बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अ‍ॅनी बेझंट यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष लेख

सप्टेंबर 20, 2020 | 1:38 am
in इतर
0
IMG 20200919 WA0049

होमरूल लीग चळवळीच्या प्रणेत्या
IMG 20200909 WA0027 e1599648151235
– मुकुंद बाविस्कर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
बरोबर एकशे पाच वर्षांपूर्वीची ही घटना आहे. इ. स. 1915 मध्ये मुंबई येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन भरले होते. यावेळी एकामागून एक दिग्गज पुढारी हे भारतीय स्वातंत्र्यासंबंधी आपआपले विचार मांडत होते. तरीही जहाल आणि मवाळ अशा गटांमुळे मतभेद शिगेला पोहोचतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. थोडा गोंधळ उडाला, गडबड होऊ लागली,  याच वेळी एक आयरिश वंशाच्या बाई उभ्या राहिल्या आणि कडाडल्या, “ऐका सज्जनहो, जात, धर्म, प्रांत, जहाल, मवाळ असा कोणताही भेद आपणाला आजच्या घडीला परवडणारा नाही, आपले सर्वांचे ध्येय एकच हवे, ते म्हणजे भारतीय स्वातंत्र्य. ‘होमरुल लीग’ म्हणजेच स्वतःच्या देशात स्वतःचे कायदे हवेत. यासाठी आपल्याला एकात्म आणि संघटित व्हावे लागेल.” सर्व सभेत एकच शांतता पसरली. सर्वजण एकमेकांकडे बघू लागले, कोण आहेत या बाई? त्या होत्या होमरूल लीग चळवळीच्या प्रणेत्या आणि थिऑसॉफीकल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. ॲनी बेझंट. पुढे दोनच वर्षांनी इ. स. 1917 मध्ये त्या काँग्रेस पक्षाच्या कलकत्ता येथे झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष बनल्या. जन्माने पाश्चात्य असून सुमारे चार दशके भारतात राहून त्यांनी भारतमातेची सेवा केली.
डॉ. अॅनी बेझंट यांनी आपल्या कार्याचा ठसा केवळ राजकीय क्षेत्रातच उमटविला असे नव्हे तर शैक्षणिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
 अॅनी बेझंट यांचा जन्म दि. 1 ऑक्टोबर 1847 रोजी लंडन येथे झाला. त्यांचे वडील विल्यम पेजवुड आणि आई एमिली हे धार्मिक वृत्तीचे होते. वयाच्या पाचव्या वर्षी पितृछत्र हरपल्याने अॅनी यांच्या आईने तिला शिक्षणासाठी दूर पाठवले. आईच्या मैत्रिणीकडे राहून अॅनी यांनी जर्मन, फ्रेंच आणि संगीत विषयाचा अभ्यास केला. त्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचा रेव्हरंट फ्रँक बेझंट यांच्याशी विवाह झाला. त्यांचे पती ख्रिस्त धर्मोपदेशक होते. परंतु वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी आपला स्वतंत्र मार्ग निवडला.
याच काळात त्या नॅशनल सेक्युलर सोसायटीच्या सदस्य झाल्या आणि पुढे उपाध्यक्ष झाल्या. त्यांचा जॉर्ज बर्नार्ड शॉ, पेथिक लॉरेन्स, सिडने वेब अशा विचारवंतांशी परिचय झाला. पुढे त्या नॅशनल रिफार्मर या वृत्तपत्राच्या सहसंपादक झाल्या. न्यूयॉर्क येथे दि. 7 सप्टेंबर 1975 रोजी स्थापन झालेल्या ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ या संस्थेच्या कार्याशी त्या जोडल्या गेल्या कर्नल ऑल्कॉट आणि मादाम ब्लाव्हाटस्की या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक होते. अज्ञात आणि अमूर्त अशा निसर्ग सत्याचा शोध घेणे, मानवी जीवनातील अव्यक्त क्षमतांचा वेध घेणे आणि जगातील सर्व धर्म आणि संस्कृतींचा अभ्यास करणे हे या सोसायटीचे मुख्य कार्य होते. प्रत्यक्ष ध्यानयोग ही संस्थेची साधना होती.
याच काळात इ. स. 1893 मध्ये दक्षिण भारतातील अड्यार येथे थिऑसॉफिकल सोसायटीची शाखा स्थापन करण्यात येऊन त्याच्या प्रमुख म्हणून अॅनी बेझंट यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे भारतात आगमन झाले आणि तेव्हापासून पुढील चाळीस वर्ष त्या भारतमातेच्या कन्या बनून राहिल्या. येथील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य सुरु केले. भारतात आल्यावर पहिल्याच स्वागत सभेत त्या म्हणाल्या, “मी परदेशातून भारतात आले तरी मी जन्मोजन्मी भारतीय आहे, कर्माने मी भारतीय असून येथील माता बांधवांच्या सेवेसाठी अखंड कार्य करीत राहील.” आणि खरोखर त्यांनी भारत दौरा सुरू केला.
गावोगावी जाऊन त्या व्याख्याने देऊ लागल्या. थिऑसॉफी हे जगाच्या कल्याणाचा विचार करणारे तत्वज्ञान आहे हे लोकांना पटू लागले. भारत हा तर विश्वकल्याणाचा विचार करणारा अध्यात्मिक देश होता.
 कालांतराने अॅनी बाई यांनी 1998 मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. याच कॉलेजचे रूपांतर पुढे बनारस हिंदू विद्यापीठात झाले. अर्थात या कार्यात पंडित मदनमोहन मालवीय, गोविंद दास, श्रीप्रकाश आदींचे योगदान मोलाचे ठरले. शिक्षण आणि अध्यात्मिक क्षेत्रात अॅनी बाईंचे कार्य सुरू असतानाच जे. कृष्णमूर्ती यांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले. परंतु कालांतराने जे. कृष्णमूर्ती आणि त्यांच्यात मतभेद झाले आणि दोघांचे मार्ग भिन्न झाले. दरम्यान बाईंनी भारतीय राजकारणात प्रवेश करून आपला ठसा उमटवण्यात सुरुवात केली.
सभांमागून सभा त्या घेऊ लागल्या. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आदी नेत्यांशी चर्चा करू लागल्या. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला भरून त्यांना अटक केली. त्यानंतरच 1917 मध्ये कलकत्ता येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना त्या म्हणाल्या, “इंग्रजांनी मला अटक केली, जेलमध्ये टाकले, पायदळी तुडविले, पण भारतीयांनी माझा सन्मान केला. चला सर्व मिळून म्हणूया ‘वंदे मातरम’, हाच आजपासून आपला स्वातंत्र्याचा नारा, आता मागे हटायचं नाही, पुढे जायचे आहे.” त्यानंतर त्यांचे महात्मा गांधींशी काही मतभेद झाले.
भारतीय राजकारणात पुढे गांधीयुग सुरू झाले. मात्र भारतीय राजकारण असो की धर्म, अध्यात्म, शिक्षण आदि क्षेत्रात अॅनी बेझंट यांचे कार्य अत्यंत मोलाचे मानले जाते. अशा या जन्माने पाश्चात्य पण कर्माने भारतीय विदुषीने 20 सप्टेंबर 1933 रोजी अड्यार येथे आपल्या आश्रमात जगाचा अखेरचा निरोप घेतला.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – [email protected])
IMG 20200919 WA0048
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अलकैदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक

Next Post

‘त्या’ गोळीबारात सराईत गुन्हेगाराची हत्या

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
IMG 20200920 WA0007

'त्या' गोळीबारात सराईत गुन्हेगाराची हत्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011