शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत बंद मध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाही सहभागी होणार

डिसेंबर 6, 2020 | 1:00 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201206 WA0016

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली माहिती

नाशिक – दिल्लीतील किसान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ८ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंद मध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाही सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.दिघोळे म्हणाले की, वर्ष २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी भाषा करणारे केंद्रातील विद्यमान सरकार सातत्याने याच्या विपरीत निर्णय घेत असून शेतकरी कायदे असू द्या किंवा शेतमालाच्या आयात निर्यातीचे धोरण असू द्या सर्वच बाबतीत शेतकरी विरोधी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. देशात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनाही केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. कांद्याचे बाजार भाव वाढल्याचे निमित्त करून व ग्राहक हित जपण्याचे कारण देत कांद्याची निर्यात बंदी केलेली होती. आज मात्र कांद्याचे दर अगदी उत्पादन खर्चापेक्षाही कमी म्हणजे २ हजार रुपये प्रतिक्विंटल यापेक्षाही कमी झाल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे

कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्यानंतरही जर केंद्र सरकार कांद्यावर विविध  प्रकारचे निर्बंध घालत असेल तर नुकत्याच मंजुरी केलेल्या तीनही कृषी कायद्यांमुळे भविष्यात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची शाश्वती काय आहे, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ८ डिसेंबरला संपूर्ण भारत बंदची हाक देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे लाखो कांदा उत्पादक या बंदमध्ये सहभागी होणार आहे. आता तरी केंद्र सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत व जगात देशाची कृषिप्रधान अशी असलेली ओळख कायम टिकवावी व शेतकऱ्यांचीही आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शेतकरी हिताचेच निर्णय यापुढील काळात घ्यावे अशी मागणी भारत दिघोळे यांनी केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बदली खेळाडू म्हणून आला आणि मॅन ऑफ दि मॅच घेऊन गेला!

Next Post

८ तारखेला कडकडीत बंद पाळा, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे आवाहन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
Screenshot 20201206 185105

८ तारखेला कडकडीत बंद पाळा, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे आवाहन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011