सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुक्त विद्यापीठाची परीक्षा होणार अशी; मंत्री सामंत यांनी केला खुलासा

by India Darpan
सप्टेंबर 21, 2020 | 2:04 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20200920 WA0021 1

नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात अंतिम वर्षात शिक्षण घेत  आहेत.  १ लाख ९१ हजार म्हणजे सुमारे २ लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहोत. त्यासाठी विद्यापीठाला शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. मुक्त विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
आज यशवंतराव चव्हाण माहाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यश ईन सभागृहात परिक्षांबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन खताळ, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश बोंडे उपस्थित होते.
१० लाख परीक्षा
सामंत म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी खासदार शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून आजच्या २५ वर्षांपूर्वी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर देशभर मुक्त शिक्षण प्रणालीचा विस्तार होत गेला. आज १६१ अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ९१४ विषयांचे  जवळ जवळ ६ लाख २७ हजार विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. त्यातील अंतिम वर्षांची परीक्षा देणारे १ लाख लाख ९१ हजार विद्यार्थी आहेत, त्यासाठी ऑनलाईन परीक्षा पद्धतीच्या माध्यमातून १० लाख ४१ हजार परिक्षा घ्यावयास लागणार आहेत, असे सामंत यांनी सांगितले.
४० हजार विद्यार्थी ऑफलाईन
ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असून विद्यार्थी आहे तिथून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल, टॅब्लेट, लॅपटॉप, संगणक तसेच त्यांच्यकडे इंटरनेट कनेक्टिविटीसह उपलब्ध असलेल्या डिव्हाइस अथवा साधनाद्वारे ते देवू शकतील. त्यासाठी आवश्यक असलेली पूर्व प्रक्रिया विद्यापीठामार्फत सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यातील ४० हजार विद्यार्थी ऑफलाईन पर्याय निवडतील असा विद्यापीठाचा अंदाज आहे. परंतु डिजिटल व ऑनलाईन शिक्षणाचा राज्यातला पहिला प्रयोग विद्यापीठाने सर्वप्रथम राज्यात राबवला, यशस्वी केला आज तोच प्रयोग केरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच विद्यापीठांना अंगिकार करावा लागतोय. ही शासनाद्वारे स्थापित विद्यापीठाची सर्वात मोठी उपलब्धी असून त्यामुळे विद्यापीठातील अंतीम वर्षांची परिक्षा देणारे १०० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या परिक्षापद्धतीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन सामंत यांनी केले.
सर्व खबरदारी घेणार
आज दिवसेंदिवस कोरोना संसर्गितांची संख्या वाढत असून त्याला प्रामुख्याने विविध कारणास्तव होणारी गर्दी कारणीभूत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी न करता घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे शासन-प्रशासनामार्फत स्वागतच आहे. अंतीम वर्षातील परिक्षार्थींच्या संख्येचा विचार करता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जवळ जवळ २ हजार विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून परिक्षा देणार आहेत. त्यासाठी विद्यापीठामार्फत राज्याच्या मुख्य सचिवांना तसेच पोलीस महासंचालक, त्या त्या जिल्ह्यातील आपत्ती नियंत्रण प्राधिकरण, जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधिक्षकांना पूर्वकल्पना द्यावी, जेणेकरून मनुष्यबळ, पोलीस सुरक्षा, त्याचबरोबर कुठलाही कायदा सुवियवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यावर उपाययोजना, नियंत्रण करणे शासन-प्राशासनास शक्य होईल. त्याचबरोबर सार्वजनिक आरेग्याच्या व परिक्षार्थींच्या आरोग्याचाही प्रामुख्याने विचार करावा, असेही आवाहन सामंत यांनी केले.
अशी असेल परिक्षा व कार्यक्रम
 तीन पर्यायी प्रश्न असलेली प्रश्नपत्रिकेचा असेल. त्यासाठी ५० गुण असतील त्यापैकी ३० प्रश्न परीक्षार्थींना सोडवावे लागतील २० गुणांचे असेल प्रात्यक्षिक परिक्षा. २२ सप्टेंबरला वेळापत्रक जाहिर होणार असून २५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन परिक्षेसाठी नोंदणी केली केली जाणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात परिक्षा व डिसेंबर महिन्यात निकाल तसेच परिक्षेपासून वंचित व नापास विद्यार्थ्यांची परिक्षा पुन्हा घेतली जाईल अशी माहिती विद्यापीठाच्या वतीने यावेळी देण्यात आली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अक्षर कविता – मनमाडच्या हेमंत वालेंच्या ‘श्रावण सरी’

Next Post

जिल्हाधिकारी मांढरे यांच्या या सूचनेमुळे विद्यार्थी येणार ऑनलाईन

India Darpan

Next Post
Nashik meeting 4

जिल्हाधिकारी मांढरे यांच्या या सूचनेमुळे विद्यार्थी येणार ऑनलाईन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011