शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यात ५वी ते ८वीचे वर्ग सुरु; असा होता प्रतिसाद

जानेवारी 27, 2021 | 1:51 pm
in संमिश्र वार्ता
0
NPIC 2021127162025

मुंबई – कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सुरु असलेले इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून प्रत्यक्ष सुरु झाले. मुंबईसह काही ठिकाणी अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यात बहुतांश शाळांमधे आज पाचवी ते आठवीचे वर्ग भरले. आज सुरू झालेल्या शाळांना पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात ४ जानेवारीपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. त्यानंतर आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शाळांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आलं होत. आज सकाळी मुलांचे ताप मोजून आणि सॅनिटायझरनं हात स्वच्छ करून प्रवेश देण्यात आला. सुरक्षित अंतर पाळून शाळा सुरू झाल्या. अनेक शाळांमध्ये सजावट करून तसेच रांगोळ्या काढून मुलांचे स्वागत करण्यात आले.

धुळे जिल्ह्यात ५३३ शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. धुळे शहरातल्या कमलाबाई कन्या शाळेत आज दुपारी ११ वाजता पाचवी ते आठवीचे वर्ग भरले. त्यापुर्वी शाळेत आलेल्या विद्यार्थिनींची शिक्षिकांनी थर्मल तपासणी करत, कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. ९ महिन्यानंतर शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. शाळांमध्ये वर्गात ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली.

वाशीम जिल्ह्यातल्या शाळांमधे इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीचं पालन करत सुरू झाले. या वेळी विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांमधील उपस्थिती चांगली असली तरीही जिल्ह्यात काल खासदार आणि आमदार यांच्या वादामुळे झालेल्या तणावाचा परिणाम शहरी भागातल्या शाळांमधल्या विद्यार्थी उपस्थितीवर दिसून आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. शाळांनी सर्व वर्ग निर्जंतुक करून मुलांचं थर्मल स्कॅन आणि ऑक्सिजन लेवल तपासून वर्गामधे प्रवेश दिला. ५० टक्के विद्यार्थ्यांना बोलावून हे वर्ग सुरू राहणार असून संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांचं संमतीपत्र घेऊन हा प्रवेश दिला जात आहे.

परभणी, जिल्ह्यातल्या सर्व शाळांमधे पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले होते. त्यानुसार आजपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे प्रत्यक्ष वर्ग सकाळी सुरु झाले. परभणी शहरातल्या सर्व शाळा यामुळे गजबजून निघाल्या. शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचं तापमान मोजलं गेले, तसेच सॅनिटायझरने हात धुऊन घेतले जात होते. त्यानंतरच शाळेत विद्यार्थी शाळेत प्रवेश करत होते. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मास्क घालूनच शाळेत यावे, त्याचबरोबर शाळांनी कोविड-१९च्या नियमांचं काटेकोर पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत. त्या सर्व वर्गाना विद्यार्थी उपस्थित राहत असून संख्या पूर्ण असल्याचं शिक्षण विभागानं सांगितलं. मुंबईत पुढचा आदेश येईपर्यंत शाळा बंदच राहतील, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दोन आठवड्यांपूर्वी दिले होते.

हिंगोली जिल्ह्यातील एकाही शाळेमध्ये इयत्ता  पाचवी ते आठवीचे वर्ग  सुरू झाले नाहीत. शिक्षकांच्या आर. टी.पी.सी.आर. चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. तो अहवाल,पालकांचं संमतीपत्र , शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन शिक्षण आधिकाऱ्यांकडे पाठवण्याचं काम सुरु आहे. लेखी परवानगीनंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत.आजपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांकडे एकाही शाळेचा प्रस्ताव परवानगीसाठी दाखल झाला नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचं दिसतं, असं आमच्या वार्ताहरानं कळवले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा शुक्रवारी ऑनलाईन दीक्षांत समारंभ

Next Post

बागलाण – बर्ड फ्लूची लागण, पशुसंवर्धन विभागाने केले ११९२ कोंबड्याचे कलिंग

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
IMG 20210127 WA0035

बागलाण - बर्ड फ्लूची लागण, पशुसंवर्धन विभागाने केले ११९२ कोंबड्याचे कलिंग

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011