बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

येवला – पत्रकारांच्या कुटुंबीयांना ५० लाखाचा विमा द्या, येवला पत्रकार संघाची मागणी

by Gautam Sancheti
सप्टेंबर 18, 2020 | 1:06 pm
in स्थानिक बातम्या
0
01

येवला – बातमीतून जनजागृती पत्रकार करतातच पण अनेक गरजूंना शासकीय योजनांचा लाभ,संस्थांच्या माध्यमातून आर्थिक मदत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोना काळात आरोग्य सेवेतील अडचणी दूर करण्यासाठी व रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी जागल्याची भूमिका पत्रकारांनी केली. याचमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार हे कोरोना यौध्दे असून कोरोनामुळे पत्रकाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे..
या घोषणेची अंमलबजावणी करून राज्यातील कोरोणामुळे मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना मदतीचा लाभ द्यावा अशी मागणी येवला तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.

या मागणीसाठी शुक्रवारी तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष विंचू, ज्येष्ठ मार्गदर्शक योगेंद्र वाघ व राकेश गिरासे, रवींद्र करमासे,विलास पगारे,जिल्हा सदस्य भाऊलाल कुडके,उपाध्यक्ष शिवाजी भालेराव,सरचिटणीस भिमाजी शिंदे,खजिनदार कुमार गुजराथी, सहसंघटक सुदर्शन खिल्लारे, सहचिटणीस संतोष घोडेराव,कार्यकारिणी सदस्य मुकुंद अहिरे,रोहन वावधने, बापूसाहेब वाघ,अनिल अलगटप्रमोद पाटील,नरेंद्र बटाव,संतोष बटाव,अनुराग जोशी,मयूर गुजराथी,तुषार जेजुरकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात कोरोनाचं संकट व्यापक झालेलं असून ५०० पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झालेली आहे.५० च्या जवळपास पत्रकारांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत, आणि कोरोनानं २५ पत्रकारांचे बळी गेले आहेत.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना पत्रकार हे कोरोना यौध्दे असून कोरोनामुळे पत्रकाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनानं २५ पत्रकारांचे बळी गेल्यानंतर देखील एकाही पत्रकाराच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत मिळाली नाही.

सरकारने घोषणा केल्या प्रमाणे दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाख रूपयांची आर्थिक मदत मिळावी.
पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना विमा योजनेचे कवच दिले जाईल आणि त्याबाबतचा निर्णय पुढील कॅबिनेटमध्ये घेतला जाईल असे स्पष्ट केले होते.या गोष्टीलाही पंधरा दिवस झाले पण विम्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.तो तातडीने व्हावा असे निवेदनात म्हटले आहे.

माथेरानचे संतोष पवार,पुण्याचे पांडुरंग रायकर यांचा मृत्यू त्यांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने झाला आहे.पुन्हा अशी वेळ कोणाही पत्रकारावर येऊ नये यासाठी पत्रकारांना अग्रक्रमाने बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होईल अशी व्यवस्था व्हावी आणि त्यासंबंधीचा अध्यादेश लगेच काढला जावा.पांडुरंग रायकर आणि संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे टोपे आणि माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले होते.त्यानुसार  पुणे आणि रायगडच्या सिव्हिल सर्जन यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले होते.या चौकशीचे काय झाले ते समजले नाही.दोन्ही पत्रकारांच्या मृत्यूस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे.या मागण्यांची सरकारकडून दखल घेतली न गेल्याने आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी  आंदोलन करत असून आरोग्य मंत्र्यांकडे एसएमएस पाठवून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर पेटीएम गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

Next Post

मानापमान नाट्य; इंदू मिल स्मारक पायाभरणी सोहळा ऐनवेळी रद्द

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

मानापमान नाट्य; इंदू मिल स्मारक पायाभरणी सोहळा ऐनवेळी रद्द

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी घरामध्ये वादाचे प्रसंग टाळलेले बरे, जाणून घ्या, गुरुवार, २१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 20, 2025
IMG 20250820 WA0386

नाशिक जिल्हा परिषद पंचायत विकास निर्देशांकात राज्यात अव्वल…यांच्या हस्ते होणार गौरव

ऑगस्ट 20, 2025
election 1

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या…सहकार विभागाने घेतला हा निर्णय

ऑगस्ट 20, 2025
fda1

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई…मिठाईचा २४ हजाराचा साठा जप्त

ऑगस्ट 20, 2025
प्रातिनिधिक फोटो

कारमधून आलेल्या नागासाधूने संमोहन करुन व्यावसायीकास लुटले, रोकडसह हातातील सोन्याची अंगठी केली लंपास

ऑगस्ट 20, 2025
Sale KV Static blue 1x1 copy 1 e1755691438850

फ्लिपकार्टवर पोको एम७ प्‍लस ५जीच्‍या विक्रीला सुरूवात…ही आहे किंमत

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011