सोमवार, ऑक्टोबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

काव्यवाचन – आस्वादाला पंख नवे….

ऑक्टोबर 4, 2020 | 7:08 am
in इतर
4
IMG 20201004 WA0007

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विशाखा काव्य पुरस्कार वितरणासाठी कवी अरुण कोलटकर नाशिकला आले होते.  भाषण न करता फक्त कवितावाचन करणे हे कोलटकराचं वैशिष्ट्य होते. काय डेंजर वारा सुटलाय ही कविता त्यांनी वाचायला सुरुवात केली आणि रसिकांना कवितेतील वार्‍याचा जोरदार झोत सभागृहात शिरल्याचा भास झाला. त्यानंतर ज्ञानेश्‍वर समाधी दर्शन, बळवंतबुवा तक्ता आदी कवितांच्या सादरीकरणाने सारा माहौल त्यांनी बदलून टाकला. यालाच म्हणतात अस्सल कविता आणि कवितेचे दमदार सादरीकरण. काव्यवाचनाची एक वेगळी अनुभूती जमलेल्या सगळ्यांना आली.

IMG 20201002 WA0026 e1601795170588
राजू देसले (लेखक कवी आहेत)

कवितेतला आशय नेमकेपणानें आणि आशयासकट पोहोचवणे हे कवीचं बलस्थान आहे. त्यात काही कवी यशस्वी होतात. काव्यवाचन हा तसा अभिव्यक्तीचाच प्रकार आहे. रसिकांना आपल्या पारंपरिक लयीशी, जगण्याशी नाते सांगणारी कविता किंवा गाणे ऐकावेसे वाटते, यामध्ये त्यांच्या अभिरूचीचा भाग येतो.

कविता हा मानवी आयुष्याचा कणा आहे. आपल्या मनातील विविध भावना, स्पंदने, विचार यांचे अस्तित्व जिवंत ठेवणारा, आपले जगणे प्रभावी करणारा, मानवी नातेसंबंधांच्या तारा उजळ करणारा तो रक्ताइतकाच अविभाज्य घटक आहे. संतसाहित्य, लोकसाहित्य ओव्या, मौखिक परंपरेतून तो आला आहे. प्रामुख्याने तोच धागा काव्यवाचनात दिसून येतो.

त्यामुळेच कवितेचे अनेक आविष्कार समोर येत असतात. ‘नक्षत्रांचे देणे’ सारख्या कार्यक्रमांतून कवी, कविता, गाणे याचे नेमके सूत्र गुंफून एक अद्भुत स्वरानुभव रसिकांनी अनुभवला आहे आणि त्याला दिलखुलास दादही दिली आहे. कवितेचे गाणे होतानाची काळजात रुजण्याची ही हाक होती.

महाराष्ट्रातल्या सकस काव्यपरंपरेत गावोगावी कविता नेण्याचे काम खर्‍या अर्थाने विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, वसंत बापट यांनी केले. कवितेतील रसाळ लय, गोडवा, जगण्याची गोडी म्हणजे नेमके काय, या विषयीच्या सहज सोप्या कविता त्यांनी सादर केल्या आणि कविता ही ऐकण्याची आणि अनुभवण्याची गोष्ट आहे, याची प्रचितीही दिली. रसिकांमध्ये कवितेचा झरा जिवंत ठेवण्याचे काम या कवींनी केले आहे. त्याचबरोबर नारायण सुर्वे, शंकर वैद्य, रामदास फुटाणे, फ.मु. शिंदे आदी कवींनी कवितावाचनातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

IMG 20201004 WA0006

कवी ना.धों. महानोरांचा अस्सल मातीतला शेतीबांधाशी नाते सांगणारा आवाज लागला की, आपणही हरखून जातो आणि गगनाला नवे पंख फुटल्याचा भास होतो. लयदार, लखलखीत शब्दकळेने रसिक भारावून जातो. सुरेश भटाचे गज़लगायन, कवितावाचन तसेच पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी सादर केलेल्या आरती प्रभू, कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर, बा.सी. मर्ढेकर यांच्या कवितांनी रसिकांमध्ये कविता हे जगण्याला पूरक स्पंदन आहे, याची जाणीव करून दिली आणि त्याला महाराष्ट्राने आपलेसे केले. हे महाराष्ट्राचे संचित म्हणावे लागेल.

अशोक नायगांवकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, किशोर कदम उर्फ कवी सौमित्र, निरंजन उजगरे, नलेश पाटील, प्रकाश होळकर या कवींनी ‘कवितांच्या गावा जावे’ कार्यक्रमातून कविता सादरीकरणाच्या अनोख्या वैशिष्टपूर्ण शैलीने आणि आशयप्रधान कवितांनी रसिकांना कवितेच्या जवळ नेण्याचे काम केले. सौंदर्यकविता, प्रेमकविता, महानगरीय कविता, निसर्गकविता अशा विविध प्रकारच्या मराठी कवितेचा प्रवास त्यांनी या कार्यक्रमातून सादर केला.

खेड्यापाड्यांतील चांगली कविता लिहिणार्‍या कवींची मोट बांधून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम कवी रामदास फुटाणे यांनी केले आहे. त्यात अनेक ग्रामीण भागातील कवी साहित्याच्या केंद्रभागी आले आहेत, हे कवितेच्या कक्षा रुंदावणारे आहे. चांद्यापासून ते अमेरिकेपर्यंत यांच्या ग्लोबल कवितावाचनाने मराठी कवितेचा आवाज जगभर पोहोचला आहे. लासलगांवसारख्या ठिकाणी कविता ऐकण्यासाठी दहा हजाराहून श्रोते येतात. हास्य-धारांचा अनुभव घेतात. ही सुखावणारी घटना आहे.

कविता नावाची कला जगण्याशी थेट नाते जोडत असते आणि सामाजिक, सांस्कृतिक बदल कवेत घेत असते. म्हणूनच कविता-सादरीकरण हा जगण्याचा उत्सव असतो आणि माणसांची मने जोडणारी चळवळही…!

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोचीमध्ये ग्लाइडरला अपघात; नौदलाच्या २ अधिकाऱ्यांचा मृत्यू

Next Post

हवामान बदल; महिनाभर दिवसा कडक ऊन, रात्री थंडी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
Next Post

हवामान बदल; महिनाभर दिवसा कडक ऊन, रात्री थंडी

Comments 4

  1. Vijay Madhukar Burhade shilpkar says:
    5 वर्षे ago

    सुन्दर लिखाण

    उत्तर
  2. विजय says:
    5 वर्षे ago

    छान विवेचन.

    उत्तर
  3. Vikram Bhagwat says:
    5 वर्षे ago

    कोलटकर ह्यांच्या काय डेंजर वारा सुटलाय ह्या कवितेचे शीर्षक जयंत पवार ह्यांनी आपल्या नाटकासाठी वापरले होते! काव्यवाचन हा प्रकार पूर्वी बापट पाडगावकर आणि विंदा नि रुजवला! तुम्ही म्हटले आहे त्या प्रमाणे इतर कवींनी सुद्धा तो नेटाने पुढे चालू ठेवला! तो प्रवाह असाच पुढे चालू रहावा!

    उत्तर
  4. लक्ष्मण महाडिक says:
    5 वर्षे ago

    राजाभाऊ फारच छान काव्य चळवळी बद्दल आपण लिहिलं .

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011