बुधवार, डिसेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत-चीन तणाव भाग ३ – तोंड दाबून बुक्क्यांचा मार

सप्टेंबर 18, 2020 | 9:21 am
in इतर
0
IMG 20200918 WA0006

तोंड दाबून बुक्क्यांचा मार
गेल्या दोन-तीन दिवसांत चीन आघाडीवर बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. एकतर कोअर कमांडर पातळीवर जी चर्चा होणार आहे, त्यासाठी चीनने वेळ व तारीख देण्यास टाळाटाळ चालवली आहे. ही चर्चा एकदोन दिवसांपूर्वीच अपेक्षित होती, पण चीनने त्यासाठी वेळच दिला  नाही आणि ते साहजिक आहे, कारण या चर्चेत घासाघीस करण्यासाठी चीनकडे कुठलाच मुद्दा उरलेला नाही.
दिवाकर देशपांडे
– दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षणशास्त्र तज्ज्ञ आहेत)
भारताने पँगाँगत्सोच्या दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही किनाऱ्यांवर आपली स्थिती मजबूत केली आहे. हे यश सहजासहजी मिळालेले नाही. विशेषत उत्तर किनाऱ्यावरील फिंगर  भागात चिनी सैन्यावर चढाई करण्यासाठी भारतीय सैन्याला छोटीशी चकमकच करावी लागली आहे. येथे चिनी सैन्याची स्थिती तोंड दाबून बुक्क्यांचा मार पडावा अशी झाली आहे कारण भारतीय सैन्याने चढाई करून मागे रेटले हे मान्य करणे चीनला परवडणारे नाही.
डेपसांग भागात चीनने मोठी जमवाजमव केली आहे, पण भारतानेही तोडीसतोड जमवाजमव करून परिस्थिती तूल्यबळ केली आहे. एकंदर  चीनने घुसखोरी करून जी काही आघाडी घेतली होती तिचा लाभ घेण्याच्या स्थितीत आता चिनी सैन्य नाही. त्यामुळेच संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना संसदेत भारताची भूमिका ठामपणे मांडता आली. दुसरी गोष्ट म्हणजे हिमालय बर्फाने वेढल्या जाण्याआधीच प्रचंड प्रमाणात रसद सामुग्रीची जमवाजमव करून चिनी सैन्याला दीर्घकाळ झुंजवण्याची तयारी भारतीय सैन्याने करून ठेवली आहे.
पुढच्या महिन्यापासून बर्फ पडू लागले की, लडाखकडे जाणारे सर्व रस्ते व वाहतूक बंद होईल. रस्त्यावर साचलेले बर्फ  हटविण्याची साधने सैन्याकडे आहेत, पण सैन्य कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे केवळ सहा महिनेच नाही तर वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य, पेट्रोल, रॉकेल, दारुगोळा आणि अन्य युद्धसामुग्री सैन्याने जमवून ठेवली आहे. यावरून भारतीय सैन्याचा निर्धार स्पष्ट व्हावा. चिनी सैन्याला हे सर्व अपेक्षित नव्हते.
सीमेवर सध्या सर्व शांत असल्यासारखे दिसते, पण प्रत्यक्षात परिस्थिती तंग आहे आणि अधूनमधून गोळीबाराच्या घटना घडत असल्याचे कळते. चिनी सैन्याने सुरुवातीला आक्रमक हालचाली करून भारतीय सैन्यावर दबाव टाकला होता, पण आता भारतीय सैन्याने हा दबाव पार झुगारून टाकला आहे व आता पुढे भारतीय सैन्य नेमके काय करेल याचा अंदाज चिनी सैन्याला बांधावा लागत आहे.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीन बराच पुढे आहे व त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असे काही तज्ज्ञ सतत सांगत आहेत, पण भारतीय सैन्याचे नेतृत्व त्यामुळे फारसे विचलित झालेले दिसत नाही. कारण हे तंत्रज्ञान काय आहे व त्याला कसे उत्तर द्यायचे  याचा काही निश्चित विचार नेतृत्वाकडून झाला असावा असे दिसते.
दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या पाच कलमी समझोत्यात एप्रिलपूर्व स्थिती पुन्हा कायम करण्याचा तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा उल्लेख नाही, पण संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या राज्यसभेतील कालच्या निवेदनात या दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे, ही गोष्ट या समझोत्याविषयी बरेच काही सांगून जाणारी आहे.
दरम्यान, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल काश्मीर आघाडीला भेट देऊन तेथील बंदोबस्ताची पाहणी केली. लडाखमध्ये लष्करी कारवाई सुरू झाली की, पश्चिम आघाडीवर पाकिस्तान गडबड करण्याची शक्यता भारतीय लष्कराने गृहीत धरली आहे व त्याला कसे तोंड द्यायचे याचे नियोजन केले आहे.
IMG 20200909 WA0015
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुरुजींसाठी सोशल चळवळ: ‘मी शिक्षक-मी मदत करणार’ग्रुपद्वारे अनेकांना मदत 

Next Post

दिल्लीतील भेटीगाठींनी राजकीय हवा गरम; दानवेंच्या भेटी चर्चेत

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
EiIMn2UXcAYAJh

दिल्लीतील भेटीगाठींनी राजकीय हवा गरम; दानवेंच्या भेटी चर्चेत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011