नवी दिल्ली – भारतात कोरोना विषाणूचा फैलाव होत असला तरी प्रामुख्याने १५ जिल्हेच कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याची बाब समोर येत आहे. या वर्षीच्या सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद गुरुवारी (२५ मार्च) झाली आहे. गेल्या २४ तासात कोरोना विषाणूचे ५३ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, गुरुवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरातमधील रुग्णांचा ८० टक्के वाटा आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळणाऱ्या १५ जिल्ह्यांची यादी आरोग्य मंत्रालयानं तयार केली आहे. गेल्या २४ तासात सर्वाधिक रुग्ण नोंदवणारे हे १५ जिल्हे तीन राज्यातील आहेत.
महाराष्ट्रातील ५ जिल्हे
महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशाच्या एकूण सक्रिय रुग्णसंख्येत या जिल्ह्यांच ६२ टक्के योगदान आहे. जिल्हास्तरावर सक्रिय रुग्णसंख्येत महाराष्ट्रातील पुण्यात ४९ हजारांहून अधिक, नागपूरमध्ये ३४ हजार, मुंबईत २९ हजार, ठाण्यात २४ हजारांहून अधिक, औरंगाबादमध्ये १६ हजारांहून अधिक रुग्ण आहेत.
केरळ, पंजाबमध्येही
केरळमध्ये एर्नाकुलममध्ये २,८०० हून अधिक, पंजाबमध्ये सासनगरमध्ये २,७०० हून अधिक आणि जारंधरमध्ये २,५०० हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. कन्नूरमध्ये २,४०० हून अधिक आणि पंजाबच्या लुधियाना, पतियालासह पठानमथिट्टामध्ये २,२०० हून अधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत. केरळच्या पलक्कड आणि कासरगोडमधये २ हजारांहून अधिक, अमृतसरमध्येसुद्धा १,९०० सक्रिय रुग्ण आहेत.