शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दीपाली चव्हाणच्या मारेकऱ्यांना कठोर शासन करा, भाजपाच्या उमा खापरे यांची मागणी

by Gautam Sancheti
मार्च 26, 2021 | 10:02 am
in राज्य
0
uma khapare e1616489648143

मुंबई – मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीतील वन परिक्षेत्र अधिकारी असलेल्या दीपाली चव्हाण या महिलेच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना कठोर शासन करा, अशी मागणी भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी केली आहे.
   या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्रीमती खापरे यांनी म्हटले आहे की, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी आत्महत्या केली. उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याकडून आपला छळ होत असल्याची तक्रार दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांच्याकडे अनेकदा केली होती. मात्र रेड्डी यांनी या तक्रारींची दखल घेतली नाही. अखेर त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी चव्हाण यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत शिवकुमार यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार आणि प्रमुख संरक्षक रेड्डी या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
गेल्या ६ मार्चला भंडारा जिल्ह्यात युवा बाल विकास प्रकल्प अधिकारी शितल फाळके या महिलेनेही आत्महत्या केली. या घटनेचा तपासही ठाकरे सरकारने केला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून महिला अधिकाऱ्याने आत्महत्या करण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. या घटनांमुळे अधिकाऱ्यांवर सरकारचा वचक नसल्याचे दिसून येते, अशी टीका श्रीमती खापरे यांनी केली आहे.
राज्यभरामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असताना आता सरकार दरबारी सुद्धा महिलांना मानसिक व शारिरीक त्रास देऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक ते निर्देश गृहखात्याला द्यावेत, असेही श्रीमती खापरे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – गंगापूररोड भागात मोकळया मैदानात पार्क केलेले सफारी वाहन चोरीला

Next Post

पुण्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर ‘लॉकडाऊन’ बाबत २ एप्रिलला निर्णय घेऊ -उपमुख्यमंत्री

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20210326 WA0015

पुण्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर 'लॉकडाऊन' बाबत २ एप्रिलला निर्णय घेऊ -उपमुख्यमंत्री

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011