बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत-चीन तणाव भाग ४; कमांडर पातळीवरील चर्चेच्या अपेक्षा

सप्टेंबर 21, 2020 | 9:02 am
in इतर
0
IMG 20200921 WA0012

कमांडर पातळीवरील चर्चेच्या अपेक्षा
– दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
भारत आणि चीनमधील कोअर कमांडर पातळीवरील चर्चा आता सुरू झाली आहे. आपण इंचभरही मागे हटणार नाही या चिनी संरक्षणमंत्र्यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवरच या चर्चेकडे पहावे लागेल. लडाखमध्ये आता प्रचंड हिवाळा सुरू झाला आहे आणि अशा या वातावरणात निसर्गाशीच युद्ध करावे लागणार असल्यामुळे आपसात लढण्याची वेळ येऊ नये अशीच काहीतरी तरतूद या चर्चेत दोन्ही देश करण्याची शक्यता अधिक आहे. तेवढेच या चर्चेचे महत्त्व आहे. तरीही दोन्ही देशांतील लष्करांत संवाद चालू आहे, ही मोठी आशादायक गोष्ट आहे. दोन्ही देशांना युद्ध नको असेल तर संवाद चालू ठेवावा लागेल. या संवादाच्याआडून रणांगणावर प्यादी पुढेमागे सरकवण्याचे डावपेच मात्र चालू राहतील.
भारतीय लष्कराने गेल्या दोन दिवसांत चुशूल भागातील आणखी काही शिखरे ताब्यात घेतली.कैलास श्रेणीतील शिखरे ताब्यात घेतली असली तरी काही पळवाटा शिल्लक राहिल्या होत्या व त्याचा फायदा घेऊन चिनी सैन्य भारतीय सैन्याच्या पिछाडीला येऊ शकले असते, त्यामुळे भारतीय सैन्याने या भागातील आणखी काही शिखरे ताब्यात घेऊन या पळवाटा बंद केल्या आहेत. यामुळे आग्नेयेकडे डेमचोकपर्यंतचा भाग चिनी सैन्यापासून सुरक्षित राहील.
भारताने यासाठी आणखी १२ हजार सैन्य या भागात आणले आहे. चीन भारताशी लढताना एका भारतीय सैनिकामागे आपले किमान पाच सैनिक असे प्रमाण ठेवतो, त्यामुळे भारतीय लष्कर चिनी सैन्यसंख्येवर लक्ष ठेवून आहे. या शिखरांवरून भारतीय सैनिकांना हटवायचे असेल तर चीनला हे प्रमाण किमान दहा सैनिक असे करावे लागेल. ही शिखरे ताब्यात घेण्यामागे चिनी सैन्यदलावरचा ताण वाढवणे हाही हेतू असू शकतो. चिनी सैन्य अधिक क्षेत्रात विखुरलेले राहिले तर त्याचा या जमवाजमवीमागचा जो हेतू आहे तो भरकटू शकतो.
चीनचा भर हा देपसांग भागात चढाई करण्याचा आहे. पण भारताने अन्य क्षेत्रांत किंवा  अरुणाचल क्षेत्रात आघाडी उघडल्यास चीनला डेपसांग क्षेत्रावर लक्ष केंद्रित  करणे अवघड जाईल. डेपसांग क्षेत्रात चीनने नियंत्रण रेषेच्या निर्मनुष्य क्षेत्रातला मोठा भाग व्यापला आहे व तेथे जवळपास १२ हजार सैनिक, रणगाडे, चिलखती गाड्या व तोफा आणून ठेवल्या आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराला त्यांच्या गस्ती ठाण्यांपर्यंत जाणे अशक्य झाले आहे. अर्थात भारतीय लष्कराने तेथे चीनशी तुल्यबळ ठरू शकेल अशी जमवाजमव केली आहे. हा पूर्ण भाग मैदानी असल्यामुळे येथे दोन्ही बाजूंचे सैनिक उघड्यावर आहेत. असे असले तरी हा भाग इतर भागापेक्षा शांत आहे व येथे अजून तरी फारशा लष्करी हालचाली होत नाहीत किवा त्याची चर्चा होत नाही. पण चिनी डावपेचाच्या दृष्टिकोनातून हा भाग महत्त्वाचा आहे. येथे घडणाऱ्या  घडमोडींकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागेल.
कैलास शिखरे काबिज केल्यानंतर चिनी सैन्याने एप्रिलपूर्व स्थितीत जावे हा आग्रह भारताने सोडला आहे, कारण तसा आग्रह धरल्यास भारताला ही शिखरेही सोडावी लागतील. ही शिखरे आता सोडणे भारताच्या हिताचे नाही. ही शिखरे ताब्यात आल्यामुळे आता चीनच्या प्रदेशात मुसंडी मारण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे चीनवर कायमचा दबाव ठेवणे शक्य होणार आहे. अन्य क्षेत्रातून चीनला मागे रेटायचे असेल तर भारत आता या क्षेत्रात दबाव वाढवत राहील. पण यामुळे आता जुनी नियंत्रणरेषा बाद होईल आणि नवीच नियंत्रण रेषा अस्तित्वात येईल हेही तितकेच खरे आहे.
भारताचे धोरण चीनच्या क्रियेला प्रतिक्रिया देण्याचे आहे, त्यामुळे असेच नेहमी घडत आले आहे व त्याचा लाभ चीनला मिळत आला आहे. पण आता नियंत्रण रेषा जागृत झाली आहे व तेथून दोन्ही देश सैन्य काढून घेण्याची शक्यता  नाही. तसे झाल्यास जुने करार मोडीत काढून नवे करार करावे लागतील.
चीनची तीच तर इच्छा आहे. खरे तर या सर्व घुसखोरीमागचा चीनचा हेतू पूर्व लडाखमध्ये १९६२च्या आक्रमणानंतर सोडून दिलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेणे हा होता, पण भारताने त्वरेने हालचाल करून जमवाजमव केली व चीनला त्याआधीच रोखले. सोबतच्या नकाशात हा भाग निळ्या रेषेत दाखवला आहे. भारताच्या मते नियंत्रण रेषा नकाशात दाखवलेल्या हिरव्या रेषेजवळ आहे. जी चीनला मान्य नाही. भारताने आता आपल्या दावा रेषेचा सतत आग्रह धरला पाहिजे व त्यासाठी सध्याच्या सीमेवर सतत दबाव ठेवावा लागेल. काहीही करून भारताबरोबरचा वाद मिटवला पाहिजे असे चीनला वाटेल, तेव्हाच ही समस्या सुटेल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

CMA Foundation चा निकाल जाहीर, कुमारी गोदावरी घनवट प्रथम

Next Post

सायकल चालवा मेडल मिळवा; नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
NC

सायकल चालवा मेडल मिळवा; नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011