झालेल्यांपैकी जवळजवळ 30 टक्के लोक लठ्ठपणाचे होते. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कोविड नोडल ऑफिसर डॉ. अजित जैन म्हणाले की, लठ्ठपणामुळे पीडित लोकांच्या उपचाराकडे विशेष लक्ष दिले जाते. शरीरात चरबी जास्त जमा झाल्यामुळे या रुग्णांना मधुमेह, हृदयरोग देखील होतो. यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते.
अपोलो हॉस्पिटलचे डॉ. पी. के. सिंघल यांनी स्पष्ट केले की, लठ्ठ लोकांमध्ये कोणत्याही आजाराचे प्रमाण जास्त असते. कारण लठ्ठपणामुळे पीडित लोकांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त आहे. त्याचा यकृतावर परिणाम होतो. यामुळे, रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते. म्हणूनच लठ्ठपणाच्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त असतो. जर या रूग्णांनाही मधुमेहाचा त्रास असेल तर हा आजार त्यांच्यासाठी अत्यंत घातक आहे.
एम्सच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, ज्या लोकांची बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 23 पेक्षा जास्त आहे ,त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. लठ्ठ लोकांमध्ये बीएमआय 23 पेक्षा जास्त आहे. अशा लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा दुप्पट धोका असतो.
लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी आपल्या आहारात फायबर वस्तूंचा समावेश करावा, तसेच अन्नात भाज्या आणि फळे अधिक खाव्यात, वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करावे, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.