शुक्रवार, सप्टेंबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत-चीन तणाव : हवाई दल प्रमुखांच्या विधानाचा अन्वयार्थ (लेख)

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 6, 2020 | 9:18 am
in इतर
0
IMG 20201006 WA0006 1

हवाई दल प्रमुखांच्या विधानाचा अन्वयार्थ

“भारतीय हवाईदल चीनच्या तुलनेत कुठेही कमी नाही” हे हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल राकेशकुमारसिंग बहादुरिया यांचं विधान फक्त देशवासियांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेलं विधान आहे असा कुणाचाही समज होण्याची शक्यता आहे, पण उत्तर सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीच्या संदर्भात हवाईदलप्रमुखांनी हे जाणीवपूर्वक विधान केलं आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे.
दिवाकर देशपांडे
दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि सामरिकशास्त्राचे तज्ज्ञ आहेत)
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने घुसखोरी केल्यानंतर भारतीय नेते व लष्करी अधिकारी जी काही विधाने करीत आहेत ती ठरवून व जाणीवपूर्वक करीत आहेत. यापूर्वी लष्करी दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावावर लष्करी उपाय योजण्याचा उपाय भारताकडे आहे, असे विधान केले आणि काही दिवसांतच भारतीय सैनिकांनी कैलास पर्वतश्रेणीतील अनेक शिखरे काबिज करून चीनला चकित केले. आता हवाईदलप्रुखांनी केलेल्या विधानाला त्या संदर्भातच पहावे लागेल.
भारताच्या तुलनेत चीनचे हवाईदल मोठे आहे, हे जगजाहीर आहे, पण असे असले तरी हिमालयातील युद्धात चीनचे हे मोठे हवाईदल फार मोठी कामगिरी करण्याच्या स्थितीत नाही, कारण एकतर चीनचे संपूर्ण हवाईदल हिमालयात आणणे शक्य नाही. चिनी हवाईदलाला तैवान, जपान व अमेरिका यांच्या हवाईदलाशीही टक्कर घ्यायची आहे. त्यामुळे तिकडे बरीच हवाईसामुग्री तैनात करावी लागणार आहे आणि हिमालयात जे काही हवाईदल असेल त्याच्या कामगिरीवर हिमालयातील पर्यावरण व भौगोलिक स्थितीच्या मर्यादा आहेत. त्यामुळे नियंत्रणरेषेवर चिनी हवाईदल हे बचावात्मक स्थितीत आहे. त्यातच भारताकडे मोजकीच का होईनात पण राफाल विमाने आल्यामुळे परिस्थितीत खूप फरक पडला आहे.
चीनने नियंत्रण रेषेवर हवाई आक्रमणाऐवजी हवाई सुरक्षेवर भर दिला आहे. पूर्व लडाखमधील संपूर्ण नियंत्रण रेषेवर चीनने मोठ्या प्रमाणात विमानांवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. शिवाय आपल्या हवाईदलाची अपूरी क्षमता भरून काढण्यासाठी विविध प्रकारचे ड्रोन सज्ज केले आहेत. या खेरीज भारतीय लढाऊ विमानांच्या हालचाली टिपण्यासाठी रडार यंत्रणेचे जाळे उभे केले आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवाईदल कसे काम करणार हा मोठा प्रश्न होता. तसेच पाकिस्तानने दुसरी आघाडी उघडली तर पाकिस्तानच्या ‘एफ – १६’ या विमानांना भारतीय सुखॉय, मिराज आणि तेजस विमाने कशी तोंड देणार हाही प्रश्न होता. पण हवाईदलप्रमुखांनी आजच्या हवाईदलदिनाच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत चीन – भारत सीमासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाईदलाची स्थिती स्पष्ट केली आहे. सीमेवर तणाव निर्माण झाल्यापासून हवाईदलाची विमाने व हेलिकॉप्टर सीमेवर दररोज घिरट्या घालीत आहेत, या घिरट्या केवळ बलप्रदर्शनासाठी नसतात, त्यामागे शत्रूच्या रडारयंत्रणांची क्षमता जोखणे, शत्रूच्या संपर्क  यंत्रणेचा माग घेणे, चीनने आपल्या संरक्षण व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाच्या जाळ्यात गुंफले आहे, या जाळ्याचा भेद करण्याचा मार्ग शोधणे आदी हेतू असतात.
चीनचेही हवाईदल याच हेतूने  हालचाली करीत असणार यात शंका नाही. थोडक्यात गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांचे हवाईदल एकमेकांना जोखत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवाईदलप्रमुखांच्या या जाहीर विधानांकडे पहावे लागेल. बहादुरिया असेही म्हणाले की, भारतीय हवाईदलासाठी पूर्व लडाख हा एक छोटा विभाग आहे, आमची तयारी ही पूर्ण ३४०० किमी लांबीच्या भारत – चीन सरहद्दीसाठी आहे. या विधानामुळे चीनच्या हवाईदलावर ताण पडणार आहे हे नक्की. गिलगिट बाल्टीस्तान भागातील पाकच्या हवाईतळांचा वापर चीन  करीत आहे, यावरून चीनची अवस्था लक्षात यावी, असेही बहादुरिया म्हणाले.
पूर्व लडाखमध्ये भारतीय हवाईदलाला जमिनीवर लढणाऱ्या  आपल्या लष्कराशी संपर्क  ठेवून काम करायचे आहे. तेथे हवाईदल केवळ स्वतंत्रपणे काम करणार नाही, त्याची लष्कराला साथ असणार आहे, त्यामुळे लष्कर व हवाईदल यांच्यातील सुरक्षित व अभेद्य संपर्कयंत्रणा अल्पकाळात प्रस्थापित करणे हे एक आव्हान होते, ते पार पाडण्यात आले आहे, हेही हवाईदलप्रमुखांनी दिलेल्या एका मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे.
काही तज्ज्ञांनी पूर्व लडाखमध्ये भारताचे ऑप्टिकल फायबरचे जाळे नसल्यामुळे भारतीय लष्कर हे युद्धच लढू शकत नाही असा निष्कर्ष काढला होता व हे जाळे टाकायला तीन वर्षे लागणार असल्यामुळे भारताची परिस्थिती अवघड आहे असे म्हटले होते, पण एकतर अशी काही समस्याच अस्तित्वात नसावी किवा लष्कर व हवाईदलाने हा प्रश्न योग्यरीतीने सोडविला असावा असे दिसते. एकंदरच चीनबरोबर युद्ध झालेच तर हवाईदलाला मोठी व महत्त्वाची कामगिरी बजावावी लागणार आहे, व त्या दृष्टिने हवाईदलाने तयारी केली आहे, असे दिसते.
चीनचा सर्व भर हा क्षेपणास्त्रांनी युद्ध लढण्यावर दिसत आहे. अगदी जमिनावरील युद्धातही आपल्या सैनिकांना पुढे करण्याऐवजी दूरनियंत्रणातून वापरता येणाऱ्या  शस्त्रास्त्रांचा वापर करण्याकडे चीनचा कल दिसत आहे. त्याला भारतीय संरक्षण यंत्रणा कसे तोंड देते, ते पहावे लागेल.
सध्या जपानमध्ये क्वाड गटातील देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक चालू आहे, त्यात जे काही घडेल त्याचा उत्तर सीमेवरील स्थितीवर नक्कीच प्रभाव पडणार आहे. बघू या काय घडते ते…
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांचे घर अंधारात; यामुळे उत्तर प्रदेशात काळोख

Next Post

हाथरस – कोरोनाबाधित आमदार पीडितेच्या घरी. सर्वत्र जोरदार टीका

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी साधला संवाद…या विषयावर झाली चर्चा

सप्टेंबर 19, 2025
IMG 20250918 WA0276 e1758249257199
स्थानिक बातम्या

नाशिक एफडीएची धडक कारवाई…४३ हजाराचा बनावट पनीर व खव्याचा साठा जप्त

सप्टेंबर 19, 2025
cricket
स्थानिक बातम्या

रणजी ट्रॉफी सराव.. नाशिकच्या सत्यजित बच्छावची या सामन्यात ५ बळींसह अष्टपैलु चमक

सप्टेंबर 19, 2025
Untitled 26
मुख्य बातमी

भारतातील या ७ नैसर्गिक स्थळांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश…महाराष्ट्रातील या स्थळालाही स्थान

सप्टेंबर 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, शुक्रवार, १९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
IMG 20250918 WA0380 1
संमिश्र वार्ता

हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्यात सुधारणा करा…मंत्री छगन भुजबळ

सप्टेंबर 18, 2025
G1IZjsTaQAA9THD 1024x652 1
महत्त्वाच्या बातम्या

सूक्ष्म, लघु उद्योगांसाठी जमीन अकृषक परवाना अट काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश….

सप्टेंबर 18, 2025
crime1 1
क्राईम डायरी

रूम पार्टनर झोपी गेला…परप्रांतीय तरूणाने बॅगेतील रोकड काढून केला पोबारा

सप्टेंबर 18, 2025
Next Post
EjjX5zIVoAAaKIL

हाथरस - कोरोनाबाधित आमदार पीडितेच्या घरी. सर्वत्र जोरदार टीका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011