खरे म्हणजे बिट्टन देवी यांना तीन मुले आहेत. सुना आणि नातवंडे सुध्दा आहेत. मात्र त्यांचे पती पुरणलाल यांच्या मृत्यू नंतर विगत पाच वर्षांपासून मुलगे आणि सुना यांच्या वागणुकीवर त्या नाराज झाल्या होत्या. बिट्टन देवींच्या मते मुले आणि सुना त्यांची काळजी घेत नाहीत. त्यांना जेवायला सुद्धा देत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे सुरु असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या भरवशावर त्यांना गुजराण करावी लागते. यामुळे आपल्या पोटच्या मुलांपेक्षाही अधिक पंतप्रधान मोदींवर त्यांचा विश्वास आहे. म्हणूनच आपल्या वाटणीला आलेली सगळी जमीन त्यांना मोदींच्या नावे करायची आहे.