बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

युद्धातील लष्करी सामुग्रीच्या साठ्याचे महत्त्व

by Gautam Sancheti
डिसेंबर 14, 2020 | 11:01 am
in इतर
0

युद्धातील लष्करी सामुग्रीच्या साठ्याचे महत्त्व

केंद्र सरकारने लष्कराला तातडीच्या घनघोर युद्धात १५ दिवस पुरेल इतक्या लष्करी सामुग्रीचा साठा करण्यास सांगितले आहे, अशी बातमी आज प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचा अर्थ नक्की काय आहे…..
दिवाकर देशपांडे
दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि सामरिकशास्त्राचे तज्ज्ञ आहेत)
हल्लीच्या पारंपरिक युद्धात एका गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते ती म्हणजे कोणत्याही देशाची किती दिवस युद्ध करण्याची क्षमता आहे. ही क्षमता त्या देशाची अर्थव्यवस्था, त्या देशाच्या लष्कराकडे असलेला दारुगोळा आणि युद्धसाहित्याचा साठा आणि त्याच्या रसदमार्गाची सुरक्षितता यावर अवलंबून असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास आज पाकिस्तानची युद्ध करण्याची क्षमता कोणत्याही बाह्यमदतीशिवाय जेमतेम १५ दिवसांची आहे, असे मानले जाते. कारण पाकिस्तानची परकी गंगाजळी आटलेली आहे, अर्थस्थिती डामाडोल आहे, त्यामुळे पाककडे ‘एफ-१६’ सारखी अमेरिकन विमाने असली व ती भारताविरुद्ध वापरण्यास अमेरिकेने परवानगी दिली तरी पाकिस्तान इंधनाअभावी ती पुरेशा कार्यक्षमतेने वापरू शकणार नाही. त्यामुळे पाकची फार काळ युद्ध लढण्याची क्षमता असणार नाही.
भारताची चीनविरुद्ध किती दिवस युद्ध करण्याची क्षमता आहे, ही एक अंदाज करण्याची गोष्ट आहे.
चीनची अर्थव्यवस्था व लष्करीबळ भारतापेक्षा अधिक असल्यामुळे ती चीनपेक्षा कमी असणार हे उघड आहे… पण आता भारतीय सरकारने ही क्षमता तातडीच्या व घनघोर युद्धासाठी १० दिवसांवरून १५ दिवसांवर नेण्याचा आदेश दिला आहे. ही एवढी गुप्त गोष्ट भारताने जाहीर का केली, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. यात दोन गोष्टी आहेत… एकतर हा माहितीयुद्धाचा प्रकार आहे… चीनसारखा देश आपली सर्व शस्त्रसामुग्री जमा करून सीमेवर उभा असताना दोन्ही देशांतले घनघोर युद्ध फक्त १५ दिवस चालेल यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. चीननेही भारताच्या या क्षमतेबाबत काही अंदाज बांधलेलाच असणार… या अंदाजाला फाटे फोडण्यासाठीच भारताने ही १५ दिवसांची बातमी फोडली आहे, यात काही शंका नाही. चीनने आपल्या युद्ध लढण्याच्या क्षमतेच्या प्रमाणात भारताच्या युद्ध लढण्याच्या क्षमतेचा अंदाज लावला असणार हे उघड आहे.
चीनचा हा अंदाज काय असू शकेल याचा अंदाज भारतीय लष्करानेही लावला असणार. इथे एक सांगायला हवे की, हे अंदाज म्हणजे लष्करी कार्यालयात बसून केलेले अंदाज नसतात… त्यासाठी सर्व गुप्तचर यंत्रणा कामाला लावल्या जातात… हाती आलेल्या माहितीची सत्यता पडताळली जाते.. एकमेकांकडे असलेल्या सर्व प्रकारच्या युद्धसामुग्रीची विस्तृत माहिती एकमेकांकडे असतेच.. तरीही बऱ्याच गोष्टी गुप्त असतात व बरीच खोटी माहिती पसरवलेली असते. त्यामुळे सखोल चौकशी करून हे अंदाज केले जातात व ते बरेचसे तथ्यांजवळ जाणारे असतात. त्यामुळे भारताने प्रसारमाध्यमांत दिलेल्या १५ दिवसांच्या बातमीकडे ना चीन दुर्लक्ष करू शकतो ना त्यावर विश्वास ठेवू शकतो… पण या बातमीमुळे पाक आणि चीन या दोन्हीकडच्या युद्धनियोजकांना आपल्या नियोजनावर पुन्हा एकदा नजर फिरवावी लागणार हे निश्चित.
भारताच्या सीमेवर आपण लाखभर सैन्य आणि अफाट युद्धासामुग्री जमविली असूनही भारतात भीतीचे वातावरण पसरलेले नाही, भारताचे लष्कर प्रमुख परदेश दौरे करीत आहेत, परराष्ट्रमंत्री विविध परिसंवादात, परिषदांत भाग घेत आहेत… विरोधी पक्षांनी आता चीनसंबंधी प्रश्न विचारणे बंद केले आहे… उलट ते शेतकरी आंदोलनासारखे लोकशाही देशात होणारे आंदोलन चालवित आहेत… सरकारही सीमाप्रश्नावर आपली मनधरणी करण्याऐवजी आंदोलक शेतक ऱ्यांची मनधरणी करीत आहे… हे सर्व चीनला बुचकळ्यात टाकणारे आहे. आक्रमणाचे संकट सीमेवर उभे असताना भारतीयांच्या जीवनात काहीही फरक पडलेला नाही, देशात कोणताही घबराट नाही, मदत मिळविण्यासाठी फार मोठी धावाधाव नाही… यामुळे लडाख आक्रमणाचे चिनी शिल्पकार गोंधळून गेले आहेत.
गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याने दिलेला अनपेक्षित रट्टा, कैलासश्रेणीतील शिखरे काबिज करून चिनी आक्रमणातली काढून घेतलेली हवा… यामुळे आता पुढे भारतीय सैन्य व सरकार काय करू शकते याचा अचूक अंदाज आल्याशिवाय चिनी सैन्य काही हालचाल करील असे वाटत नाही आणि चिनी सैन्याला हा अंदाज बांधता येऊ नये, असेच भारताचे प्रयत्न असणार.
दोन्ही देशांत कोअर कमांडर पातळीवर होणाऱ्या नवव्या बैठकीबाबत आता दोन्ही देश काहीच बोलत नाहीत, म्हणजे भारताने चर्चेची तयारी दाखवली आहे व चीनला तारखा कळवण्यास सांगितले आहे, पण चीन आता आठवी बैठक होऊन दीड महिना होत आला तरी तारीख कळवित नाही. त्याचे कारण उघड आहे.. भारताने प्रत्येक बैठकीत एकच मागणी लावून धरली आहे, ती म्हणजे एप्रिलपूर्व स्थितीत चीनने आपले सैन्य न्यावे… पण चीनला तसे करणे नामुष्कीचे आहे…
भारताने कैलास श्रेणीची पर्वतशिखरे सोडून द्यावीत अशी मागणी चीनने केली, पण भारताने तिला वाटाण्याच्या अक्षता लावल्या, त्यामुळे चीनला आता स्वस्थपणे लडाखच्या थंडीत सर्वसाधनसामुग्रीनिशी बसून वेळ काढावा लागेल.
लडाखमध्ये सध्या जी स्थिती आहे, ती भारताने मान्य करावी व तीच नवी नियंत्रण रेषा मानावी असा प्रस्ताव चीनने दिल्याची माहितीही नुकतीच प्रसिद्ध झाली होती.
चीनने तसे सुचवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या तरी भारत तसे मानण्यास तयार नाही, त्यामुळे भारताचे सर्व सैन्य लडाखमध्ये कायमचे राहणार असे दिसते. ही परिस्थिती असेल तर चीनलाही आपले सैन्य आता तिथेच कायम ठेवावे लागेल. त्याला आता मागे फिरता येणार नाही. याचा दीर्घकालीन परिणाम तिबेटमध्ये अस्थिरता निर्माण होण्यावर होऊ शकतो.
लेखमाला e1607869782148
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कंगना विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव

Next Post

ग्रामपंचायत निवडणूक : जातवैधता प्रमाणपत्राबाबत आयुक्तांनी केला मोठा खुलासा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
कांद्याच्या भावासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सप्टेंबर 17, 2025
Next Post

ग्रामपंचायत निवडणूक : जातवैधता प्रमाणपत्राबाबत आयुक्तांनी केला मोठा खुलासा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011