कळवण – हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या प्रथा,रुढी,पंरपरा आणि चालीरीतींना फाटा देत विधायक सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेत रक्षा विसर्जनाची परंपरा कळवण तालुक्यातील भेंडी या गावाने बंद केली आहे. रक्षा विसर्जन नदीत न करता घरासमोर झाड लावून त्या खड्ड्यात केली जाणार आहे.