शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान, संपूर्ण देश व्यथित; मोदींनी व्यक्त केली खंत

by Gautam Sancheti
जानेवारी 31, 2021 | 11:55 am
in महत्त्वाच्या बातम्या
0

नवी दिल्ली – नवी दिल्लीत २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान झाल्याबद्दल संपूर्ण देश व्यथित झाल्याचं सांगून मोदी यांनी आजच्या मन की बातमधे खंतही व्यक्त केली. भारतात बनलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसी या आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला.

भारत आज औषधं आणि लसींच्या बाबतीत सक्षम आणि आत्मनिर्भर असल्यानंच जगाची सेवा करू शकत असल्याचं ते म्हणाले. भारत जितका अधिक सक्षम होईल, तितकी अधिक मानवतेची सेवा करू शकेल, तितका जास्त त्याचा जगाला लाभ होईल असं ते म्हणाले.

कोरोनाकाळात भारतानं जगातल्या इतर देशांना औषधं, वैद्यकीय साहित्य आणि लसींचा पुरवठा करत, केलेल्या मदतीबद्दल, इतर देश आणि भारताचे आभार व्यक्त करत असल्याचं त्यांनीआजच्या मन की बातमधे सांगितलं. या गोष्टींचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असल्याचंही ते म्हणाले.

जगातल्या प्रगत देशांच्या तुलनेत भारतानं अधिक वेगानं लसीकरण करत, केवळ १५ दिवसांच्या कालावधीत ३० लाखांहून अधिक कोरोना योद्ध्यांना लस दिली असल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मधे दिली.

भारतानं कोरोनाविरोधात दिलेला लढा जगासमोर एक उदाहरण म्हणून समोर आलं, त्याचप्रमाणे आता सुरु झालेला कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रमही उदाहरण ठरत असल्याचं ते म्हणाले.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपलं आयुष्य वाहिलेल्या प्रत्येकाच्या स्मृती जपण्याची गरज मोदी यांनी अधोरेखित केली. अशा स्वातंत्र्य योद्धांबद्दल लिहीली जाणारी पुस्तकं हीच त्यांना श्रद्धांजली असेल असं ते म्हणाले. याचदृष्टीनं भारताच्या पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच निमीत्तानं केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं युवा प्रोत्साहन देण्याचा उपक्रम सुरु केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्यांनी आपल्या कामातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणलं आहे, अशा शब्दात त्यांनी पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरवही केला. या सर्वांच्या कामातून देशवासींनी प्रेरणा घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.

देशातल्या महिला वर्ग प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेत असल्याचा उल्लेखही मोदी यांनी आजच्या मन की बातमधे केला. कोरोनाकाळात प्रतिकारशक्तीच्या वाढीसाठी योग साधनेसारखं भारतीय संस्कृतीचं प्रतिक, जगभरासाठी किती उपयुक्त ठरलंय हे सांगताना, त्यांनी चिलीमधे योग साधनेच्या प्रचार प्रसारासाठी होत असलेले प्रयत्न आजच्या मन की बातमधून मांडले.

देशभरातले नागरिक, तंत्रज्ञानाच्या प्रयत्नानं देशात कृषी क्षेत्रात करत असलेले प्रयोग, स्वच्छतेसाठी नागरिक देत असलेलं योगदान, कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रयोग, पारंपरिक कला टिकवण्यासाठी करत असलेले प्रयत्न, कोरोनाकाळात आर्थिक संकटातून उभं राहण्यासाठी दिलेला लढा, कोरोना काळाचा नव्या गोष्टी शिकण्यासाठी आणि अभिनवतेसाठी केलेले प्रयोग याचा उल्लेख करत, त्यापासून प्रेरणा घेण्याचं आवाहन मोदी यांनी आजच्या मन की बात मधे केलं.

कोरोनाचं संकट असतानाही मागच्या वर्षी देशानं असामान्य संयम आणि धाडसाचं प्रदर्शन घडवलं, यावर्षीही त्याचपद्धतीनं कठोर मेहनत करून आपल्याला संकल्पांची पूर्तता करत, देशाला वेगानं पुढं न्यायचा निर्धारही मोदी यांनी मन की बात मधे व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर्व चित्रपटगृहांना ग्रीन सिग्नल; १०० टक्के आसन क्षमनेते परवानगी

Next Post

चांदवड- पत्रकार राजेंद्र काळे यांचे आकस्मित निधन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१२१ कोटी रुपयांची बँक फसवणूक….सीबीआयने खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
image001NMQN
महत्त्वाच्या बातम्या

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना २५ हजाराचे बक्षीस तर जखमींना १.५ लाखाचा विमा

सप्टेंबर 12, 2025
प्रातिनिधिक फोटो
आत्महत्या

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची मांजरा नदीत उडी…छगन भुजबळ घेणार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सप्टेंबर 12, 2025
Next Post
IMG 20210131 WA0045

चांदवड- पत्रकार राजेंद्र काळे यांचे आकस्मित निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011