देहराडून – उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकलेल्या ३४ जणांना बाहेर काढण्यासाठी सुरु असलेली बचाव ऑपरेशन मोहीम सलग तिसर्या दिवशीही सुरू राहिली. दिवसभर बोगद्यातून काही ढिगारा काढल्यानंतर बचाव दल आतापर्यंत बोगद्याच्या आत १८० मीटरपर्यंतच पोहोचू शकले आहे. दरम्यान अद्याप बेपत्ता झालेल्या १७४ जणांचा शोध सुरूच आहे.
उत्तराखंड सीमेवरील रैनी गावाजवळ हिमनग कोसळल्यामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्यासाठीची मोहीम तिसर्या दिवशीही कायम राहिली. तपोवन-विष्णुगडच्या बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाला मोठी धडपड करावी लागत आहे. या ठिकाणी टी-पॉईंटवर अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आता पर्यायी मार्गाचा विचार केला जात आहे.









