सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे संसदेत पडसाद

by India Darpan
मार्च 22, 2021 | 2:12 pm
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद आज संसदेत उमटले. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये खंडणी गोळा करायला सांगितलं होतं असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

यासाठी आज राज्यसभेत भाजपा सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. देशमुख यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी भाजपा सदस्य करत होते. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

खंडणी उकळण्यामधे मुंबई पोलीस कसे गुंतले आहेत. हे साऱ्या देशानं पाहिलं असेली ही गंभीर बाब आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. लोकसभेतही या मुद्यावरुन गदारोळ झाला. याप्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी भाजपा सदस्यांनी केली.

हा महाराष्ट्र सरकारचा मोठा घोटाळा आहे असा आरोप भाजपा खासदार कपिल पाटील यांनी केला. त्यावर प्रत्त्युत्तर देताना, राज्यातलं सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपानं अनेक प्रयत्न केले असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला.

देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निष्ठेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर भाजपा आणि शिवसेना सदस्यांमधे जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले.

त्याआधी प्रश्नोत्तराच्या तासात सीएसआर निधीबाबतच्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की महाराष्ट्रात खंडणीखोरी सुरु असून ही गंभीर बाब आहे.

सीएसरआर अर्थात, कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या ७२ हजार कोटी रुपयांपैकी सुमारे १२ हजार ७०० कोटी रुपयांचा सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राला मिळाला आहे, अशी माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील तरुणांना आता डिजिटल मार्केटिंग व कृत्रिम बुद्धीमत्तेचे प्रशिक्षण

Next Post

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटाचा डंका, बार्डो, आनंदी गोपाळ चित्रपटाला पुरस्कार

Next Post
11111

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटाचा डंका, बार्डो, आनंदी गोपाळ चित्रपटाला पुरस्कार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Nashik city bus 6 e1723473271994

ऑफलाईन पद्धतीने पास काढताय? तर मग जाणून घ्या ही नवीन प्रक्रिया….

जून 9, 2025
farmerkulwantsingha

शेतक-यांना इकडे लक्ष द्या…पेरणी कधी करावी, राज्य कृषी विभाग म्हणतो

जून 9, 2025
Untitled 24

मुंबईत लोकलमधून प्रवासी ट्रॅकवर पडले…सहा प्रवाशांचा मृत्यू

जून 9, 2025
cbi

मणिपूर हिंसाचार प्रकरणात सहभागी असलेल्या या सदस्याला सीबीआयने केली अटक

जून 9, 2025
Untitled 16

मुंबईसह या १८ ठिकाणी ईडीने टाकले छापे….७ लाख जप्त, २२ बँक खाते गोठवले

जून 9, 2025
dhanushayban

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी…

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011