कोकणगाव : नाशिक पासून हाकेच्या अंतरावर असलेल कोकणगाव हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे सुमारे १०० हून अधिक रुग्ण झाले असून दिवसेंदिवस कोरोना चा धोका वाढत असून समूह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आले बुधवारी ७ एप्रिलपासून ते ११ एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करून बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दवाखाने मेडिकल वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे
रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या गावांतील प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना ग्रामपंचायत स्तरावर दिल्या आहेत. स्वयंस्फूर्तीने पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच आणि सदस्य यांनी निर्णय घेतला आहे.या निर्णयाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. आजूबाजूच्या गावातील व्यवसाय बंद असल्यामुळे नागरिक दुसऱ्या गावात वस्तू खरेदीसाठी जातात, पर्यायाने संक्रमण होऊन रुग्णांची संख्या वाढत आहे, दुसऱ्या गावातील ग्राहक कुठून आले, कोणाच्या संपर्कात आले होते, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे गावातील सर्वच व्यवसाय बंद करून साखळी तुटावी याकरिता हा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गावात दुकाने सुरू असल्यामुळे इतर नागरिक ये- जा करतात. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाच दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन महसूल विभाग व्यापारी बांधव यांच्यात संयुक्त बैठक पार पडली. यावेळी सरपंच अंबादास गांगुर्डे उपसरपंच जगन्नाथ मोरे ग्रामपंचायत सदस्य भारत मोरे विठ्ठल गरुड ग्राम विकास अधिकारी अभिजीत तूपे, तलाठी वैशाली नागोरे आदी सह उपस्थित होते प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला व्यापारी बांधवांनी संमती दिली असून जनता कर्फ्यू चे पालन केले जाईल असे स्पष्ट केले आहे.