सोमवार, ऑक्टोबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तुम्ही काढा घेताय? मग हे वाचाच

ऑगस्ट 15, 2020 | 6:52 am
in इतर
0
EYeLfbvUwAAfxeQ

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सध्या काढा घेण्याचे प्रचंड पेव फुटले आहे. पण, ते नक्कीच हितकारक आहे का? कुणीही, केव्हाही आणि कसाही काढा घेऊ शकतो का? आयुर्वेदशास्त्रात याविषयी नक्की काय सांगितले आहे, हे सांगणारा हा लेख…

डाॅ. नीलिमा राजगुरू (एम.डी.आयुर्वेद, नाशिक)

पुर्वी रूग्ण वैद्याकडे आला की त्याला काढा म्हणजे काय हे समजावून सांगणे आणि सरते शेवटी त्याला तो घ्यायला राजी करणे, हे एक दिव्यच असायचे. पण आता या काढ्यांचे पेवच फुटले आहे. आयुष काढा, युनानी काढा, मालेगांव काढा शिवाय व्हाॅटस्ॲप सारख्या असंख्य सोशल मिडीयावर उपलब्ध असलेले काढे. या सर्वांनी वैद्यांचाच घाम काढला आहे. यातील कोणता ना कोणता काढा प्रत्येक जण घेत आहे. हल्ली रूग्ण तपासणीसाठी आला आणि काय काय होते हे सांगायला लागला की, सर्वप्रथम त्याला काय काय काढे, औषधे घेतो आहेस हेच आधी विचारावे लागते. बहुसंख्य रूग्णांमध्ये हल्ली जळजळ, पोटात आग पडणे, लघवी, संडासला आग होणे, अशी लक्षणे दिसून येत आहेत. हा सर्व सेल्फमेडिकेशनचा (म्हणजे स्वतःहूनच कोणतेही काढे व कितीही घेण्याचा) परिणाम आहे.

मग आम्ही ही प्रतिबंधात्मक औषधी घ्यायचीच नाही का? असा प्रश्न समोर येतो. तर हे काढे तुम्ही जरूर घ्या, पण वैद्यांच्या सल्ल्यानेच. कारण आयुर्वेदात औषधोपचार करतांना रूग्णाची प्रकृती, वय, ऋतू, रुग्ण जिथे राहतो तो प्रदेश, वेळ, काळ असे सर्व लक्षात घ्यावे लागते. कोरोनाने कफ होतो, घसा खवखवतो अशी लक्षणे लक्षात घेऊन लवंग, दालचिनी, मीरे, आले असे घटक असलेले काढे घेतले जातात. हे सर्व पदार्थ उष्ण व तीक्ष्ण आहेत. हे काढे रोज घेतल्याने शरीरातील उष्णता व पित्त वाढू शकते. विशेषत: पित्त प्रकृतीच्या व्यक्ती व तरूण मुले यांना मोठा त्रास होतो.

काढा घेतांना त्या व्यक्तीचे अग्नीपरीक्षण महत्वाचे आहे. म्हणजे त्याला भूक कशी व किती वेळाने लागते? पचन कसे होते?मलप्रवृत्ती कशी व केव्हा होते? हे सर्व परीक्षण आयुर्वेद तज्ज्ञच करु शकतो. एखाद्या व्यक्तीची भूक मंदावलेली असेल तर त्याला काढ्या पेक्षा हिम, फांट या स्वरुपात औषध द्यायला पाहिजे. कारण हे पचायला काढ्यापेक्षा हलके आहे. अनुक्रमे गार व गरम पाण्यात औषधी भिजवून हिम व फांट तयार करतात. कोणाला, कोणते औषध द्यायचे हे तज्ज्ञ वैद्यानेच ठरवायला पाहिजे.

काढा करायची पद्धत

काढा म्हणजे चहासारखाच करायचा आहे, असा एक गैरसमज सध्या रुढ झाला आहे. दोन कप पाण्यात २ चमचे चहा पावडर टाकून उकळले की झाला चहा तयार. (खरं तर असा उकळून चहा करणे पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. चहा पण वर सांगितलेल्या फांट या प्रकारासारखा, गरम पाण्यात भिजवून तयार करतात) अशाच अशास्रीय पद्धतीने हल्ली काढा करून घेतला जातो. पण शास्रोक्त पद्धतीने काढा करतानाची  पद्धत काढ्याच्या द्रव्यांनुसार बदलते. त्यात किती पाणी टाकायचे? तो कुठल्या भांड्यात, किती वेळ उकळायचा? याचे पण एक शास्त्र आहे. द्रव्याच्या चारपट, आठपट किंवा कधी कधी १६ पट पाण्यात काढा करायचा असतो. हे त्या त्या द्रव्याच्या गुणधर्मावर ठरते. तसेच काही सुगंधी द्रव्ये असतात. त्यांचा काढा न करता वर उल्लेख केल्याप्रमाणे हिम किंवा फांट करतात. नाहीतर त्यांचा गुण येत नाही. त्यात काही उडनशील द्रव्ये असतात. काढा केला तर ती उडून जातात. मग त्यांचे औषधी गुणधर्म कसे काम करतील?

काढे किती दिवस घ्यायला पाहिजेत? आता करोना अजून आहेच मग काढा चालूच ठेवला तर काय बिघडते? असा विचार करुन गेली ४-५ महिने रोज काढा घेणारी मंडळी आहेत. हे काय आयुर्वेदिकच आहे त्याला काही साईडइफेक्टस् नसतात, असा सर्वांचा गोड गैरसमज आहे. पण असे मुळीच नाही. त्यामुळे हे काढे जरूर घ्या, पण ते तज्ज्ञ वैद्याकडूनच घ्या.

नुसते हे काढे पिऊन, आयुर्वेदीक औषधे खाऊन प्रतिकार शक्ती वाढणार नाही. आयुर्वेदातील प्रतिकार शक्ती ही संकल्पना खूप व्यापक आहे. त्याबद्दल नंतर जाणून घेऊच. त्यामुळे सध्यातरी आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच काढा, औषधे घ्या आणि स्वस्थ रहा.

(मो. ९४२२७६१८०१)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इगतपुरी तालुक्यात दमदार पाऊस; धरणसाठ्यात लक्षणीय वाढ. दारणातून विसर्ग सुरू

Next Post

परनार्ड कंपनीतर्फे जिल्ह्यात ३६५ विद्यार्थ्यांना ५१ लाख ६१ हजार रुपये शिष्यवृत्ती 

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

परनार्ड कंपनीतर्फे जिल्ह्यात ३६५ विद्यार्थ्यांना ५१ लाख ६१ हजार रुपये शिष्यवृत्ती 

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011