शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पश्चिम बंगालमध्येच ८ टप्प्यात मतदान का? आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण गरम

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 27, 2021 | 6:16 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
EvJ2 4RU4Ak0QF4

नवी दिल्ली ः देशातील ५ राज्यांमध्ये निवडणूक जाहिर झाली असली तरी एकट्या पश्चिम बंगालमध्येच तब्बल ८ टप्प्यात मतदान होणार आहे. अन्य राज्यात मात्र एका दिवशीच मतदान आहे. हा असा भेदभाव का, या प्रश्नावरुन विरोधकांनी भाजपचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. त्यामुळेच निवडणूक जाहिर होताच बंगालमधील वातावरण तापले आहे.
तृणमूल काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहे. तर भाजपनं निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इतर राज्यांमध्ये कमी टप्प्यात मतदानाची प्रक्रिया घेत असताना पश्चिम बंगालमध्ये अनेक टप्प्यात मतदान का घेतले जात आहे, असा सवाल तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तर मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी असामाजिक तत्वांना नियंत्रित करण्याची गरज असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
ममता बॅनर्जींचा आरोप
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे. इतर राज्यात एका टप्प्यात मतदान होत आहे. मात्र बंगालमध्ये अनेक टप्प्यात मतदान का घेतलं जाणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोग लोकांना न्याय देणार नाही, तर लोक कुठे जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सल्ल्यानंतरच निवडणुकांची तारीख घोषित करण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.

mamata

माकपच्या प्रश्नांच्या फैरी
बंगालमधील निवडणूक एक महिना लांबवण्याचे कारण निवडणूक आयोगानं सांगावं, असं माकपा सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटलं आहे. बंगालमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या सरकारला पराभूत करणं गरजेचं आहे. कारण त्यांनीच भाजपला राज्यात प्रवेश करण्याची संधी दिली आहे. टीएमसी सरकारविरोधातील लाट भाजपला फायदा पोहोचवत आहे, असं त्यांनी सांगितलं.
सीपीआयचा टोला
बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणूक घेण्याचं कारण निवडणूक आयोगानं सांगितलं पाहिजे, असं  सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांनी म्हटलं आहे. एकीकडे भाजप सरकार वन नेशन वन इलेक्शन म्हणत आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोग बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान घेत आहे. आभासी जगात आणि खऱ्या आयुष्यातील त्यांचे वर्तन विरोधाभासी आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी केली आहे.
क्रिकेट व मतदान
चेन्नईमधील पाच दिवसांचा कसोटी क्रिकेट सामना अहमदाबादमध्ये दोनच दिवसांचा झाला. आणि तामिळनाडूमध्ये एका दिवसात होणारे मतदान बंगालमध्ये आठ टप्प्यात होणार आहे. कोणी या गणिताबद्दल सांगू शकतं का, असा सवाल भाकपा सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य यांनी केला आहे.
पण, गरजच काय
हा कुटिल डाव असून, केरळमध्ये १४० तामिळनाडू २३४, पुद्दुचेरी ३० (एकूण ४०४ जागा) या ठिकाणी एका टप्प्यात मतदान होणार आहे. तर आसाम १२६, बंगाल २९४ (जागा ४२०) या ठिकाणी सात ते आठ टप्प्यांची काय गरज आहे, असा प्रश्न  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. आता बंगामध्ये बदलाची वेळ आली आहे, असं बंगालमधील भाजप खासदार बाबूल सुप्रियो यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करत म्हटलं आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केरळ निवडणूक : या भागात आतापर्यंत २७० कार्यकर्त्यांची हत्या

Next Post

इंडिया दर्पण विशेष – भटकूया आनंदे – हातगड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 2447

इंडिया दर्पण विशेष - भटकूया आनंदे - हातगड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Sushma Andhare

देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा मागण्याचा खरंच नैतिक अधिकार आहे का? उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन सुषमा अंधारे यांचा सवाल

ऑगस्ट 22, 2025
SUPRIME COURT 1

सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिले हे निर्देश…

ऑगस्ट 22, 2025
crime1

फुड कॅफेमध्ये काम करणा-या नोकराने गल्यातील रोकडसह मोबाईलवर मारला डल्ला

ऑगस्ट 22, 2025
crime 88

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात तीन घरफोडी….चोरट्यानी सव्वा सहा लाखाचा ऐवज केला लंपास

ऑगस्ट 22, 2025
cbi

सीबीआयने रेल्वे पार्सल क्लर्कला लाच घेताना केली अटक…

ऑगस्ट 22, 2025
Gy3nWP8WwAAiwvz e1755850108280

ऑनलाईन गेमिंग प्रचार प्रसार आणि नियमन विधेयकाचे ​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले स्वागत…

ऑगस्ट 22, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011