शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

युवकांनो, देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मानिर्भर बनवा; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन

by India Darpan
ऑगस्ट 31, 2020 | 9:03 am
in राष्ट्रीय
0
NPIC 2020830145530

नवी दिल्ली – देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मानिर्भर बनवण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी आज आकाशवाणी वरून ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे केले. देशाच्या समस्या निवारण करण्यासाठी तरुण पिढीची क्षमता आणि कल्पकता यांचा उपयोग करून घ्यायला हवा असेही मोदी म्हणाले.

आत्मनिर्भर भारत अॅप संदर्भात देशातल्या युवकांनी मोठा उत्साह दाखवला असून, त्यामध्ये भर घालण्यासंबंधी आलेल्या ७ हजार सूचनांमध्ये दोन तृतीयांश छोट्या शहरातल्या युवकांच्या आहेत हे त्यांनी निदर्शनास आणले. आत्मनिर्भर भारत अभियानात ऑनलाईन खेळ आणि खेळणी क्षेत्रात खूप संधी असून, स्टार्ट अप कंपन्यांनी एकत्रित काम करून या क्षेत्रात देशाला महत्वाचे स्थान प्राप्त करून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकऱ्यांची प्रशंसा

कोरोना संकट काळात देशातल्या शेतक-यांनी केलेल्या कामाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली. यंदा खरीप हंगामांतल्या लागवडित गेल्या वर्षीपेक्षा ३ ते १३ टक्के अधिक वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ‘भारतीय कृषी कोष’ निर्माण होत असून त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातलं पीक आणि त्याचं पोषणमूल्य यांची माहिती मिळणार आहे. सप्टेंबर महिना ‘पोषण महिना’ म्हणून पाळण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले. पाच सप्टेंबरला असलेल्या शिक्षक दिनाचा उल्लेख करून मोदी यांनी शिक्षक वर्गाने कोरोना काळातल्या आव्हानांना संधीत रूपांतरित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
देशाला खेळण्यांचे हब बनवा
गांधीनगरची ‘चिल्ड्रेन युनिव्हर्सिटी, महिला आणि बाल विकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि सूक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने मुलांसाठी चांगल्या दर्जाची खेळणी कशी बनविणे आवश्यक आहे, याविषयी काम केल्याचे सांगितले. खेळणी निर्मिती, उत्पादनामध्ये भारत एक मोठे केंद्र कसे बनू शकते, याच्याविषयी काम करीत असल्याचे सांगितले. मुलांच्या दृष्टीने खेळणी म्हणजे केवळ वेगवेगळ्या क्रियाकलापांचे साधन नाही, तर बालकांच्या आकांक्षांना पंख लावण्याचे काम खेळणी करतात. खेळण्यांमुळे मुलांचे केवळ मन रमते, मुलांचे मनोरंजन होते, असे नाही, तर खेळणी मुलांच्या मनाची निर्मिती करतात, त्यांना काही करण्याचा हेतू निर्माण करतात, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी मुलांच्या खेळण्याविषयी लिहून ठेवलेला किस्साही पंतप्रधानांनी यावेळी सांगितला. गुरूदेवांनी मुलांसाठी कोणते खेळणे चांगले, याविषयी नमूद केले आहे की, जे खेळणे अपूर्ण असते आणि जे खेळणे मुले सर्वजण मिळून खेळत-खेळत पूर्ण करतात, तेच खेळणे, तोच खेळ उत्कृष्ट असते. मुलांचे बालपण अनुभवताना त्यांच्यामधली सर्जनशीलता समोर आणणारे, खेळणे चांगले असते, असेही पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मुलांच्या जीवनावर खेळण्यांचा विविध पैलूंमधून कसा परिणाम पडतो, याविषयी मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्यात आले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. देशाच्या विविध भागामध्ये अतिशय उत्तम खेळणी बनविणारे कुशल कलाकार आहेत, असे सांगून पंतप्रधानांनी अनेक राज्यांमध्ये कुठे-कुठे खेळणी बनविणारे स्थानिक कलाकार आहेत, त्यांची माहिती दिली. याचे उदाहरण देताना त्यांनी कर्नाटकातल्या रामनगरम इथल्या चन्नापटना, आंध्र प्रदेशातल्या कृष्णामधील कोंडापल्ली, तामिळनाडूतल्या तंजावूर, आसाममधल्या धुबारी, उत्तर प्रदेशातल्या वाराणसी या शहरांमध्ये खेळणी निर्मितीची केंद्रे विकसित करण्यात येत असल्याचे सांगितले. खेळण्यांच्या जागतिक बाजारपेठेत 7 लाख कोटींची उलाढाल होते, त्यामध्ये भारताचा सध्या अतिशय अल्प हिस्सा आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

विशाखापट्टणमचे  सी.व्ही. राजू यांनी स्थानिक कलाकारांच्या मदतीने उत्कृष्ट दर्जाचे  इटिकोप्पका खेळणे बनवले आहे, त्याबद्दल पंतप्रधानांनी राजू यांचे कौतुक केले. या परंपरागत स्थानिक खेळण्याला गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त झाली आहे. आता खेळणी निर्मिती क्षेत्रातल्या उद्योजकांनी एकत्र यावे आणि स्थानिक  खेळणी बनविणा-यांना वाव द्यावा, त्यांच्या खेळण्यांचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, ‘व्होकल फॉर लोकल’ व्हावे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

संगणकावर खेळण्याचे प्रमाण अलिकडे खूप वाढले आहे, असे नमूद करून त्यांनी आपल्या भारतीय ऐतिहासिक कल्पना आणि संकल्पनांवर आधारित  संगणकांचे खेळ बनविण्याचा सल्ला दिला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिन्नर तालुक्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू

Next Post

महापौरांच्या हस्ते म्हसरुळला आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपास सुरुवात

Next Post
IMG 20200830 WA0014

महापौरांच्या हस्ते म्हसरुळला आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपास सुरुवात

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011