गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुंबई ते दिल्ली रेल्वे धावणार ताशी १६० किमी वेगाने

by Gautam Sancheti
डिसेंबर 19, 2020 | 7:45 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


नवी दिल्ली – भारतीय रेल्वेच्या क्षमतांमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि एकूणच प्रवासी तसेच माल वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आणि वाढ करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक राष्ट्रीय रेल्वे योजना तयार केली आहे.  या योजनेचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार  दिल्ली-हावडा आणि दिल्ली-मुंबई मार्गांची गती १६० किमीपर्यंत वाढविली जाणार आहे. त्यामुळे अवघ्या काही तासातच दोन्ही शहरे गाठता येणार आहेत.

या दीर्घकालीन धोरणात्मक योजनेचा आराखडा विकसित करताना रेल्वेच्या पायाभूत क्षमता वाढवणे आणि एक वाहतूक व्यवस्था म्हणून रेल्वेचा वाटा वाढविणे, यांचा समावेश आहे. राष्ट्रीय रेल्वे आराखडा, रेल्वेच्या भविष्यातील सर्व पायाभूत, व्यावसायिक आणि वित्तीय नियोजनासाठी एक सामाईक पाया म्हणून उपयुक्त ठरेल. हा आराखडा विविध मंत्रालयांकडे पाठवण्यात आला असून, जानेवारी 2021 पर्यंत त्याला अंतिम स्वरूप देण्याची योजना आहे.

या योजनेची उद्दिष्टे :-

  • 2030 पर्यंत रेल्वे क्षेत्राकडून असलेल्या मागणीच्या तुलनेत अधिक क्षमता निर्माण करणे, जेणेकरून या वाढीव क्षमतेत 2050 पर्यंतच्या मागणीच्या गरजा पूर्ण होऊ शकतील. तसेच एकूण प्रवासी आणि माल वाहतुकीतला रेल्वेचा सध्या असलेला 27% टक्के वाटा 2030 पर्यंत 45% पर्यंत वाढवणे, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्याची भारताची कटिबद्धताही पूर्ण होईल.
  • माल आणि प्रवासी वाहतुकीतील प्रवासी क्षमतेचे मूल्यांकन करणे, यासाठी एक वार्षिक सर्वेक्षण करण्यात आले, ज्याअंतर्गत देशातील शेकडो प्रातिनिधिक ठिकाणी विशेष पथकांनी सर्वेक्षण केले.
  • माल आणि प्रवासी अशा दोन्ही प्रकारच्या दरवर्षी वाढणाऱ्या वाहतुकीचे 2030 पर्यंतचे अनुमान आणि 2050 पर्यंतचे दशांशानुसार अनुमान काढणे.
  • रेल्वेच्या एकूण वाहतुकीचा खर्च सुमारे 30 टक्क्यांनी कमी करणे आणि त्याचे लाभ ग्राहकांपर्यंत पोहचवणे

राष्ट्रीय रेल्वे आराखड्याचा भाग म्हणून व्हिजन 2024 देखील प्रकाशित करण्यात आले आहे. यानुसार काही महत्वाच्या प्रकल्पांना प्राधान्य देत 2024 पर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यात 100 टक्के विद्युतीकरण, अति गर्दीच्या मार्गांवर अनेक रेल्वेमार्ग बांधणे,सुवर्ण चतुष्कोन-सुवर्ण षटकोन मार्गांची गती 130 किमी/तास पर्यंत वाढवणे आणि या मार्गांवरील सर्व लेवल क्रॉसिंग हटवणे, अशा कामांचा समावेश आहे.

राष्ट्रीय रेल्वे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रेल्वे खाजगी क्षेत्रे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, राज्य सरकारे आणि मूळ उपकरण उत्पादक उद्योगांची मदत घेणार आहे.

या अंमलबजावणीमुळे 2030 पर्यंत, भांडवली गुंतवणुकीत वाढ वाढ होणायची अपेक्षा असून मालवाहतूक क्षेत्रात रेल्वेचा वाटा 45% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

2030 नंतर जो अतिरिक्त महसूल जमा होईल, त्यातून पुढच्या भांडवली गुंतवणुकीची व्यवस्था होऊ शकेल तसेच आधीच्या कामांसाठी काढलेले कर्जही त्यातून फेडता येईल. त्यानंतर रेल्वे प्रकल्पांसाठी सरकारी तिजोरीतून निधी खर्च करण्याची गरज राहणार नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

थंडीत अशी घ्या त्वचेची काळजी 

Next Post

…तर तब्बल ४.५ कोटी भारतीयांना व्हावे लागेल विस्थापित

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post

...तर तब्बल ४.५ कोटी भारतीयांना व्हावे लागेल विस्थापित

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011