मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

चीनने भारताला दिलेल्या गुप्त प्रस्तावाचे गुपित

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 23, 2020 | 5:31 am
in इतर
0
india china

चीनने भारताला दिलेल्या गुप्त प्रस्तावाचे गुपित

लडाख सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी चीनने एक अत्यंत ‘गुप्त’ प्रस्ताव भारतापुढे ठेवल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. दोन दिवसांत हा ‘गुप्त’ प्रस्ताव माहितगार सूत्रांच्या हवाल्याने वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाला. त्यामुळे हा गुप्त प्रस्ताव किती ‘गुप्त’ आहे आणि किती ‘महत्त्वाचा’ आहे, हे लक्षात यावे. या प्रस्तावात चीनने असे सुचवले आहे की, भारताने आधी आपले रणगाडे आणि तोफा पूर्व लडाखच्या रणक्षेत्रातून मागे न्याव्यात आणि मग चीन आपले रणगाडे व तोफा मागे घेईल आणि मग त्यानंतर सैन्य मागे घेण्याचा विचार करू.
दिवाकर देशपांडे
दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि सामरिकशास्त्राचे तज्ज्ञ आहेत)
भारताने तोफा व रणगाडे मागे घ्यायचे म्हणजे ते थेट हिमालय पर्वत उतरून मैदानी प्रदेशात न्यायचे आणि नंतर चीनने दगलबाजी केली की पुन्हा धावतपळत रणक्षेत्रात आणायचे. हे शक्यच नाही. चीनने आपल्या क्षेत्रात मोठे रस्ते बांधले आहेत, रेल्वेमार्ग बांधले आहेत. चीनने हे रणसाहित्य मागे नेले तरी ते पुन्हा २४ तासांत रणक्षेत्रांत आणणे त्याला अवघड नाही. त्यामुळे चीनचा हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता नाही.
सध्या लडाख सीमेवर कोंडी झाली आहे. चीनला पुढेही सरकता येत नाही आणि मागेही जाता येत नाही. भारताने आता उन्हाळ्यातला सैन्याचा मुक्काम वाढविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. याचा अर्थ भारताने आता उत्तर सीमेवर कायम मुक्काम ठोकण्याची तयारी केली आहे. हे चीनच्या लष्करी योजनेच्या विपरित आहे. चीनला हिमालयात इतका दीर्घ मुक्काम करायचा नव्हता. आता भारतीय सैन्य कायम तेथे राहणार याचा अर्थ तिबेटमध्ये अस्थिरता राहणार. चीनचे लष्करी नियोजन उधळून लावणे व त्याला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडणे हेच भारतीय सैन्याचे धोरण आहे. आता यातून सुटका करून घेण्यासाठी चीनची धडपड चालू आहे. तैवानवर हल्ला करायचा असेल तर हिमालयात गडबड होऊ नये हा चीनचा हेतू आहे, पण तो साध्य होण्याची शक्यता  नाही. ते चीनच्याही लक्षात आले आहे, त्यामुळे चीनने आता आपल्या उद्योगक्षेत्राला हिमालयातील थंडी चिनी सैनिक सहन करू शकतील असे थर्मल पोशाख तयार करण्यास सांगितले आहे.
उत्तर सीमेवरील सर्व शांतता करार आता मोडीत निघाले आहेत. भारत सतत या शांतता कराराच्या पालनाचा आग्रह धरत असला तरी आता ते करार पाळणे चीनला शक्य नाही कारण हे करार पाळायचे असतील तर सैन्य पूर्ववत मागे घ्यावे लागेल, ते चीनच्या इभ्रतीला धक्का लावणारे आहे आणि सैन्य तसेच सीमेवर ठेवण्यात काहीच फायदा नाही, फक्त ते ठेवण्याचा खर्च वाढणार आहे. यात चीनसाठी समाधानाची एकच गोष्ट आहे, ती ही की भारताचाही सैन्य ठेवण्याचा खर्च वाढणार आहे, पण भारत त्याबदल्यात तिबेट सीमेवर सतत दबाव ठेवू शकतो.
बऱ्याच लोकांना असे वाटते की, सध्या भारताला परिस्थिती अनुकूल आहे. महत्त्वाची शिखरे भारताच्या ताब्यात आहेत, चिनी सैन्य अजून हिमालयातील थंडीला सरावलेले नाही, त्यामुळे भारताने हल्ला करून चिनी सैन्याला मागे ढकलावे. पण ते करणे शक्य असले तरी फायदयाचे नाही. त्याचे एक कारण म्हणजे चिनी सैन्य सध्या सुसज्ज आहे व युद्धाच्या तयारीत आहे. भारत अशा हल्ल्यात काही भूभाग मिळवू शकतो पण त्याने काहीच साधणार नाही. अशा युद्धात दोन्ही बाजूंची मोठी हानी होईल व त्यामानाने होणारा लाभ अत्यल्प असेल. पण त्याऐवजी दीर्घकाळ पर्वतीय सीमेवर मुक्काम ठोकून चिनी सैन्यावर आर्थिक व मानसिक तणाव टाकणे फायद्याचे आहे.
भारताने या क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणीचे काम सुरू केले आहे, त्याला संरक्षण देण्यासाठीही सैन्य तिथे असणे आवश्यक आहे. उत्तर सीमा तापलेली राहण्याचा लाभ चीनपेक्षा भारताला अधिक आहे. तिकडे भारतीय नौदलाचे प्रमुख अॅ डमिरल करमबीरसिंह यांनी उत्तर सीमेवर जितका काळ तणाव असेल तितका काळ नौदल मल्लाका सामुद्रधुनी आणि हिंदी महासागर परिसरात आक्रमक राहील असे घोषित केले आहे. याचा परिणाम चिनी नौदलावरचा भार वाढण्यावर होईल आणि दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या साहसाला आळा बसेल.
हिंदी महासागरात सतत भारतीत नौदलाच्या मागवर राहणे चीनला अवघड जाणार आहे. ही सर्व लक्षणे भारत आता चीनला आपल्या चिमटीतून सोडणार नाही हेच दर्शविणारी आहेत. या परिस्थितीतून येत्या वर्षभरात यशस्वीपणे बाहेर पडणे शी जिनपिंग यांना जमले नाही, तर नोव्हेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महाअधिवेशनात त्यांच्या नेतृत्वाला आव्हान मिळू शकते. त्यामुळे ते येत्या जानेवारीपर्यंत उत्तर सीमेवर काही आक्रमक हालचाली करण्याची शक्यता  गृहीत धरावी लागते. ती अर्थातच भारताने गृहीत धरली आहे. युद्धाची शक्यता अजूनही नाकारता येत नाही ती त्यामुळेच.
सदर लेखमाला
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी या विषयावर २४ ऑक्टोबरला व्याख्यान

Next Post

अक्षर कविता – श्रीनिवास म्हस्के यांच्या ‘सजनाची मिठी बाई’ या कवितेचे अक्षरचित्र

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201023 WA0002

अक्षर कविता - श्रीनिवास म्हस्के यांच्या 'सजनाची मिठी बाई' या कवितेचे अक्षरचित्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime11

नाशिक शहरातील तिघांना महिलेने घातला तब्बल ४१ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

ऑगस्ट 19, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण चार निर्णय….

ऑगस्ट 19, 2025
Untitled 32

इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची केली घोषणा

ऑगस्ट 19, 2025
Jitendra Awhad

कीर्तनकाराने दिली बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी…जितेंद्र आव्हाड यांनी केला असा निषेध

ऑगस्ट 19, 2025
crime 71

धक्कादायक….पत्नीचा खून करुन पतीने गळफास लावून केली आत्महत्या, नाशिकच्या अंबड येथील घटना

ऑगस्ट 19, 2025
accident 11

भरधाव आयशर ट्रकची कारला धडक…अपघाताचा जाब विचारल्याने कारचालकास जीवे ठार मारण्याची धमकी

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011