गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कांद्याबाबतचे धोरण तातडीने बदला; माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मागणी

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 26, 2020 | 12:37 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


सटाणा – केंद्र सरकारच्या कांद्याबाबत बदलत्या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून अत्यंत कष्टाने पिकवलेला कांदा क्विंटल मागे २५०० ते ३००० रुपयांनी घसरला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हतबल झाला असून कर्जबाजारीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू नयेत यासाठी केंद्र शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबतचे धोरण तातडीने बदलावे याप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लक्ष घालून राज्यातील कांदा उत्पादकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चव्हाण यांनी पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासन देशातील इतर राज्यांना कांदा निर्यात करण्यास परवानगी देते. मात्र महाराष्ट्राला परवानगी नाकारणे म्हणजे महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक देण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्र हे पाकव्याप्त राज्य आहे का ? केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीवर शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला असून किरकोळ व्यापाऱ्यांना २ टन आणि घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन कांदा साठवणूक करण्याची परवानगी दिली आहे. हा निर्णय ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहे. हे धोरण कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यावर अन्याय करणारे आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचे अजून मोठे नुकसान होणार आहे. चाळीत साठवणूक केलेला कांदा लवकर विकला न गेल्यास तो सडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना नाइलाजाने कांदा फेकून द्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. देशात आजही मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असताना कांदा आयात करण्याचा निर्णय, कांदा व्यापाऱ्यांवर इन्कमटॅक्सच्या धाडी टाकणे, कांदा साठवणुकीवर मर्यादा घालणे या केंद्र शासनाच्या धोरणामुळे हे सरकार शेतकरी विरोधी काम करते हे स्पष्ट झाले असून अदानी व अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींसाठी लाल गालीचा अंथरते, हे अनाकलनीय आहे. केंद्र सरकारने याबाबत धोरण बदलण्याची आवश्यकता असल्याने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी याबाबत लक्ष देऊन कांदा उत्पादकांना तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणीही सौ.चव्हाण यांनी निवेदनात केली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते – नवाब मलिक

Next Post

बेईमानी करुन उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं; नारायण राणेंची जहरी टीका

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आनंदाची वार्ता समजेल, जाणून घ्या, शुक्रवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 4, 2025
IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

भाजपातून सहा नगरसेवकांचे निलंबन…निलेश राणेंचा संताप

सप्टेंबर 4, 2025
Untitled 1
महत्त्वाच्या बातम्या

५८ लाख नोंदीची सरकारकडे माहितीच नाही? मराठा आंदोलनानंतर या वकिलाने केला मोठा दावा

सप्टेंबर 4, 2025
crime11
क्राईम डायरी

सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला २८ लाखाला गंडा

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम, सुट्टीचेही निकष बदलले, मंत्रिमंडळाची मान्यता

सप्टेंबर 4, 2025
crime 71
क्राईम डायरी

नाशिकमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाचा खून….पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 4, 2025
Next Post

बेईमानी करुन उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं; नारायण राणेंची जहरी टीका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011