बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोरोना उद्रेक : पुढील ४ आठवडे अत्यंत महत्वाचे

by Gautam Sancheti
एप्रिल 7, 2021 | 5:49 am
in मुख्य बातमी
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


नवी दिल्ली – देशात कोरोना महामारी अतिवेगाने फैलावत असून त्याची तीव्रता वाढत चालली आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यानुसार पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी लोकांचे सहकार्य गरजेचे असण्यावर भर देण्यात आला आहे.
देशात वाढत्या प्रादुर्भावामुळे महामारीची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. परंतु प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, असे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पाल यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना नियमांचे पालन करणे, प्रतिबंधित क्षेत्रांची ओळख पटवणे, चाचण्या करणे आदींना प्रभावीपणे लागू करणे आवश्यक आहे. आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा आणि लसीकरण अभियान वेगाने चालवण्याची गरज असल्याचे डॉ. पाल म्हणाले.
महामारीची तीव्रता वाढली असून, गेल्या वर्षीपेक्षा अधिक वेगाने प्रादुर्भाव वाढत आहे. काही राज्यांमध्ये परिस्थिती इतरांच्या तुलनेत नियंत्रणाबाहेर जात आहे. परंतु कोरोनारुग्णांची संख्या देशभरात वाढत आहे. दुसर्या लाटेला नियंत्रणात आणण्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. आगामी चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे असून, संपूर्ण देशाला एकत्रितरित्या महामारीविरोधात लढा उभारावा लागणार आहे, असेही डॉ. पाल म्हणाले.
केंद्रीय पथके तैनात
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्याचा सक्रिय रुग्णसंख्येत सर्वाधिक रुग्ण असलेल्या दहा जिल्ह्यात समावेश आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या सात जिल्ह्यांचा समावेश आहे. कर्नाटकमधील बंगरुळू शहर आणि दिल्लीतही सक्रिय रुग्ण आहेत. केंद्र सरकारने ५० उच्चस्तरीय आरोग्य पथके स्थापन केले असून, महाराष्ट्रात ३०, छत्तीसगडमध्ये ११ आणि पंजाबमध्ये ९ पथके पाठविण्यात आली आहेत. या राज्यांमधील सर्वात अधिक रुग्ण आढळत आणि मृत्यू होत  असलेल्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आलेली आहेत.
लसीकरण यांचेच
देशातील ज्या लोकांना लसीकरणाची गरज आहे, त्यांनाच लस देण्यात येणार आहे. ४५ वयोगटाखालील तरुणांना लसीकरण करण्याच्या प्रश्नावर राजेश भूषण यांनी सांगितले. महामारीमुळे होणारे मृत्यू रोखणे ही सरकारची प्राथमिकता आहे. ४५ वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण करणारा भारत जगातील एकमेव देश आहे.
वेगाने लसीकरण
देशातील लसीकरण जगात सर्वाधिक वेगाने होत आहे. फक्त अमेरिकेतच भारतापेक्षा अधिक लस देण्यात येत आहे. परंतु अमेरिकेत भारताआधीच लसीकरणाला सुरुवात झाली होती. अमेरिकेत प्रतिदिन सरासरी ३०.५३ लाख लोकांचे लसीकरण होत आहे. तर भारतात प्रतिदिन २६.५३ लाख लोकांचे लसीकरण होत आहे. एकूण लशीचे डोस देण्याबाबत अमेरिकेनंतर भारत दुसर्या स्थानावर आहे. अमेरिकेत १६ कोटी ५० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. तर भारतात ८ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. ४५ वर्षांहून अधिक लोकांचे लसीकरण झाल्यानंतर त्यापेक्षा कमी वय असलेल्या लोकांचे लसीकरण सुरू करण्यात येईल, असे डॉ. पाल यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कसमादे भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

Next Post

कळवण नगरपंचायत प्रशासनाची करडी नजर, हॉटेल व छोटया व्यावसायिकांची नाराजी 

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
IMG 20210406 WA0025 1 1 e1617778261186

कळवण नगरपंचायत प्रशासनाची करडी नजर, हॉटेल व छोटया व्यावसायिकांची नाराजी 

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011