शुक्रवार, ऑक्टोबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

“जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं”; मोदींचा देशाला सल्ला

ऑक्टोबर 21, 2020 | 1:22 am
in मुख्य बातमी
0
narendra modi

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी दसरा, दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशाला उद्देशून भाषण केले. ते कुठल्या विषयावर बोलणार याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागून होते. कोरोनाच्या संकटकाळात मोदी मोठी घोषणा किंवा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठे पॅकेज जाहिर करणार का, अशी उत्सुकता होती. मात्र, मोदी यांनी देशवासियांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मोदी म्हणाले की,

  • टाळेबंदी उठवली याचा अर्थ असा नाही की कोरोना विषाणू नष्ट झाला आहे.

    देशभरातील परिस्थितीत झालेल्या सुधारणेचे त्यांनी कौतुक केले, आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत आहेत आणि लोक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत..

    मोदींनी  नमूद केले की सणांच्या निमित्ताने बाजारपेठा देखील  सामान्य स्थितीकडे परत येऊ लागल्या आहेत.

    ते म्हणाले की, गेल्या 7-8 महिन्यांत प्रत्येक भारतीयांच्या प्रयत्नांमुळे भारत अधिक चांगल्या स्थितीत आहे आणि कुणीही ती बिघडू देऊ नये.

    पंतप्रधानांनी नमूद केले की देशात रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा झाली आहे आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मोदी म्हणाले की, दर दहा लाख नागरिकांपैकी  सुमारे 5500 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर अमेरिका आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये ही संख्या जवळपास  25000 इतकी आहे.

    पंतप्रधान म्हणाले की भारतात दर दहा लाख नागरिकांमध्ये मृत्यूचे प्रमाण 83 आहे, तर अमेरिका, ब्राझील, स्पेन, ब्रिटनसारख्या प्रगत देशांमध्ये  आणि इतर अनेक देशांमध्ये हे प्रमाण जवळपास 600 इतके  आहे.

    अनेक विकसित देशांच्या तुलनेत देशातील अनेक नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यात भारत यशस्वी होत असल्याबद्दल  पंतप्रधानांनी कौतुक केले.

    पंतप्रधानांनी देशातील कोविड पायाभूत सुविधांच्या सुधारणांचा उल्लेख केला. ते म्हणाले की देशभरात 12000 विलगीकरण केंद्रांसह  कोरोना रूग्णांसाठी 90 लाखाहून अधिक खाटा उपलब्ध आहेत.

    ते म्हणाले, देशभरात 2000 हून अधिक कोरोना चाचणी  प्रयोगशाळा कार्यरत आहेत, तर चाचण्यांची संख्या लवकरच 10  कोटींच्या पुढे जाईल.

    ते म्हणाले की, संसाधन समृद्ध देशांच्या तुलनेत जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचवण्यात भारत यशस्वी होत आहे आणि कोविड महामारी  विरूद्ध देशाच्या  लढाईत चाचण्यांची वाढती संख्या ही मोठी शक्ती आहे.

    “सेवा परमो धर्म” या मंत्राचा अवलंब करून  नि: स्वार्थपणे मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

    या सर्व प्रयत्नांमध्येही त्यांनी जनतेला बेसावध न राहण्याचा आणि कोरोना विषाणूचा नाश झाला आहे, किंवा आता कोरोनाकडून कोणताही धोका नाही असा समज करून न घेण्याचा  इशारा त्यांनी दिला.

    करोना नियंत्रण प्राथमिक  उपायांचा अंगीकार न करणार्या नागरिकांना उदे्शुन ते म्हणाले की, “जर तुम्ही  कुटुंबासाठी खबरदारी घेतली नाही, म्हणजे मास्क न लावता बाहेर जात असाल, सामाजिक अंतर पाळत नसाल तर तुम्ही स्वत: ला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलांना, वृद्धांनाही तितकेच जोखीम दाखवत आहात.”

    पंतप्रधानांनी अमेरिका आणि युरोपमधील सध्या सुरू असलेल्या परिस्थितीचा उल्लेख केला जेथे कोरोनाची घटना सुरुवातीला कमी झाली पण नंतर अचानक वाढू लागली.

    आज अमेरिका असो, किंवा मग युरोपातील इतर देश, या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत होते, मात्र अचानक त्यांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे आणि ही वाढ चिंताजनक आहे.

    महामारीवर लस सापडल्याशिवाय निष्काळजीपणा करू नये आणि कोविड-19  विरुद्धचा लढा कमकुवत होऊ देऊ नये, असे त्यांनी आवाहन केले.

    पंतप्रधान म्हणाले की, मानवतेला वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि देशाच्या वैज्ञानिकांसह अनेक देश लसीच्या निर्मितीवर काम करत आहेत.

    ते म्हणाले की कोरोनाविरूद्ध विविध लसींवर काम सुरू असून त्यातील काही प्रगत अवस्थेत आहेत.

    पंतप्रधान म्हणाले की, ही लस त्वरित उपलब्ध होताच प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवण्यासाठी सरकार सविस्तर आराखडा तयार करत आहे.

    लस तयार होईपर्यंत बेपर्वाईने न वागण्याचे त्यांनी आवाहन केले.

    पंतप्रधान म्हणाले की आपण कठीण परिस्थितीतून जात आहोत आणि थोडीशी निष्काळजीपणा एक मोठे संकट निर्माण करू शकते आणि आपल्या आनंदावर विरजण घालू शकते.

    नागरिकांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतांना जागरुक राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

    नागरिकांनी सहा  फूट अंतर (दो गज की दूरी) राखावे , वेळोवेळी साबणाने हात धुवावेत आणि मास्क घालावा असे आवाहन त्यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘डीडीएलजे’ला २५ वर्षे पूर्ण; अजूनही क्रेझ कायम

Next Post

या सरकारी कंपनीकडून दिवाळी बोनस जाहीर; सहा टक्के वाढ

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post

या सरकारी कंपनीकडून दिवाळी बोनस जाहीर; सहा टक्के वाढ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011