तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहिर झाल्या होत्या. यात ८ ग्रामपंचायतींसह एकूण १८९ सदस्य प्रतिस्पर्ध्याअभावी बिनविरोध झाले आहेत. तर ६१ ग्रामपंचायतींच्या ४६४ जागांसाठी शुक्रवारी, (दि. १५) मतदान झाले. मतदान प्रक्रियेसाठी तहसिलदार तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांचे मार्गदर्शनाखाली एकूण १३८०अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. २०३ मतदान केंद्राच्या माध्यमातून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. १००९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.