रविवार, ऑगस्ट 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोदींच्या राज्यात केजरीवालांची एन्ट्री!; गुजरातमध्ये लक्षणीय यश

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 24, 2021 | 5:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Euu dcJWgAE4WCJ

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दणक्यात एन्ट्री घेतली आहे. गुजरातमधील महानगरपालिकेच्या निवडणुकीत 27 जागांवर विजय मिळवून आम आदमी पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह काँग्रेसपुढेही मोठे आव्हानच निर्माण केले आहे.
2013 मध्ये काँग्रेसच्या राजवटीला कंटाळून दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या होत्या. त्यानंतर देशात भाजपची सत्ता आली, पण दिल्लीकरांनी 2015मध्येही केजरीवाल यांनाच पसंती दिली होती. आता गुजरातमध्येही आम आदमी पार्टीला याच चमत्काराची अपेक्षा आहे आणि त्यासाठी पहिले पाऊलही त्यांनी दणक्यात टाकले आहे. 
गुजरातमध्ये काँग्रेस हा दुसरा मुख्य पक्ष आहे. परंतु, महापालिकेच्या राजकारणातून काँग्रेसला हद्दरपार करण्यात केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मोठा हातभार लावला. अख्ख्या गुजरातमध्ये महानगरपालिकेत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. 

भाजपने 576 पैकी 483 आणि आपने 27 जागांवर झेंडा गाडला आहे. तर एमआयएमने 7 जागांवर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे दिड वर्षांनी होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसपुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. 
अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेचे नव्या राजकारणाची सुरुवात करण्यासाठी अभिनंद केले आहे. ‘गुजरातच्या जनतेने कामाच्या राजकारणाला मतदान केले. ते भाजप आणि काँग्रेसच्या राजकारणाने त्रस्त झाले होते. त्यांना एक तिसरा पर्याय हवा होता आणि तो पर्याय म्हणून त्यांनी आम आदमी पार्टीला निवडले आहे,’ असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. 
आता आगामी विधानसभा निवडणूक फक्त आप आणि भाजपमध्ये होईल, असे विधान करून त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. तर त्याचवेळी काँग्रेसला प्रतिस्पर्धी मानत नसल्याचेही स्पष्ट केले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी गुजरातमधील सेटींगच्या राजकारणाचा अंत झाला असल्याचे म्हटले आहे. 

Eu94KN7UUAQrFzV

आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी काँग्रेसला भाजपचे आक्सीजन म्हटले आहे. काँग्रेस देशभरातून संपत आहे आणि त्याचाच फायदा भाजपला मिळत आहे. त्यामुळे तिसरा पर्याय उभा होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजप नव्हे काँग्रेससाठी धोकादायक?
गुजरातमध्ये 27 जागांवर विजय मिळविणारा केजरीवाल यांचा पक्ष भाजपसाठी नव्हे तर काँग्रेससाठी धोकादायक समजला जात आहे. दिल्लीमध्ये एेकेकाळी पहिल्या क्रमांकावर असलेला काँग्रेस पक्ष आज लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पडला आहे. 
दिल्लीतील निवडणुका आप विरुद्ध भाजप अश्याच होत आहेत. दिल्लीसारखा चमत्कार गुजरात विधानसभा निवडणुकीत होणे अशक्य मानले जात असले तरीही दिड वर्षांनंतर काँग्रेसमात्र गुजरातमधून हद्दपार झालेली असेल, असे चित्र नक्कीच आहे.

ErQ UpeUcAI76rR

इतर राज्यांमध्ये आप कुठे?
दिल्लीबाहेर थोड्याफार प्रमाणात पंजाब वगळता इतर कुठल्याच राज्यांमध्ये आम आदमी पार्टीला आपली क्षमता सिद्ध करता आलेली नाही. कुठे स्थानिक स्वराज्य संस्था तर कुठे एखाद दुसरी विधानसभा व लोकसभेची जागाच त्यांना जिंकता आलेली आहे. पण दिल्लीप्रमाणे सत्तेच्या चाव्या हाती घेण्याचे आपचे मनसुबे इतर राज्यांमधील प्रमुख पक्षांनी पूर्ण होऊ दिले नाही. 
महाराष्ट्रात तर आप आणि मनसे यांची सारखीच स्थिती आहे. केवळ हिमाचल, जम्मू–काश्मीर आणि गोव्यात काही जागा आपच्या नावावर आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये आप काय करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रतिक्षा संपली!! रेल्वेचा AC 3 टियर कोच येतोय; बघा, त्याची वैशिष्ट्ये व फोटो

Next Post

एकाकीपणा घालविण्यासाठी या देशात चक्क मंत्र्याची नियुक्ती; स्वतंत्र मंत्रालयही

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

एकाकीपणा घालविण्यासाठी या देशात चक्क मंत्र्याची नियुक्ती; स्वतंत्र मंत्रालयही

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

आता अहिल्यानगर-पुणे नव्या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न…शंभर ते सव्वाशे किलोमीटर अतंर कमी होणार

ऑगस्ट 10, 2025
modi 111

नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या १८४ सदनिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन…

ऑगस्ट 10, 2025
नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांचे फोटो 1 1024x683 1 e1754819420411

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ….या स्थानकावर थांबे

ऑगस्ट 10, 2025
cbi

इगतपुरी येथून सुरू असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा सीबीआयने केला पर्दाफाश…५ आरोपींना अटक

ऑगस्ट 10, 2025
ed

विशेष लेख – ईडीला थपडामागून थपडा, तरी पण सुधारयाला तयार नाही

ऑगस्ट 10, 2025
Jitendra Awhad

ये अंदर की बात है, नितीन गडकरी ‘सत्य’ के साथ है!…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

ऑगस्ट 10, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011