गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बीएसएनएलच्या हाय-स्पीड ब्रॉडबँडसेवेचे उद्घाटन

by Gautam Sancheti
ऑगस्ट 3, 2020 | 1:47 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200802 WA0000WAUD

अकोला – बीएसएनएलच्या भारत एअर फायबर सर्व्हिसेसचे उद्घाटन केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे अकोला येथील इंटरनेट वापरकर्त्यांना  मागणीनुसार वायरलेस इंटरनेट जोडणी मिळतील. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून बीएसएनएलकडून भारत एअर फायबर सेवा सुरू केली जात आहे आणि २०  केएम अंतरापर्यंत वायरलेस कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचे उद्दीष्ट आहे.

अशा प्रकारे बीएसएनएलद्वारे स्वस्त सेवा मिळाल्यामुळे दुर्गम ठिकाणच्या ग्राहकांना फायदा होईल. या व्यतिरिक्त, या सेवा वायरलेस आहेत आणि स्थानिक पातळीवर सेवांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता खूपच कमी आहे. या सेवा इतर ऑपरेटरंपेक्षा खास आणि वेगळ्या आहेत कारण बीएसएनएल अमर्यादित मोफत व्हॉईस कॉलिंग उपलब्ध करुन देत आहे. बीएसएनएलने  अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना या दर्जेदार आणि परवडणार्‍या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

हे मॉडेल देशभर

भारत एअर फायबर सर्व्हिस दुर्गम भागातील ग्राहकांना रेडिओ वेव्हद्वारे शेवटच्या मैलापर्यंत पोहचण्यातील दरी साधून अतिवेगवान ब्रॉडबँड सेवा प्रदान करत आहे. बीएसएनएलने नजीकच्या टेलिफोन एक्सचेंज किंवा मोबाईल टॉवरपर्यंत ऑप्टिकल फायबरचे विशाल जाळे टाकले आहे आणि तेथून ग्राहकांना वायरलेसद्वारे जोडणी दिली जाते. या व्यतिरिक्त, बीएसएनएलने  या अतिवेगवान ब्रॉडबँड सेवेसाठी अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील स्थानिक उद्योजक / बेरोजगार तरुणांना महसुलात वाटा देण्याबाबत करार केला असून त्याद्वारे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना देत आहे.  ते दरमहा सुमारे एक लाख रुपये नियमित मासिक उत्पन्न मिळवून त्याद्वारे केंद्राच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत स्वावलंबी बनू शकतील. हे मॉडेल संपूर्ण भारतात राबवण्यात येत आहे.

अकोला येथून प्रारंभ

बीएसएनएलने विशेषत: ही वायरलेस भारत एअर फायबर सेवा अकोला येथून सुरू केली आहे. अकोला व वाशिम शहरात सर्वत्र रस्ता रुंदीकरणाच्या कामांमुळे आणि रस्ते जोडण्यामुळे बीएसएनएलची अखंड इंटरनेट जोडणी  मिळण्यात अकोला आणि वाशिममधील नागरिकांना अडचणी येत होत्या.  अकोला व वाशिम जिल्ह्यात बीएसएनएल अकोलाचे 435 बेस ट्रान्सीव्हर स्टेशन (बीटीएस) आहेत, त्यापैकी 193 बीटीएस हे 4G बीटीएस असून या जिल्ह्यांचा बहुतांश भाग व्यापला आहे.  केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी उर्वरित 28 गावे देखील यात समाविष्ट  करण्याची सूचना केली असून लवकरच दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोबाईल कव्हरेज असेल. या दोन जिल्ह्यांतील ग्राहकांना उत्तम दर्जाची  सेवा देण्यासाठी इतर विशेष कामांव्यतिरिक्त बीएसएनएलने पूर्ण कव्हरेजसाठी आणखी बीटीएसची योजना आखली आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये

बीएसएनएल भारत एयर फायबर कनेक्टिव्हिटीची गती ५० एमबीपीएस आहे. बीएसएनएल वायरलाइन आणि वायरलेस विभागांमध्ये आकर्षक ब्रॉडबँड योजना देत आहे. महानगरांमधून  ग्रामीण भागात स्थलांतर होत असल्यामुळे सद्य परिस्थितीत हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवेची मोठी मागणी आहे. लॉकडाऊन दरम्यान वर्क फ्रॉम होम (डब्ल्यूएफएच), ई-लर्निंग, ऑनलाइन शॉपिंग, गेमिंग आणि करमणूक इत्यादीमुळे ही सेवा लोकप्रिय होत आहे. ही सेवा ग्रामीण भागासाठी परिवर्तन घडवणारी  ठरू शकते कारण इंटरनेट आणि सेन्सर यांचे एकात्मीकरण करून  मातीतील आर्द्रता रिअल-टाइम आधारावर जाणून घेता येईल  जेणेकरून सिंचनाचे नियोजन केले जाऊ शकते, परिणामी पाण्याची बचत होईल आणि त्याद्वारे उत्पादकता वाढेल. तसेच, दुभत्या जनावरांच्या मानेवर सेन्सर बांधले जाऊ शकतात, ज्यामुळे शरीराच्या तापमानाचे सतत नोंद करणे शक्य होईल जेणेकरुन कुठ्ल्यावेळी दूध जास्त आले हे जाणून घेता येईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुडन्यूज – दिवसभरात ५१ हजार रुग्ण बरे होण्याचा देशात उच्चांक

Next Post

वडांगळीतील सतीमाता मंदिरात पादुकांची चोरी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

वडांगळीतील सतीमाता मंदिरात पादुकांची चोरी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

CBI ने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाला ६० हजाराची लाच घेतांना केली अटक…

ऑगस्ट 21, 2025
Raj Thackeray

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधुचे पॅनल फेल…राज ठाकरे यांनी दिली ही पहिली प्रतिक्रिया

ऑगस्ट 21, 2025
jail11

ठाणे येथे ४७ कोटी ३२ लाखाच्या बनावट आयटीसी फसवणूक प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक

ऑगस्ट 21, 2025
Untitled 35

बेस्ट निवडणुकीच्या पराभवानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला..नेमकी काय चर्चा झाली?

ऑगस्ट 21, 2025
amit shah 1

भ्रष्टाचारी व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे असभ्य वर्तन….लोकसभेतील गोंधळावर अमित शाह कडाडले

ऑगस्ट 21, 2025
crime 13

जळगावमध्ये शेतजमिनीत विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेले पाचही जण मध्यप्रदेशातील

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011