मंगळवार, ऑक्टोबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत-चीन तणाव : सहमतीच्या पाच कलमी कार्यक्रमानंतर

सप्टेंबर 13, 2020 | 11:14 am
in इतर
0
IMG 20200913 WA0008 1

भारत आणि चीन यांच्यात सीमेवरील पेचप्रसंग सोडविण्याबाबत सहमतीचा पाच कलमी कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानंतरची दोन्ही देशातील स्थिती नेमकी कशा आहे, या कार्यक्रमाचे काय परिणाम नजिकच्या काळात होणार आहेत याचा उहापोह करणारा हा लेख
दिवाकर देशपांडे
– दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षणशास्त्र तज्ज्ञ आहेत)
भारत आणि चीन यांच्यात सीमेवरील पेचप्रसंग सोडविण्याबाबत सहमतीचा पाच कलमी कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये फारसा उत्साह निर्माण झालेला दिसत नाही. नको असलेले अपत्य जन्माला आल्यावर घरात जसे वातावण असते तसे वातावरण दोन्ही देशांच्या राजनीतिक व लष्करी वर्तुळात निर्माण झाले आहे. भारतील लष्कराला हा करार पसंत पडलेला दिसत नाही.
कुणीही या पाच कलमी कार्यक्रमाबाबत आशावादी नाही याचे कारणच मुळात हा कार्यक्रम एक तात्पुरता व तकलादू कार्यक्रम आहे. त्याच्या अंमलबजावणीबाबत दोन्ही देश फारसे गंभीर दिसत नाहीत. शिवाय या कार्यक्रमातील कलमांचा अर्थ चीन कसा लावतो व भारत कसा लावतो, हे बघावे लागेल. दोन्ही बाजू त्याचा आपल्याला हवा तसा अर्थ लावू शकतात. दुसरे म्हणजे भारतीय सैन्याने कैलास श्रेणीतील जी शिखरे काबिज केली आहेत, त्यातली एक-दोन शिखरे वगळता सर्व शिखरे भारताच्या सध्या ताब्यात असलेल्या प्रदेशातील आहेत. ती १४-१५ हजार फूट उंचीवर आहेत, त्यामुळे ती आतापर्यंत व्यापलेली नव्हती. पण यापुढच्या काळात ती कायम व्यापलेली असणार आहेत. त्यामुळे या पाच कलमी कार्यक्रमाअंतर्गत ती रिकामी केली नाहीत, तर चीन भारतावर करार न पाळल्याचा आरोप करू शकतो. त्यामुळे हा करार विफल होण्याची अनेक कारणे करारातच लपलेली आहेत.
मुळात दोन्ही देशांनी हा करार वेळ काढण्यासाठी केला आहे, असे दिसते. सध्या परिस्थिती चिघळवणे दोन्ही देशांना परवडणारे नाही. दोन्ही देशांना अमेरिकेची निवडणूक होईपर्यंत वेळ काढायचा आहे, त्यासाठी हा करार उपयुक्त आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प पुन्हा निवडून आले तर चीनला दक्षिण सागरातील आव्हानांकडे व तैवान आघाडीवर अधिक लक्ष द्यावे लागेल. तशा अवस्थेत तो लडाखमध्ये परिस्थिती चिघळू नये असेच पाहील. पण बायडेन निवडून आले तर अमेरिकन प्रशासनातला चीन विरोध सौम्य होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लडाखमधील परिस्थिती अधिक चिघळू शकते. पण काहीही झाले तरी लडाखमधून चीन माघार घेण्याची शक्यता कमी दिसते.
चीन आता अधिक पुढे सरकणार नाही, पण मागेही जाणार नाही. सीमेवर तणाव राहिल पण स्थिती चिघळणे दोन्ही देशांच्या फायद्याचे नसल्यामुळे पेच कायम राहील, अशीच चिन्हे दिसत आहेत. भारतातील कोविडची गंभीर परिस्थिती व त्यामुळे अर्थव्यवस्थेवर आलेला ताण यामुळे भारत थेट युद्धाला तोंड फुटेल, असे काही करेल असे वाटत नाही, पण चीनवरचा आर्थिक ताण वाढेल व चिनी लष्कर सतत तणावाखाली राहिल, असे डावपेच भारत खेळत राहिल.
प्रारंभिक आक्रमक हालचालींपासून जो लाभ चीनला झाला होता, तो आता विरला आहे. पॉगँगत्सोच्या उत्तर किनाऱ्यावर फिंगर क्षेत्रात भारताने काही उंच जागा काबिज करून फिंगर पाचवर असलेल्या चिनी फौजेला माऱ्याच्या टप्प्यात आणले आहे. तसेच दक्षिण किनाऱ्यावर तारेचे कुंपण घालून चिनी सैन्याला लक्ष्मणरेखा आखून दिली आहे व त्याच्यापुढे चिनी सैन्य आले तर गोळीबार करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे चिनी सैन्याने आक्रमक हालचाली केल्यातर परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. चीनला ती चिघळवायची असेल तरच तो तशा हालचाली करील. दरम्यान, सैन्य कसे मागे घ्यायचे यावर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये योग्य वेळ येईपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ चालू राहील.
भारताने क्वाड गटातील देशांशी संपर्क व संवाद सुरू केला आहे. अमेरिकेची निवडणूक संपल्यावरच क्वाडच्या कामाचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल. त्यानंतर आशियात चीन विरोधी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भारताचे काम अधिक सोपे होईल.
थोडक्यात लडाख आघाडीवर नोव्हेंबरनंतरच काही हालचाली दिसण्याची शक्यता आहे. पण मध्येच गलवानसारखी गंभीर आगळीक घडली तर स्थिती वेगळेच वळण घेऊ शकते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या कापरेकर गुरुजींनीच दिली मोबाईल नंबरची गणिती पद्धत

Next Post

लोकचित्रशैलींचा तारणहार!

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
20200906 212213

लोकचित्रशैलींचा तारणहार!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011