शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गेल्या ५ वर्षात १७० आमदारांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी

by Gautam Sancheti
मार्च 12, 2021 | 7:23 am
in संमिश्र वार्ता
0
Congress

नवी दिल्ली –  देशातील सर्वात जुना आणि मोठा असलेला काँग्रेस पक्ष सध्या एका संकटाच्या काळातून मार्गस्थ होत आहे. निवडणुकांमध्ये सलग होत असलेल्या पराभवामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये निराशा पसरलेली आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसच्या १७० आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत दुस-या पक्षात प्रवेश केला आहे.
नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) नं २०१६-२०२० दरम्यान झालेल्या निवडणुकांच्या वेळी दिल्या गेलेल्या प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण केले. त्यात असे आढळले की, काँग्रेसच्या १७० आमदारांनी दुस-या पक्षात प्रवेश केला आहे. तर भाजपच्या केवळ १८ आमदारांनी दुस-या पक्षात प्रवेश केला आहे.
एडीआरनं अहवालात म्हटले आहे की, २०१६-२०२० दरम्यान पक्ष सोडून पुन्हा निवडणूक लढवणा-या ४०५ आमदारांपैकी १८२ भाजपमध्ये गेले. तर २८ आमदार काँग्रेस आणि २५ आमदार तेलंगणा राष्ट्र समितीत गेले. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकी दरम्यान पाच लोकसभेचे सदस्य भाजपला सोडून दुस-या पक्षात गेले. २०१६-२०२० दरम्यान काँग्रेचे सात राज्यसभा सदस्यांनी दुस-या पक्षात प्रवेश केला. मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आमदारांच्या पक्षांतरामुळे सरकार स्थापन करण्याच्या किंवा सरकार कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
२०१६-२०२० दरम्यान पक्षांतर करून राज्यसभा निवडणूक पुन्हा लढणा-या १६ पैकी १० सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर पक्षांतर केलेल्या १२ लोकसभा सदस्यांपैकी पाच सदस्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एडीआरने गेल्या पाच वर्षांमध्ये दिल्या गेलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

परिस्थिती जर सुधारली नाही तर कठोर निर्णय़ घ्यावे लागतील – जिल्हाधिकारी

Next Post

टीव्हीच्या किंमती १ एप्रिलपासून वाढणार हे आहे कारण…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक फोटो

टीव्हीच्या किंमती १ एप्रिलपासून वाढणार हे आहे कारण...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011