नाशिक : कत्तलीसाठी आणलेले दोन लाख रूपये किमतीचे बोकड चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना अंबड गावात घडली. विशेष म्हणजे दुकानाबाहेरील वाड्यात बांधलेले बोकड चोरट्यांनी पळविले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावेद गनी खाटीक (रा.राणेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खाटीक यांचे अंबडगावात जावेद मटन शॉप नावाचे दुकान आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुकानाबाहेरच कत्तलीसाठी आणलेली बोकड ठेवण्यासाठी त्यांनी बंदीस्त वाडा बांधून व्यवस्था केलेली आहे. गेल्या शुक्रवारी (दि.१२) रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाशेजारील वाड्याचे कुलूप तोडून आत बांधलेले सुमारे दोन लाख रूपये किमतीचे २१ बोकड चोरून नेले. अधिक तपास हवालदार बेंडाळे करीत आहेत.