शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या जिल्ह्यात २६ फेब्रुवारीपासून होऊ शकते ‘लॉकडाऊन’

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 23, 2021 | 4:11 pm
in संमिश्र वार्ता
0
carona

यवतमाळ – जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. नागरिकांकडून कोव्हीड संदर्भातील सुचनांचे काटेकोरपणे पालन आणि चाचण्यांसाठी नागरिक समोर आले नाही तर प्रशासनाला ‘लॉकडाऊन’ करण्याशिवाय पर्याय नाही. येत्या दोन – तीन दिवसात या परिस्थितीवर गांभिर्याने लक्ष ठेवले जाईल. अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात २६ फेब्रुवारीपासून किमान १० दिवसांचा ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात येईल, असे राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.
नमुने तपासणी आणि चाचण्यांसाठी नागरिक समोर आले नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यावर होईल, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील कोरेानाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासन लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार आहे.  यवतमाळ, पुसद, दिग्रस दारव्हा, केळापूर तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिका-यांनी जास्तीत जास्त नमुन्यांची तपासणी करावी. पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा गांभिर्याने शोध घ्या. नमुने तपासणी आणि चाचण्या यांचे रोजचे उद्दिष्ट पूर्ण झालेच पाहिजे. रुग्णाच्या संपर्कातील कोणीही सुटता कामा नये. एका पॉझेटिव्ह व्यक्तिमागे किमान २० जणांची नमुने घेणे आवश्यक असून ते त्वरीत चाचण्यांसाठी पाठवा. याबाबत दोन्ही कार्यालयांनी आपल्या अखत्यारीतीतील खालच्या यंत्रणेला स्पष्ट निर्देश द्यावे. अन्यथा संबंधितांनाच जबाबदार ठरविण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.
जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिका-यांनी समन्वयातून काम करावे. केवळ कारणे सांगून होणार नाही तर, आहे त्या परिस्थितीत आणि उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून टेस्टिंगबाबत गांभिर्य राखा. जिल्ह्यात २८७९७ जणांचे लसीकरण २० फेब्रुवारीपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र अजूनही नोंदणी केलेल्या ४० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले नाही. यात आरोग्य विभागातील कर्मचा-यांचा जास्त वाटा आहे. तर पोलिस आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची लसीकरणाची टक्केवारी चांगली आहे. जिल्ह्यात औषधांची कमतरता भासणार नाही, याची आतापासूच दक्षता घ्या. कोव्हीड केअर सेंटरमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर रुग्ण तेथे भरती राहील. गृह विलगीकरणाची सुविधा दिली तर संबंधित रुग्ण नियमांचे पालन करीत नाही, असेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता केवळ अत्यावश्यक रुग्णांनाच गृह विलगीकरणाची सुविधा द्या. उर्वरीत सर्वांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती ठेवा, असेही निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यामध्ये मुंबईनंतर यवतमाळ राज्यात दुस-या क्रमांकावर आहे. तसेच खाजगी रुग्णालयातील मृत्युबाबत तीन सदस्यीय समितीचे गठण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना नियंत्रक डॉ. गिरीश जतकर, डॉ. बाबा येलके, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, जयंत देशपांडे, पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट्स – २२९ कोरोनामुक्त झाले तर २७१ रुग्ण वाढले

Next Post

खरीपात खताच्या योग्य पुरवठा व्हावा यासाठी कृषीमंत्री दादा भुसे थेट दिल्लीला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Meetin with Hon. Union Chemical ferti.

खरीपात खताच्या योग्य पुरवठा व्हावा यासाठी कृषीमंत्री दादा भुसे थेट दिल्लीला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

girish mahanjan e1704470311994

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय…इतका निधी मिळणार

ऑगस्ट 9, 2025
ladki bahin yojana e1727116118586

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट, खाते चेक करा, १५०० रुपये येण्यास सुरुवात

ऑगस्ट 9, 2025
प्रातिनिधीक छायाचित्र

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे गट व मनसे एकत्र…बघा, कोणत्या पक्षाला किती जागा..

ऑगस्ट 9, 2025
rohit pawar

राजकीय भूमिका घेण्याची ख्याती मिळवलेल्या महिला आयोगावर सरकारने तत्काळ कारवाई करावी..आमदार रोहित पवार यांची मागणी

ऑगस्ट 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मतभेदांचे प्रसंग टाळावे, जाणून घ्या, शनिवार, ९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0420 1

अपघातग्रस्त शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले शालेय शिक्षण मंत्री

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011