शनिवार, ऑगस्ट 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गाथा बलिदानाची – कल्पना दत्ता (भारतीय क्रांतिकारक)

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 8, 2021 | 5:16 am
in इतर
0
IMG 20210207 WA0028

कल्पना दत्ता (भारतीय क्रांतिकारक)

जन्म : २७ जुलै, १९१३ (सिरपूर, चितगांव (बांग्लादेश), बंगाल)
मृत्यु : ८ फेब्रुवारी १९९५ (कलकत्ता, पश्चिम बंगाल)

इतर नाव : कल्पना जोशी
पती : पूरन चंद जोशी
नागरिकता : भारतीय
चळवळ : भारतीय स्वातंत्र्य लढा
तुरुंगवा : फेब्रुवारी १९३४ मध्ये २१ वर्षाच्या कल्पना दत्त यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली.

अन्य माहिती : सप्टेंबर १९७९ मध्ये कल्पना दत्ता यांना पुण्यात ‘वीर महिला’ या उपाधिने सम्मानित केले गेले.

  • कल्पना दत्ता (नंतर कल्पना जोशी) या एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सूर्य सेनच्या सशस्त्र चळवळीत होत्या. सूर्य सेन १९३० च्या चितगांवला झालेल्या शस्त्रागार धाडेच्या मागे होते. नंतर त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाल्या. त्यानंतर त्यांनी पुरणचंद जोशीशी विवाह केले. त्यानंतर कल्पना दत्ता १९४३ साली भाकपची अध्यक्षा झाल्या.

सुरुवातीचे जीवन

कल्पना दत्ताचा जन्म बंगालमधील चितगांव जिल्ह्यातील सिरपूर गावात झाला. १९२९ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर, त्यांनी कलकत्त्याला बे्थ्थ्यून काॅलेज येथे विज्ञानात पदवी करण्यसाठी गेली. तेथे असतानाच त्या विद्यार्थी संघ या क्रांतिकारी संस्स्थेची सदस्य झाल्या. त्या संस्थेत वीणा दास, प्रीतिलता वड्डेदार, ह्या पण सक्रिय होत्या.

सशस्त्र चळवळ

चितगांव शस्त्रागार धाड ही १८ एप्रिल १९३० ला पडली. त्यानंतर कल्पना १९३१ सालच्या मे मध्ये सूर्य सेनच्या सशस्त्र गटाच्या ‘भारतीय रिपब्लिकन आर्मी’ च्या चितगांव शाखेत भरती झाल्या. सप्टेंबर १९३१ ला सूर्य सेनने कल्पनाला व प्रीतिलता वड्डेदारला चितगांव येथील युरोपियन क्लबवर हल्ला करण्यासाठी नेमले. पण हल्ला करण्याच्या एक आठवडा आधीच कल्पना दत्ताला हल्ल्याच्या जागेची टेहळणी करताना अटक झाली. जामिनावर सुटका झाल्यावर तिने लपून राहायला सुरुवात केली. १७ फेब्रुवारी १९३३ रोजी पोलिसांनी तिच्या लपण्याच्या जागेला घेरा दिला व सूर्य सेनला पकडले; पण कल्पना तिथून पळून निघाली. पुढे कल्पनाला १९ मे १९३३ रोजी अटक झाली. चितगांव धाडीच्या दुसर्‍या सुनावणीत कल्पना दत्ताला शिक्षा झाली. १९३९ मध्ये त्यांची सुटका झाली.

नंतरचे जीवन
कल्पना १९४० ला कलकत्ता विद्यापीठातून पद्वीधर झाल्यानंतर त्या भाकपच्या सदस्या झाल्या. १९४३ च्या बंगालमधील दुष्काळात व बंगालच्या फाळणीच्या वेळेस त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. यावर आत्मकथात्मक पुस्तकही त्यांनी लिहले आहे. चितगांव शस्त्रागार धाडीच्या आठवणी हे १९४५ ला इंग्रजीत प्रकाशीत केले. १९४६ मध्ये त्यांनी बंगाल विधान सभेत चितगांव येथून भाकप कडून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. नंतर त्यांनी भारतीय संख्याशास्त्रीय संस्था (Indian Statistical Institute) येथे निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. ८ फेब्रुवारी १९९५ रोजी त्यांचा म्रुत्यू झाला.

वैयक्तिक जीवन
कल्पना दत्ताने १९४३ मध्ये भाकपचे अध्यक्ष पुरनचंद जोशी, ह्यांच्याशी विवाह केला.. त्यांना दोन मुले झाली. चंद व सूरज. चंद जोशी हा हिंदुस्तान टाइम्समध्ये पत्रकार होता.

चित्रपट
चितगांवच्या धाडीवर २०१० मध्ये ‘खेले हम जी जान से’ हा हिंदी चित्रपट निघाला. त्यात दीपिका पादुकोनने कल्पना दत्ताचे काम केले होते. पुन्हा १२ आॅक्टोबर २०१२ ला ‘चितगांव’ हा आणखी एक चित्रपट निघाला त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन वेदव्रत पॅन, ह्या नासातील माजी वैज्ञानिकाने केले होते.

संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

व्वा!!! इन्स्टाग्राममध्ये आले हे तगडे फिचर; पाहता येणार ही सुद्धा पोस्ट…

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
संग्रहित फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rape

घरात कुणी नसल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 2, 2025
Untitled 1

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु; पालकमंत्र्यांनी सफारीचे दोन तिकीट केले बुक

ऑगस्ट 2, 2025
crime112

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरीला

ऑगस्ट 2, 2025
facebook insta

सोशल मिडीयावर सक्रिय राहणे एका ६० वर्षीय वृध्देस पडले चांगलेच महाग…फेसबुक मित्राने अशी केली फसवणूक

ऑगस्ट 2, 2025
jail11

९ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या दोन व्यक्तींना अटक…मुंबई विभागाची कारवाई

ऑगस्ट 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये अन्न विषबाधा टाळण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती जाहीर…

ऑगस्ट 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011