नवी दिल्ली – विविध भाषा, धर्म, परंपरांचा देश म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. त्यामुळेच कोणताही सण असला तरी ती साजरा करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. होळी साजरा करण्याची पद्धतही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी आहे. यातील एक पद्धत ऐकून तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, नव्हे अंगावर काटाच येईल. कारण येथे चक्क विंचवांच्या सहाय्याने होळी खेळली जाते.
उत्तर प्रदेशातील एक शहर कानपूर. त्यातील एक भाग इटावा. या इटावा भागातील एका गावात ही अजिबोगरीब प्रथा पहायला मिळते. फाल्गुन महिना आणि विशेषत: होळी आली, होळीची गाणी वाजू लागली की मोठ्या संख्येने विंचू बिळातून बाहेर येतात. आणि मग लहान मोठे सारेचजण हे विंचू हातात घेऊन एकमेकांवर फेकतात, आणि होळी साजरी करतात.










