बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत-चीन सीमा : वादळापूर्वीची शांतता?

ऑक्टोबर 14, 2020 | 9:31 am
in इतर
0
IMG 20201014 WA0004

वादळापूर्वीची शांतता?

भारत-चीन सीमेवर शांतता दिसत असली तरी ती पुढच्या खळबळीपूर्वीची शांतता आहे. गेल्या तीन चार दिवसांत पडद्याआड बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत आणि हा महिना संपेपर्यंत आणखी बरेच काही घडण्याची शक्यता आहे.
दिवाकर देशपांडे
दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि सामरिकशास्त्राचे तज्ज्ञ आहेत)
सीमेवरील सध्याची शांतता ही चीन बचावात्मक पवित्र्यात गेल्यामुळे आहे. खरे तर असे शांत बसण्यासाठी चिनी सैनिक नियंत्रणरेषा पार करून आले नाहीत. डेपसांग क्षेत्रात चीनला अनुकूल स्थिती आहे, पण त्याचा फायदा घेण्याच्या मन:स्थितीत चीन नाही. चीनला चिंता पडली आहे ती, नोव्हेंबरमध्ये अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक पार पडल्यानंतर भारतीय सैन्य काय करणार याची.
सध्याच्या थंडीने चिनी सैनिक हवालदिल झाले आहेत. त्यांना रणक्षेत्रात राहता यावे यासाठी चीनने ऑक्सिजनयुक्त  उबदार निवारे बांधले आहेत. अशा या उबदार निवाऱ्यात राहून भारतीय जवानांच्या हालचालींवर लक्ष ठेवता यावे यासाठी चीनने भारतीय सैन्याच्या हालचाली टिपणारे सेन्सॉर्स सीमेवर जागोजागी लावले आहेत. या सेन्सॉर्सचा फायदा घेऊन भारतीय सैनिकांनी हालचालींची हूल दिली तर उबदार निवारे सोडून चिनी सैनिकांना डोंगरदऱ्यात पळापळ करावी लागेल.
गोठत चाललेल्या पँगॉगत्सोमधून भारतीय कमांडो अचानक कारवाई करून फिंगर  क्षेत्रातून आपल्याला हुसकावून लावतील या भीतीने चिनी सैनिक उघड्यावर येऊन पहारा देत आहेत. सोमवारी झालेल्या कोअर कमांडर पातळीवरील चर्चेच्या सातव्या फेरीनंतर काढलेल्या संयुक्त निवेदनात त्यामुळेच गोडगोड शब्दांचा मारा करण्यात आला आहे.
“परिस्थिती चिघळेल असे काही करायचे नाही”, “मतभेदांचे रुपांतर वादात होऊ द्यायचे नाही”,” नव्याने कुमक आणायची नाही”… वगैरे समजुतदार वाक्यांचे कारण पूर्व लडाखमधील थंडीने भरलेली हुडहुडी आहे. पण बीजिंगच्या वातानुकूल सभागृहात बसून पत्रकार परिषद घेणाऱ्या चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवकत्याला मात्र या हुडहुडीची जाणीव नाही, त्यामुळे त्याने या संयुक्त निवेदनाच्या अगदी विपरित अशी विधाने केली आहेत. “चीन लडाख या केंद्रशासित प्रदेशाला मान्यता देत नाही”, “भारताने सीमाभागात रस्ते बांधण्यास सुरुवात केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे”.. वगैरे. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी सीमाक्षेत्रात बांधलेल्या ४४ पुलांचे उद्घाटन करून या प्रवकत्याला योग्य ते उत्तर दिले आहे.
गेल्या आठवड्यात क्वाडच्या मंत्रिपातळीवरील बैठकीत या गटातील चार देशांत परस्पर सहकार्याविषयी प्राथमिक चर्चा झाली, पण अजून ठोस काहीच बाहेर आले नाही. क्वाड आकारास येण्यास थोडा वेळ लागण्याची शक्यता दिसत आहे, त्यामुळे चीनने समाधानाचा सुस्कारा सोडला आहे, पण पुढच्या आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ व संरक्षणमंत्री मार्क एस्पर भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य समझोता करण्यासाठी भारतात येत आहेत, त्यामुळे चीनच्या पोटात गोळा आला आहे. Basic Exchange and Cooperation Agreement for Geo-Spatial cooperation (BECA)  या नावाच्या या करारानुसार भारताला चीनमधील लक्ष्ये अचूक टिपणारे जीपीएस आधारित तंत्रज्ञान तसेच ड्रोन उपलब्ध होणार आहेत. हा करार भारताने आपल्या गरजेनुसार दुरुस्त करून घेतला आहे. अर्थात आता भारताने अलिप्ततावाद सोडला आहे, वगैरे ओरड होईल पण अशी ओरड इंदिरा गांधींनी बांगलादेश युद्धाच्या वेळी सोविएत रशियाशी संरक्षण करार केला तेव्हाही झाली होती व मनमोहनसिंग यांनी अमेरिकेशी अणुकरार केला तेव्हाही झाली होती. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. चीनला आवर घालायचा असेल तर हे करावेच लागेल.
सदर लेखमाला
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्वस्तात सोने ? मोदी सरकार देते आहे ही संधी

Next Post

लालू पुत्र तेज प्रताप यादवची ऐवढी आहे संपत्ती!

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
EkGSmRrX0AIU6ce

लालू पुत्र तेज प्रताप यादवची ऐवढी आहे संपत्ती!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011