शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कांदा लिलाव सुरु करा, अन्यथा वाहने अडवू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा व्यापा-यांना इशारा

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 29, 2020 | 1:20 pm
in स्थानिक बातम्या
0
swabhimani

पिंपळगाव बसवंत : कांदा साठवणुकीवर केंद्र सरकारने निर्बंध लादले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील घाऊक आणि किरकोळ व्यापा-यांनी कांदा लिलाव सोमवारपासून बंद ठेवले आहे. मात्र, अनेक व्यापा-यांचा साठवलेला कांदा बाहेर जात आहे. त्यामुळे व्यापा-यांनी लिलाव सुरू न केल्यास त्यांची वाहने अडविण्याचा धमकीवजा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सुभाष आहिरे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लहान – मोठ्या कांदा व्यापाऱ्यांना व्हाट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून तसेच प्रसिद्धी पत्रकातून हा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा मार्केट लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची कांदा माल साठवणूक क्षमता संपली असल्याने कांदा सडत आहे. आता कुठे तरी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले होते. पण, शासनाने जाचक अटी घालून दिल्याने व्यापारी वर्गाने कांदा लिलाव बंद ठेवले आहेत. पण व्यापारी वर्गाचा कांदा गाड्या भरून सुरळीत पणे बाहेर विक्रीसाठी जात आहे. मार्केट बंद असल्याने यात शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होत आहे. पुढे शेतकऱ्यांचा दीपावली सण येत असल्याने मुला – बाळांना खरेदीसाठी किंवा घरी थोडेफार गोडधड करून पोराबाळांना खाऊ घालू या अपेक्षेत शेतकरी असताना शासनाच्या जाचक अटींमुळे व्यापारी वर्गाने कांदा लिलाव बंद पाडले आहेत. त्यामुळे आहिरे यांनी वेळ पडली तर यावर्षी दीपावली चटणी –  भाकरी खाऊन साजरी करू, पण १ नोव्हेंबरपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्गाने कांदा लिलाव सुरळीत चालू न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना २ नोव्हेंबरपासून नाशिक जिल्ह्यातील कुठल्याही व्यापाऱ्यांचा कांदा माल जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही, असा धमकीवजा इशारा शेवटी आहिरे यांनी दिला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांदा प्रश्नावर प्रहारच्या आंदोलनानंतर जिल्हा उपनिबंधकांनी हे दिले आदेश

Next Post

महाराष्ट्रातील १६७ धरणांच्या पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पाला केंद्रीय कॅब‍िनेटची मंजुरी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रातील १६७ धरणांच्या पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पाला केंद्रीय कॅब‍िनेटची मंजुरी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011